शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

निकृष्ट बियाणांचा सोयाबीनला फटका

By admin | Updated: September 7, 2014 23:23 IST

व्यापाऱ्यांकडूनही लूट : उत्पादनात घट; शेतकरी हवालदिल

सोमनाथ डवरी - कसबे डिग्रज --मिरज पश्चिम भागात सोयाबीनची काढणी-मळणी सुरू झाली असून निकृष्ट बियाणांमुळे वाढ खुंटलेल्या सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. पण आर्द्रता, घटलेला दर, वजनातील फरक यासाठी विविध युक्त्या करीत व्यापाऱ्यांकडूनही सोयाबीन उत्पादकांची लूट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीन बियाणांची कृत्रिम टंचाई करून बियाणे कंपनीने निकृष्ट दर्जाचे बियाणे भरमसाट दराने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले. ८०, ९० रुपये किलो बियाणांचा दर होता. त्यामुळे सोयाबीनची वाढच झाली नाही. शेंगांची संख्या अत्यल्प होती. त्यातच महिनाभर पाऊस लांबला. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस पाणी पाजून सोयाबीन जगविले. रोग, किडीकरिता आणि वाढीकरिता खते, औषधांचा हजारोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला. पण निकृष्ट बियाणांमुळे पिकांची वाढच झाली नाही.सध्याचा पावसाचा बेत टाळून सोयाबीन काढणी, मळणी सुरू आहे. मात्र उत्पादन निमपटीपेक्षाही घटलेले आहे. सोयाबीनचे दाणे बारीक आहेत. त्यामुळे प्रतिएकरी उतारा १२ ते १४ क्विंटलवरून ५-६ क्विंटलपर्यंत घसरला आहे. यामुळे उत्पादक हताश झाला आहे.सध्या काढणी-मळणीसाठी प्रतिएकरी २५०० ते ३००० आणि प्रतिपोते मळणी १००-२५० रुपये असा एकरी ५ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च उत्पादकांना परवडणारा नाही.पंधरवड्यापूर्वी ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल १० मॉयश्चरसाठी असलेला दर सध्या व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात खाली आणला आहे. सध्या हा दर ३ हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. मॉयश्चरच्या प्रमाणात हा दर २२०० ते २४०० पर्यंत पाडला जात आहे. ज्याप्रमाणे मॉयश्चरच्या प्रमाणात फसवणूक होते, त्याचप्रमाणे वजनातही काटामारी काही ठिकाणी होत आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची दुहेरी लूट होत आहे.काढणी-मळणीसाठी प्रतिएकरी पाच हजार रुपये खर्च न परवडणारा.व्यापारी वर्गाकडून आर्र्द्रतेच्या प्रमाणात सोयाबीनचा दर २२०० ते २४०० पर्यंत खाली आणून उत्पादकाची पिळवणूक.काही ठिकाणी वजनातही काटामारी.पाऊस लांबल्याने निकृष्ट बियाणांमुळे वाढीवर परिणाम.योग्यरितीने वाढ न झाल्याने प्रतिएकरी उताऱ्याची १२ ते १४ वरून ५ ते ६ क्विंटलपर्यंत घसरण