शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

‘म्हैसाळ’मधून हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 19, 2015 00:49 IST

मुख्य कालव्याला तडे : जमिनी क्षारपड होण्याचा धोका; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

दिलीप कुंभार- नरवाड --मिरज तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाच्या गळतीने हजारो लिटर पाणी वापराविना पुन्हा नदीत मिसळत असल्याने या प्रकल्पाचे पाणी मृगजळ ठरते की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.कृष्णा खोरे महामंडळाच्या म्हैसाळ प्रकल्पाची १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या ८२ कोटी खर्चाच्या म्हैसाळ प्रकल्पाचा खर्च ९६४ कोटींवर जाऊन पोहोचला. नरवाडच्या वितरण हौदातून मुख्य कालव्याद्वारे ६ टप्पे करून कवठेमहांकाळ व जतला पाणीपुरवठा करण्यासाठी म्हैसाळ प्रकल्पाची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली. वेळोवेळी याच्या चाचणीसाठी आवर्तनेही घेण्यात आली. मात्र १५ ते २० वर्षापूर्वी नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून पाणी वाहण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य कालव्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत ‘लोकमत’मधून वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण याबाबत पाटबंधारे खात्याने गांधारीची भूमिका घेतल्याने मुख्य कालव्यातून हजारो लिटर पाणी वापराविना पुन्हा नदीत मिसळत आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून १०१४३ घनमीटर पाणी १५ विद्युत पंपांद्वारे उचलून दुसऱ्या टप्प्याच्या वितरण हौदात सोडले जात आहे. येथूनच मुख्य कालव्याद्वारे पाणी वाहत जाऊन चढावाच्या भागावर पुन्हा पाणी उचलून कवठेमहांकाळला नेले जात आहे. नरवाड, बेडग, लांडगेवाडी, लिंगनूर, सलगरेपर्यंत पाणी विनापाईप जाते. परिणामी बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून बांधकामाचे सिमेंट जीर्ण होऊन मुख्य कालव्यात पडले आहे. जागोजागी घुशींनी आपली राहण्याची जागा केल्याने दगड-माती कालव्यात पडली आहे.यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीत झिरपून जमिनी क्षारपड होण्याचा धोका वाढला आहे. ढिसाळ नियोजनाचा फटका -बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून बांधकामाचे सिमेंट जीर्ण होऊन मुख्य कालव्यात पडले आहे. जागोजागी घुशींनी आपली राहण्याची जागा केल्याने दगड-माती कालव्यात पडली आहे. १५ ते २० वर्षापूर्वी नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून पाणी वाहण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य कालव्याची दुरवस्था झाली आहे. सा. क्र. ९०० येथे कालव्याच्या दुरवस्थेचा नमुना स्थिती पाहण्यास मिळते. मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. अशी वस्तुस्थिती असतानाही पाटबंधारे खात्याने याची कोणतीही खातरजमा केली नसल्याने, अस्तरीकरणाशिवाय पुन्हा प्रकल्प सुरू केल्याने पाटबंधारे खात्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचा बोजवारा नागरिकांच्या अंगावर पडणार आहे. बंद पडलेला हा प्रकल्प सध्या सुरू झाला आहे. टंचाई निधीतून शासनाने पैसे उपलब्ध करून दिले, शिवाय महावितरणच्या सहकार्यामुळे म्हैसाळ पाटबंधारे प्रकल्प सुरू झाला. पण ढिसाळ व्यवस्थापनामुळे तो बंद पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.