शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’च्या संचालकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: January 13, 2017 23:46 IST

कायदेशीर सल्ल्यासाठी प्रयत्न : कारवाई चुकीची असल्याचा दावा

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या संचालक व अधिकाऱ्यांपैकी २८ जणांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या निर्णयाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर लगेचच बँकेच्या अधिकारी आणि संचालकांनी कायदेशीर सल्ला घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बँकेच्या चौकशी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा ते न्यायालयात करणार आहेत.बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने विनातारण कर्जे, कमी तारणावर जादा कर्ज व थकबाकीदारांना पुन्हा कर्ज दिले. त्यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंतरिम अहवाल बँकेचे तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक आर. एस. शिर्के यांनी १६ मे २००८ रोजी दिला होता. त्या अहवालानुसार आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ६ मे २००९ रोजी सहकार आयुक्त यांनी उपनिबंधक व्ही. पी. पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर २८ आॅगस्ट २०१० रोजी पाटील यांच्याजागी महेश कदम यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १८ जानेवारी २०११ रोजी या चौकशीलाच स्थगिती दिली होती. भाजप-सेना युती सरकार सत्तेवर आल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही स्थगिती उठविली व चौकशीचे काम पुढे सुरू झाले. अ‍ॅड. आर. डी. रैनाक यांनी नियम ७२ (२) नुसार जाबदारांकडून खुलासा मागविला व ७२ (३) नुसार दोषारोपपत्र दाखल केले आहे. तशा स्वरूपाच्या नोटिसा त्यांनी दोषींना पाठविल्या होत्या. सुरुवातीला ७३ कर्मचारी, अधिकारी व ३४ संचालकांकडून खुलासा मागविला होता. चौकशीनंतर ७१ कर्मचारी व चार संचालकांना वगळण्यात आले आहे. दोषारोपपत्र ठेवण्यात आलेल्या ३० माजी संचालकांपैकी दिवंगत तीन संचालकांच्या ११ वारसांचा समावेश आहे.वसंतदादा बँकेतील चुकीच्या कारभारामुळे बँकेचे २४७ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी करुन सहकार कायदा १९६० च्या कलम ८८ नुसार जबाबदारी निश्चितीची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत या कारवाईतून सुटण्यासाठी संबंधित संचालकांनी विविध मार्गाने प्रयत्न केले होते. सरकारच्या माध्यमातूनही चौकशी थांबविणे, रद्द करणे यासाठी प्रयत्न करण्यात आले.मात्र चुकीच्या कारभाराचा फटका बसलेले काही ठेवीदार व सभासद अधिक जागरुक असल्याने व त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कारवाईस गती येत आहे. या चौकशीतून निघणारा अंतिम निष्कर्ष सफल होऊ नये, आपल्यावर रक्कम वसुलीसाठी जबाबदारी निश्चित झाल्यास ती वसूल करण्यासाठी काही हाती लागू नये, यासाठी संबंधित संचालक व अधिकारी आपल्या मालमत्तेची त्यापूर्वीच सुरक्षित विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब जागरूक सभासद, ठेवीदार यांंनी सहकार विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्याबाबतच्या कारवाईस पाठपुरावाही केला. त्यामुळेच यापैकी २६ संचालक व दोन अधिकाऱ्यांच्या १०१ मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेऊन, तसे आदेश काढण्यात आले. संचालकांच्या मालमत्ता जप्त का करु नयेत, याबाबतचे आदेश चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी काढले आहेत. मागील काही दिवसांपासून चौकशी सुरु असल्याने त्याबाबत जिल्'ात खळबळ उडाली आहे.