शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

‘म्हैसाळ’मधून हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 19, 2015 00:49 IST

मुख्य कालव्याला तडे : जमिनी क्षारपड होण्याचा धोका; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

दिलीप कुंभार- नरवाड --मिरज तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाच्या गळतीने हजारो लिटर पाणी वापराविना पुन्हा नदीत मिसळत असल्याने या प्रकल्पाचे पाणी मृगजळ ठरते की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.कृष्णा खोरे महामंडळाच्या म्हैसाळ प्रकल्पाची १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या ८२ कोटी खर्चाच्या म्हैसाळ प्रकल्पाचा खर्च ९६४ कोटींवर जाऊन पोहोचला. नरवाडच्या वितरण हौदातून मुख्य कालव्याद्वारे ६ टप्पे करून कवठेमहांकाळ व जतला पाणीपुरवठा करण्यासाठी म्हैसाळ प्रकल्पाची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली. वेळोवेळी याच्या चाचणीसाठी आवर्तनेही घेण्यात आली. मात्र १५ ते २० वर्षापूर्वी नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून पाणी वाहण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य कालव्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत ‘लोकमत’मधून वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण याबाबत पाटबंधारे खात्याने गांधारीची भूमिका घेतल्याने मुख्य कालव्यातून हजारो लिटर पाणी वापराविना पुन्हा नदीत मिसळत आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून १०१४३ घनमीटर पाणी १५ विद्युत पंपांद्वारे उचलून दुसऱ्या टप्प्याच्या वितरण हौदात सोडले जात आहे. येथूनच मुख्य कालव्याद्वारे पाणी वाहत जाऊन चढावाच्या भागावर पुन्हा पाणी उचलून कवठेमहांकाळला नेले जात आहे. नरवाड, बेडग, लांडगेवाडी, लिंगनूर, सलगरेपर्यंत पाणी विनापाईप जाते. परिणामी बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून बांधकामाचे सिमेंट जीर्ण होऊन मुख्य कालव्यात पडले आहे. जागोजागी घुशींनी आपली राहण्याची जागा केल्याने दगड-माती कालव्यात पडली आहे.यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीत झिरपून जमिनी क्षारपड होण्याचा धोका वाढला आहे. ढिसाळ नियोजनाचा फटका -बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून बांधकामाचे सिमेंट जीर्ण होऊन मुख्य कालव्यात पडले आहे. जागोजागी घुशींनी आपली राहण्याची जागा केल्याने दगड-माती कालव्यात पडली आहे. १५ ते २० वर्षापूर्वी नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून पाणी वाहण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य कालव्याची दुरवस्था झाली आहे. सा. क्र. ९०० येथे कालव्याच्या दुरवस्थेचा नमुना स्थिती पाहण्यास मिळते. मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. अशी वस्तुस्थिती असतानाही पाटबंधारे खात्याने याची कोणतीही खातरजमा केली नसल्याने, अस्तरीकरणाशिवाय पुन्हा प्रकल्प सुरू केल्याने पाटबंधारे खात्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचा बोजवारा नागरिकांच्या अंगावर पडणार आहे. बंद पडलेला हा प्रकल्प सध्या सुरू झाला आहे. टंचाई निधीतून शासनाने पैसे उपलब्ध करून दिले, शिवाय महावितरणच्या सहकार्यामुळे म्हैसाळ पाटबंधारे प्रकल्प सुरू झाला. पण ढिसाळ व्यवस्थापनामुळे तो बंद पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.