शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

सांगलीचे कारागृह झाले ‘ओव्हरफ्लो’

By admin | Updated: August 30, 2015 22:33 IST

क्षमता ओलांडली : २२0 क्षमता असताना ३५१ कैदी

सचिन लाड -- सांगली  --जिल्हा मध्यवर्ती कारागृह क्षमतेपेक्षा अधिक भरले आहे. २२० क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या ३५१ कैदी आहेत. यामध्ये ३४० पुरुष व ११ महिलांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सर्वांवर नजर ठेवताना कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, मारामारी, दरोडा, वाटमारी, घरफोडी, जातीवाचक शिवीगाळ, बेकायदा हत्यार बाळगणे, बलात्कार, विनयभंग, अपहरण यासह अनेक गंभीर गुन्ह्यातील कैदी कारागृहात आहेत. शिक्षा लागल्यानंतर या कैद्यांना पुढे कोल्हापुरात कळंबा किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात हलविले जाते. एखाद्या गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक झाली की, त्याची पोलीस कोठडी घेतली जाते. तपास संपल्यानंतर या आरोपींची न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) रवानगी होती. हा आरोपी जामिनासाठी अर्ज करतो. पण न्यायालयाने जामीन फेटाळला तर त्याला कारागृहातच ठेवले जाते. प्रत्येक पंधरा दिवसाला त्याला न्यायालयात उभे करून कारागृहात ठेवण्याची मुदत वाढवून घेतली जाते. २२० कैदी ठेवण्याची क्षमता असलेले हे कारागृह आहे. यामध्ये २१२ पुरुष व आठ महिलांची क्षमता आहे, पण गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने कारागृहातील कच्चा कैद्यांची संख्या वाढत गेली.दररोज दोन-चार कैदी जामिनावर बाहेर येत असले तरी, तेवढेच विविध गुन्ह्यात कारागृहात जात आहेत. त्यामुळे कैद्यांच्या संख्येचा हा आकडा कधी वाढतो, तर कधी स्थिर राहतो. कैद्यांची दिवसेंदिवस वाढत असणारी संख्या, कारागृहाच्या सभोवताली वाढलेली लोकवस्ती पाहिली, तर सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो. ३५१ कैद्यांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेक कैद्यांना दररोज न्यायालयातील सुनावणीला हजर करावे लागते. हे काम पोलिसांचे असले तरी, कर्मचाऱ्यांना या कैद्यांना आतून सुरक्षित आणावे लागते.खुनाच्या गुन्ह्यात अनेक संशयितांचे खटले न्यायालयीन पटलावर आलेले नाहीत. चार वर्षापूवी झालेल्या खून प्रकरणांची प्रक्रियाही रेंगाळली आहे. त्यामुळे यातील संशयित कारागृहातच अडकले असल्याचे चित्र आहे. कैद्यांची वाढती संख्या, कारागृहाची सुरक्षितता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय व्हावी, यासाठी सांगलीचे कारागृह हलविण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाची जागा घेतली जाणार आहे. दीडशे एकर असलेली ही जागा सध्या एमआयडीसीच्या ताब्यात आहे. ती कारागृहासाठी मिळेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी कारागृहाचे अधीक्षक एम. एस. पवार प्रयत्न करीत आहेत.