शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

टेंभू योजनेच्या पाण्याचे उचल परवाने तातडीने द्यावेत

By admin | Updated: June 24, 2016 01:14 IST

बाळासाहेब नायकवडी : २६ जूनच्या आटपाडीतील पाणी परिषदेत प्रमुख मागणी करणार

आटपाडी : राजकारणी मंडळींनी आटपाडी तालुक्यातील लोकांच्या भावनांचे राजकारण करू नये. या लोकांना निदान मदत करता आली नाही, तरी अन्याय तरी करू नका. टेंभू योजनेच्या तालुक्यात येणाऱ्या पाण्याचे उचलपरवाने तातडीने इथल्या शेतकऱ्यांना द्या. रविवार, दि. २६ जूनरोजी आटपाडीत होणाऱ्या पाणी परिषदेतही प्रमुख मागणी करणार आहे, अशी माहिती पाणी चळवळीचे नेते प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी दिली.टेंभू योजनेचे पाणी सध्या कडेगाव आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना उचलपरवाने देऊन या पाण्याचा लाभ येथील शेतकऱ्यांना अधिक होत असताना आटपाडीकरांवर मात्र या पाण्याकडे बघत बसण्याची वेळ आली आहे. आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना परवाने दिले जात नाहीत. आटपाडीकरांवर होत असलेल्या अन्यायाला ‘लोकमत’ने गुरुवारी दि. २३ जूनच्या अंकात वाचा फोडली. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब नायकवडी म्हणाले, पाणी चळवळीचा अनेक राजकारणी मंडळींनी आपल्या भागात पाणी नेण्यासाठी उपयोग केला. पण आटपाडी तालुक्यातील जनतेने २३ वर्र्षांपूर्वी हे पाणी येण्यासाठी मोठी चळवळ केली. पाणी येण्यात या तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. असे असताना लोकांना पाणी देण्यामध्ये राजकारण येणे दुर्देवी आहे. आता चळवळींची आटपाडीकरांवर अन्याय दूर करा, तातडीने परवाने द्या, अशी मागणी आहे. यावेळी प्रा. बी. के. पाटील, सुरेश जाधव, व्ही. ए. शिंदे, एम. डी. कांबळे हे चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)अकारण फसवणुकीचा प्रकार...चार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याने सिंचनासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली. महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी १४० कोटी, गेल्यावर्षी ५५ कोटी आणि यावर्षी ८० कोटींची तरतूद केली. टेंभू योजनेचा समावेश पंतप्रधानांच्या सिंचन योजनेत करावा. २००० कोटी निधीमध्ये टेंभूचे ७५ टक्के काम होईल. शेतात पाणी देण्यासाठी पोटकालवे काढावेत. कारण बंद पाईपलाईनने पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या आराखड्यात टेंभूचा समावेश नाही. काहीजण अकारण लोकांची फसवणूक करीत आहेत, असा गंभीर आरोप बाळासाहेब नायकवडी यांनी केला.