शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, पोलीस तपासात संतापजनक प्रकार उघड
5
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
6
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
7
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
8
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
9
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
10
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
11
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
12
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
13
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
14
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
15
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
16
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
17
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
18
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
19
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
20
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी

कृषी संशोधन केंद्र ठरतेय शेतकऱ्यांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST

फोटो : सुरेंद्र दुपटे शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कमी पाण्यात, कमी खर्चात, शेतीचे जादा उत्पन्न मिळावे, ...

फोटो : सुरेंद्र दुपटे

शीतल पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कमी पाण्यात, कमी खर्चात, शेतीचे जादा उत्पन्न मिळावे, या संकल्पनेतून कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्र काम करीत आहे. सोयाबीन, भुईमूग, हळद अशा विविध नगदी पिकांचे वाण या केंद्राने विकसित केले आहेत. सेंद्रीय शेतीचा प्रयोग असो अथवा क्षारपड जमिनीचा प्रश्न असो, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून शेती व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी कृषी संशोधन केंद्रातील संशोधक प्रयत्नशील आहेत.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कसबे डिग्रज येथे कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. सुरुवातीला हे केंद्र केवळ चाचणी केंद्र होते. तसेच शेतीशास्त्र महाविद्यालय होते. १९९८७ पासून या केंद्रातून शेती संशोधनाचे काम सुरू झाले. तसेच विद्यापीठस्तरावर होणारे संशोधन, नवीन वाण या जिल्ह्यातील वातावरणाशी कसे जुळते, याचे संशोधन सुरू झाले.

१९९० च्या दशकात जिल्ह्यात क्षारपड जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला. संशोधन केंद्राने क्षारपड जमिनीची समस्या सोडविण्यासाठी संशोधन हाती घेतले. त्यातून सच्छिद्र निवारा प्रणाली, मोल्ड नांगर प्रणाली विकसित केली. १०० एकरवर या प्रणालीची चाचणी घेतली असता उसाचे १५ टन उत्पन्न वाढले. त्यानंतर शासन, साखर कारखान्यांनीही क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घेतला. या काळात जिल्ह्यात सोयाबीनचे चांगले उत्पन्न होते. १९९२ नंतर सोयाबीनवर तांबेरा हा रोग आला. त्यामुळे सोयाबीन पीकच धोक्यात आले. त्यावर संशोधन केंद्राकडून २००४ मध्ये ‘फुले कल्याणी’ हा तांबेराप्रतिबंध वाण विकसित करण्यात आला. त्यानंतर ‘फुले अग्रणी, फुले संगत आणि फुले किमया’ या उत्पादन क्षमता वाढविणारी जात विकसित केली.

भुईमूग पिकाच्याही ‘फुले मोरणा, फुले वारणा व फुले चैतन्या’ या तीन जाती विकसित केल्या. हळदीतही ‘फुले स्वरुपा’ हे नवीन वाण आणले. त्यात हळदीचे क्रुकोमीन घटक वाढविण्यास मदत झाली. त्याशिवाय हळदीच्या कंदकुजीसह, हुमणी, मररोग व इतर रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी संशोधन झाले. याशिवाय हळद काढण्यासाठी व ती शिजविण्यासाठी मशिनरी विकसित केली आहे. रासायनिक खातांचे वेळापत्रक तयार करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. उसाचे नवीन २६५ ही जातही याच केंद्रात विकसित केली होती.

चौकट

बियाणे विक्री केंद्र सुरू

कृषी संशोधन केंद्रात राहुरी विद्यापीठांतर्गत विकसित केलेल्या पिकांच्या नवीन जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी बियाणे विक्री केंद्र सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांचा समावेश असलेला शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केला आहे. या शेतकऱ्यांना विद्यापीठातील नवनवीन संशोधनाची माहिती दिली जाते. मोबाईल व्हॅनद्वारे गावपातळीपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना माहिती दिली जात असल्याचे केंद्राचे प्रमुख डाॅ. दिलीप कठमाळे यांनी सांगितले.