शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

निकृष्ट बियाणांचा सोयाबीनला फटका

By admin | Updated: September 7, 2014 23:23 IST

व्यापाऱ्यांकडूनही लूट : उत्पादनात घट; शेतकरी हवालदिल

सोमनाथ डवरी - कसबे डिग्रज --मिरज पश्चिम भागात सोयाबीनची काढणी-मळणी सुरू झाली असून निकृष्ट बियाणांमुळे वाढ खुंटलेल्या सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. पण आर्द्रता, घटलेला दर, वजनातील फरक यासाठी विविध युक्त्या करीत व्यापाऱ्यांकडूनही सोयाबीन उत्पादकांची लूट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीन बियाणांची कृत्रिम टंचाई करून बियाणे कंपनीने निकृष्ट दर्जाचे बियाणे भरमसाट दराने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले. ८०, ९० रुपये किलो बियाणांचा दर होता. त्यामुळे सोयाबीनची वाढच झाली नाही. शेंगांची संख्या अत्यल्प होती. त्यातच महिनाभर पाऊस लांबला. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस पाणी पाजून सोयाबीन जगविले. रोग, किडीकरिता आणि वाढीकरिता खते, औषधांचा हजारोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला. पण निकृष्ट बियाणांमुळे पिकांची वाढच झाली नाही.सध्याचा पावसाचा बेत टाळून सोयाबीन काढणी, मळणी सुरू आहे. मात्र उत्पादन निमपटीपेक्षाही घटलेले आहे. सोयाबीनचे दाणे बारीक आहेत. त्यामुळे प्रतिएकरी उतारा १२ ते १४ क्विंटलवरून ५-६ क्विंटलपर्यंत घसरला आहे. यामुळे उत्पादक हताश झाला आहे.सध्या काढणी-मळणीसाठी प्रतिएकरी २५०० ते ३००० आणि प्रतिपोते मळणी १००-२५० रुपये असा एकरी ५ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च उत्पादकांना परवडणारा नाही.पंधरवड्यापूर्वी ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल १० मॉयश्चरसाठी असलेला दर सध्या व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात खाली आणला आहे. सध्या हा दर ३ हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. मॉयश्चरच्या प्रमाणात हा दर २२०० ते २४०० पर्यंत पाडला जात आहे. ज्याप्रमाणे मॉयश्चरच्या प्रमाणात फसवणूक होते, त्याचप्रमाणे वजनातही काटामारी काही ठिकाणी होत आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची दुहेरी लूट होत आहे.काढणी-मळणीसाठी प्रतिएकरी पाच हजार रुपये खर्च न परवडणारा.व्यापारी वर्गाकडून आर्र्द्रतेच्या प्रमाणात सोयाबीनचा दर २२०० ते २४०० पर्यंत खाली आणून उत्पादकाची पिळवणूक.काही ठिकाणी वजनातही काटामारी.पाऊस लांबल्याने निकृष्ट बियाणांमुळे वाढीवर परिणाम.योग्यरितीने वाढ न झाल्याने प्रतिएकरी उताऱ्याची १२ ते १४ वरून ५ ते ६ क्विंटलपर्यंत घसरण