शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

खुजगावात हजारो एकर शेती क्षारपड

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

पिकांचेही मोठे नुकसान : वारणा डाव्या कालव्याच्या गळतीचा परिणाम

येळापूर : खुजगाव (ता. शिराळा) येथे वारणा डाव्या कालव्यानजीक वारंवार होणारी गळती व त्यातून वाया जाणारे पाणी यामुळे भागातील पिकांच्या नुकसानीबरोबरच जमिनी क्षारपड होऊ लागल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.चांदोली धरणापासून २६ कि.मी.पर्यंत वारणा डाव्या कालव्याचा विस्तार झाला आहे. या कालव्यातून उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येला धरून वारंवार पाणी सोडले जाते. मात्र या कालव्यास आरळा, चरण, मोहरे, नाठवडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असल्याने बरेचसे पाणी पुढे न सरकता या परिसरातून गळतीद्वारे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यातच अंतर्गत करण्यात आलेले अस्तरीकरण, काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे बनले आहे.जागोजागी बसविण्यात आलेले रबर खराब झाल्याने यातूनही पाण्याची गळती होत आहे. या सततच्या गळतीमुळे शेतकऱ्यांची पिके वाया जात आहेत. जमिनी क्षारपड होत चालल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने त्याचाही उपयोग होत नाही. जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. दुसरीकडे अति पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख म्हणाले की, डाव्या कालव्याची गळती काढावी, नव्याने सर्वेक्षण करावे, याबाबत सदाभाऊ खोत यांनी बैठकही घेतली होती. मात्र तत्कालीन सरकारने याची दखल घेतली नाही. नव्या सरकारने तरी याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. (वार्ताहर)लाखो लिटर पाणी वायाचांदोली धरणापासून २६ कि.मी.पर्यंत वारणा डाव्या कालव्याचा विस्तार झाला आहे. या कालव्यास आरळा, चरण, मोहरे, नाठवडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असल्याने बरेचसे पाणी पुढे न सरकता या परिसरातून गळतीद्वारे लाखो लिटर पाणी वाया जाते.