शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

सात गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: December 29, 2014 23:43 IST

माधवनगर पाणी योजना : पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त; ग्रामस्थांमध्ये संताप

सांगली : थकित बिलापोटी महावितरणने वीज कनेक्शन तोडल्याने मिरज तालुक्यातील माधवनगरसह सात गावांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. विधानसभा निवडणूक आली की, सातही गावात संपर्क ठेवणाऱ्या व निवडणुका झाल्या की गायब होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांना प्यायला पाणीही मिळेनासे झाले आहे. ऐन थंडीत ग्रामस्थांना पहाटे उठून विहीर व कूपनलिकेतून पाणी आणण्यासाठी जावे लागत आहेत.मुळातच माधवनगरसह सात गावांची पाणी योजना सुरुवातीपासून वादग्रस्त ठरली आहे. महिन्यातून केवळ चार ते पाचवेळा या गावात पाणी येते. अनेकदा गळतीमुळे महिन्यातून केवळ दोनच वेळा पाणी येते. तेही केवळ अर्धा-पाऊण तासच असते. महिन्यापूर्वी थकबाकीमुळे वीज पुरवठा तोडण्यात आला होता. त्यावेळी तब्बल दहा दिवस पाणी सोडण्यात आले नव्हते. माधवनगर ग्रामपंचायतीने वीज बिलाची रक्कम वेळेत भरूनही इतर ग्रामपंचायतींची थकबाकी असल्याने माधवनगर पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे विशेषत: माधवनगर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. यामुळे काही ग्रामपंचायतींनी युद्धपातळीवर वसुली करून महावितरणकडे वीज बिलाची थकबाकी भरली होती. यावेळी आता पुन्हा थकबाकीचा मुद्दा पुढे आल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेले नाही. लाखो रुपयांची थकबाकी असली तरी, काही ग्रामपंचायतीकडून वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. शिवाय महिन्यातून दोन ते तीन वेळाच पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थही पाणी बिल भरण्यास पुढे येत नाहीत.ग्रामपंचायतींकडून सध्या वसुली सुरु असली तरी, ती समाधानकारक नाही. महावितरणचे दोन कर्मचारी प्रत्येक महिन्यातील या गावातील वीज बिलांची शंभर टक्के वसुली करतात. हे कर्मचारी तर परगावचे आहेत.मात्र गावपातळीवर ग्रामपंचायत सदस्य गावचे, कर्मचारी गावचे, मग त्यांना पाणी बिलाची शंभर टक्के का वसुली होत नाही, असा सवाल सातही गावातील ग्रामस्थांमधून होत आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. मनात येईल त्या प्रभागात वसुलीला जायचे. दिवसभरात पाच हजाराचीही वसुली होत नाही, अशी परिस्थिती काही ग्रामपंचायतींची आहे. सध्या पाणी नसल्याने ग्रामस्थ ऐन थंडीत मिळेल तेथून पाणी आणत आहेत. मात्र प्यायला पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधी गेले कुठे?ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढविणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेले? कोट्यवधींची कामे केल्याचा डांगोरा पिटणारे लोकप्रतिनिधी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वत:च्या फंडातील निधी का देत नाहीत? निवडणुका झाल्यानंतर पुन्हा गावाकडे का फिरकत नाहीत? असा सवाल सातही गावांतील ग्रामस्थ करत आहेत.