शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

सात गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: December 29, 2014 23:43 IST

माधवनगर पाणी योजना : पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त; ग्रामस्थांमध्ये संताप

सांगली : थकित बिलापोटी महावितरणने वीज कनेक्शन तोडल्याने मिरज तालुक्यातील माधवनगरसह सात गावांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. विधानसभा निवडणूक आली की, सातही गावात संपर्क ठेवणाऱ्या व निवडणुका झाल्या की गायब होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांना प्यायला पाणीही मिळेनासे झाले आहे. ऐन थंडीत ग्रामस्थांना पहाटे उठून विहीर व कूपनलिकेतून पाणी आणण्यासाठी जावे लागत आहेत.मुळातच माधवनगरसह सात गावांची पाणी योजना सुरुवातीपासून वादग्रस्त ठरली आहे. महिन्यातून केवळ चार ते पाचवेळा या गावात पाणी येते. अनेकदा गळतीमुळे महिन्यातून केवळ दोनच वेळा पाणी येते. तेही केवळ अर्धा-पाऊण तासच असते. महिन्यापूर्वी थकबाकीमुळे वीज पुरवठा तोडण्यात आला होता. त्यावेळी तब्बल दहा दिवस पाणी सोडण्यात आले नव्हते. माधवनगर ग्रामपंचायतीने वीज बिलाची रक्कम वेळेत भरूनही इतर ग्रामपंचायतींची थकबाकी असल्याने माधवनगर पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे विशेषत: माधवनगर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. यामुळे काही ग्रामपंचायतींनी युद्धपातळीवर वसुली करून महावितरणकडे वीज बिलाची थकबाकी भरली होती. यावेळी आता पुन्हा थकबाकीचा मुद्दा पुढे आल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेले नाही. लाखो रुपयांची थकबाकी असली तरी, काही ग्रामपंचायतीकडून वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. शिवाय महिन्यातून दोन ते तीन वेळाच पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थही पाणी बिल भरण्यास पुढे येत नाहीत.ग्रामपंचायतींकडून सध्या वसुली सुरु असली तरी, ती समाधानकारक नाही. महावितरणचे दोन कर्मचारी प्रत्येक महिन्यातील या गावातील वीज बिलांची शंभर टक्के वसुली करतात. हे कर्मचारी तर परगावचे आहेत.मात्र गावपातळीवर ग्रामपंचायत सदस्य गावचे, कर्मचारी गावचे, मग त्यांना पाणी बिलाची शंभर टक्के का वसुली होत नाही, असा सवाल सातही गावातील ग्रामस्थांमधून होत आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. मनात येईल त्या प्रभागात वसुलीला जायचे. दिवसभरात पाच हजाराचीही वसुली होत नाही, अशी परिस्थिती काही ग्रामपंचायतींची आहे. सध्या पाणी नसल्याने ग्रामस्थ ऐन थंडीत मिळेल तेथून पाणी आणत आहेत. मात्र प्यायला पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधी गेले कुठे?ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढविणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेले? कोट्यवधींची कामे केल्याचा डांगोरा पिटणारे लोकप्रतिनिधी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वत:च्या फंडातील निधी का देत नाहीत? निवडणुका झाल्यानंतर पुन्हा गावाकडे का फिरकत नाहीत? असा सवाल सातही गावांतील ग्रामस्थ करत आहेत.