शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

विठ्ठलदेव सोसायटीसाठी काट्याची लढत

By admin | Updated: February 23, 2015 23:57 IST

भाजप-कॉँग्रेस आमने-सामने : वांगीतील राजकीय वातावरण तापले

मोहन मोहिते -वांगी  कडेगाव तालुक्यात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या वांगी येथील श्री विठ्ठलदेव सर्व सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी होत असून, कॉँग्रेस विरुध्द भाजप असा थेट सामना होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही गटांनी थेट मतदारांशी संपर्क साधून सत्ता काबीज करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे या संस्थेच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.वांगी येथील श्री विठ्ठलदेव सोसायटीच्या १३ जागांसाठी १ मार्च रोजी निवडणूक होणार असून २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही गटातून प्रामुख्याने तरुणांना संधी देण्यात आली आहे. ही निवडणूक ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस विरुध्द माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी कॉँग्रेसमध्येच दोन गट निर्माण झाले. परंतु, या दोन्ही गटात दिलजमाई झाल्यानंतर एका गटाला आठ, तर दुसऱ्या कॉँग्रेसच्या गटाला पाच अशा १३ जागांचे वाटप करण्यात आले. कॉँग्रेसच्या एकीमुळे विरोधी गटाला काही प्रमाणात संधी हुकल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉँग्रेसअंतर्गत बंडाळी व जिरवा-जिरवीच्या प्रकाराने कॉँग्रेसला मोठी हार पत्कारावी लागली होती. तीच परिस्थिती संस्थेच्या निवडणुकीत राहल्यास त्याचा भाजपला फायदा होण्याचे संकेत आहेत. कॉँग्रेसच्या तानाजी सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपत १३ उमेदवारी अर्जच असल्याने त्यांच्यात एकी झाल्याचे दिसून येत आहे. भाजपकडे स्थानिक पातळीवर दिग्गज नेतृत्व नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यश अगदी उंबरठ्यावर आले तरी मिळत नसल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे.कॉँग्रेसप्रणित डॉ. पतंगराव कदम पॅनेल या नावाने लढत दिली जात असून, या पॅनेलची धुरा जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पं. स.सदस्य सखाराम सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, महादेव दार्इंगडे, शशिकांत माळी, सरपंच मनीषा कांबळे यांच्यावर असून, भाजपप्रणित जयभवानी पॅनेलचे नेतृत्व क्रांती साखर कारखान्याचे संचालक दाजीराम मोहिते, रामचंद्र देशमुख, रमेश एडके, बाळासाहेब वत्रे, अमोल मोहिते, उपसरपंच राहुल होनमाने, रवींद्र कांबळे करीत आहेत. बाजार समिती सदस्य पांडुरंग पोळ, भगवानराव वाघमोडे, धनाजी सूर्यवंशी, काशिनाथ तांदळे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दोन गटांत मनोमीलन ?या संस्थेच्या मागील निवडणुकीत कॉँग्रेसने एकसंधपणे निवडणूक लढविली होती. तरीही कॉँग्रेसचे १७ पैकी १३ उमेदवार केवळ अल्पशा मतांनी विजयी झाले होते. आता तर कॉँग्रेसचे दोन गट एकत्रित करून निवडणुकीला सामोरे जात असले तरी, हे दोन्ही कॉँग्रेसचे गट मनाने एकत्रित झाले आहेत का? असा प्रश्न मतदारांतून होत आहे.