शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

खुजगावात हजारो एकर शेती क्षारपड

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

पिकांचेही मोठे नुकसान : वारणा डाव्या कालव्याच्या गळतीचा परिणाम

येळापूर : खुजगाव (ता. शिराळा) येथे वारणा डाव्या कालव्यानजीक वारंवार होणारी गळती व त्यातून वाया जाणारे पाणी यामुळे भागातील पिकांच्या नुकसानीबरोबरच जमिनी क्षारपड होऊ लागल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.चांदोली धरणापासून २६ कि.मी.पर्यंत वारणा डाव्या कालव्याचा विस्तार झाला आहे. या कालव्यातून उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येला धरून वारंवार पाणी सोडले जाते. मात्र या कालव्यास आरळा, चरण, मोहरे, नाठवडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असल्याने बरेचसे पाणी पुढे न सरकता या परिसरातून गळतीद्वारे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यातच अंतर्गत करण्यात आलेले अस्तरीकरण, काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे बनले आहे.जागोजागी बसविण्यात आलेले रबर खराब झाल्याने यातूनही पाण्याची गळती होत आहे. या सततच्या गळतीमुळे शेतकऱ्यांची पिके वाया जात आहेत. जमिनी क्षारपड होत चालल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने त्याचाही उपयोग होत नाही. जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. दुसरीकडे अति पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख म्हणाले की, डाव्या कालव्याची गळती काढावी, नव्याने सर्वेक्षण करावे, याबाबत सदाभाऊ खोत यांनी बैठकही घेतली होती. मात्र तत्कालीन सरकारने याची दखल घेतली नाही. नव्या सरकारने तरी याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. (वार्ताहर)लाखो लिटर पाणी वायाचांदोली धरणापासून २६ कि.मी.पर्यंत वारणा डाव्या कालव्याचा विस्तार झाला आहे. या कालव्यास आरळा, चरण, मोहरे, नाठवडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असल्याने बरेचसे पाणी पुढे न सरकता या परिसरातून गळतीद्वारे लाखो लिटर पाणी वाया जाते.