शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

विठ्ठलदेव सोसायटीसाठी काट्याची लढत

By admin | Updated: February 23, 2015 23:57 IST

भाजप-कॉँग्रेस आमने-सामने : वांगीतील राजकीय वातावरण तापले

मोहन मोहिते -वांगी  कडेगाव तालुक्यात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या वांगी येथील श्री विठ्ठलदेव सर्व सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी होत असून, कॉँग्रेस विरुध्द भाजप असा थेट सामना होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही गटांनी थेट मतदारांशी संपर्क साधून सत्ता काबीज करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे या संस्थेच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.वांगी येथील श्री विठ्ठलदेव सोसायटीच्या १३ जागांसाठी १ मार्च रोजी निवडणूक होणार असून २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही गटातून प्रामुख्याने तरुणांना संधी देण्यात आली आहे. ही निवडणूक ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस विरुध्द माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी कॉँग्रेसमध्येच दोन गट निर्माण झाले. परंतु, या दोन्ही गटात दिलजमाई झाल्यानंतर एका गटाला आठ, तर दुसऱ्या कॉँग्रेसच्या गटाला पाच अशा १३ जागांचे वाटप करण्यात आले. कॉँग्रेसच्या एकीमुळे विरोधी गटाला काही प्रमाणात संधी हुकल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉँग्रेसअंतर्गत बंडाळी व जिरवा-जिरवीच्या प्रकाराने कॉँग्रेसला मोठी हार पत्कारावी लागली होती. तीच परिस्थिती संस्थेच्या निवडणुकीत राहल्यास त्याचा भाजपला फायदा होण्याचे संकेत आहेत. कॉँग्रेसच्या तानाजी सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपत १३ उमेदवारी अर्जच असल्याने त्यांच्यात एकी झाल्याचे दिसून येत आहे. भाजपकडे स्थानिक पातळीवर दिग्गज नेतृत्व नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यश अगदी उंबरठ्यावर आले तरी मिळत नसल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे.कॉँग्रेसप्रणित डॉ. पतंगराव कदम पॅनेल या नावाने लढत दिली जात असून, या पॅनेलची धुरा जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पं. स.सदस्य सखाराम सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, महादेव दार्इंगडे, शशिकांत माळी, सरपंच मनीषा कांबळे यांच्यावर असून, भाजपप्रणित जयभवानी पॅनेलचे नेतृत्व क्रांती साखर कारखान्याचे संचालक दाजीराम मोहिते, रामचंद्र देशमुख, रमेश एडके, बाळासाहेब वत्रे, अमोल मोहिते, उपसरपंच राहुल होनमाने, रवींद्र कांबळे करीत आहेत. बाजार समिती सदस्य पांडुरंग पोळ, भगवानराव वाघमोडे, धनाजी सूर्यवंशी, काशिनाथ तांदळे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दोन गटांत मनोमीलन ?या संस्थेच्या मागील निवडणुकीत कॉँग्रेसने एकसंधपणे निवडणूक लढविली होती. तरीही कॉँग्रेसचे १७ पैकी १३ उमेदवार केवळ अल्पशा मतांनी विजयी झाले होते. आता तर कॉँग्रेसचे दोन गट एकत्रित करून निवडणुकीला सामोरे जात असले तरी, हे दोन्ही कॉँग्रेसचे गट मनाने एकत्रित झाले आहेत का? असा प्रश्न मतदारांतून होत आहे.