शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

तासगाव कारखाना विक्री संशयास्पद

By admin | Updated: April 2, 2016 00:58 IST

व्यवस्थापकांचे राज्य बॅँकेला गोपनीय पत्र : न्यायालयासमोर नवीन पुरावा

भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना विक्री व्यवहारप्रकरणी झालेले सर्व व्यवहार हे संशयास्पद व बेकायदेशीर असल्याचा खुलासा राज्य सहकारी बॅँकेचे पुणे विभागाचे प्राधिकृत अधिकारी तथा व्यवस्थापक एम. ए. भावसार यांनी एका गोपनीय पत्राव्दारे कार्यकारी संचालक व व्यवस्थापक संस्थात्मक वसुली पुनरुज्जीवन विभाग मुख्य कचेरी, मुंबई यांच्याकडे केला होता. २५ जानेवारी २०१० रोजीचा हा गोपनीय पत्रव्यवहार विद्यमान प्रशासक मंडळाने प्रतिज्ञापत्रकासोबत नुकताच उच्च न्यायालयात दाखल केला असल्याची माहिती तासगाव कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दिली.महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेच्या तत्कालीन व्यवस्थापनाने तासगाव कारखान्याची प्रायव्हेट ट्रीट्री पध्दतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. गणपती जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संस्था संघ व गणपती अ‍ॅग्रो प्रोडक्टस् पॉवर अ‍ॅण्ड यीस्ट (इंडिया) लि. सांगली (जॉर्इंट व्हेन्चर) या खासगी कंपनीकडून १४ कोटी ५१ लाख रुपये रक्कम भरून घेऊन विक्री व्यवहार पूर्ण करण्यासाठी तत्कालीन कार्यकारी संचालक डी. एम. मोहोळ यांनी एम. ए. भावसार यांना लेखी आदेश दिले होते. परंतु सभासदांच्या मालकीच्या असणाऱ्या या कारखान्याचे सर्वच विक्री व्यवहार बेकायदेशीर व संशयास्पद असल्याने भावसार यांनी ही रक्कम भरून घेतली नाही. त्यांनी हा व्यवहार बेकायदेशीर ठरविण्याबाबत उघड मत व्यक्त केल्याने त्यांची नागपूरला बदली केल्याचीही चर्चा होती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी बॅँकेच्या व्यवस्थापनाला लेखी स्वरूपात गोपनीय पत्र पाठविले होते. हा व्यवहार रद्द करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पुरावाही ठरू शकतो. या पत्रात म्हटले आहे की, ३० डिसेंबर २००९ च्या कार्यकारी समिती सभेत तासगाव कारखाना १४ कोटी ५१ लाख रुपये रकमेस गणपती संघ व गणपती अ‍ॅग्रो या संयुक्त कंपनीस विक्री करण्याचे ठरले. सेक्युरिटायझेशन कायद्यातील तरतुदीनुसार हा व्यवहार चुकीचा आहे.२००७ मधील भाडे करारान्वये कारखाना हंगाम २०११-२०१२ पर्यंत गाळपासाठी भाडे तत्त्वावर देण्यात आला होता. नियमित भाडे भरत असताना करार खंडित करण्यासाठी ३० दिवस आधी कोणतीही कायदेशीर नोटीस दिली नाही किंवा या व्यवहाराची प्राधिकृत अधिकाऱ्यांस पूर्वकल्पना दिली नाही. कारखाना बंद झाल्यानंतरच त्याचा कायदेशीररित्या ताब्यात घेता येतो. तो चालू असेल, तर कारवाई बेकायदेशीर ठरते. उत्पादित माल साखर व सर्व उपपदार्थ हे भाडेकरूंच्याच मालकीचे असून, त्याची योग्य मोजदाद लेखी प्रक्रियेनुसार करून ताबा देणे-घेण्याची प्रक्रिया करावी लागते. स्टोअर मालाच्या किमतीच्या वसुलीबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे. सर्व बिले पाणीपट्टी, रेक्सेसेस भाडेकरूनी भरलेची खातरजमा करण्याची गरज आहे. भाडेकाळात कोणतीही विनापरवाना गुंतवणूक केली असल्यास कोणताही दावा अथवा येणे-देणे नसल्याबाबतची चौकशी करून तसा दाखला घेणे अपेक्षित आहे. या सर्व बाबींची खातरजमा केल्यानंतर संचालक मंडळाचे सभेत निर्णय घेऊन मग भाडेकरार रद्द करण्याबाबत शासनास निर्णय कळविणे गरजेचे आहे. याबाबत या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. (वार्ताहर)राज्य बॅँक अनभिज्ञ : परस्पर व्यवहारसुप्रिम कोर्टानेही या व्यवहाराबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. गणपती कृषी संघ व अ‍ॅग्रो या दोन्ही भागीदार संस्थांची मालमत्ता विकत घेण्याबाबतची आर्थिक स्थिती तपासून जिल्हा उपनिबंधकांनी त्यास मान्यता दिली आहे का?, साखर आयुक्तांची प्रशासकीय मान्यता आहे का? दोन्ही संस्थांच्या भागीदारी व्यवहाराचे ठराव व त्यास प्रशासकीय मान्यता आहे का? आदी सर्व बाबी तपासून घेणे आवश्यक होते. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यापासून ते कारखाना विक्री व्यवहाराच्या प्रक्रियेअखेर स्थानिक प्राधिकृत अधिकाऱ्यांस सर्व प्रशासकीय अधिकार असतानादेखील राज्य बॅँकेच्या मुंबई येथील मुख्य कचेरीकडून आपल्या परस्परच कोणताही सहभाग न घेता परस्परच सर्व व्यवहार केले असल्याचा ठपकाही भावसार यांनी ठेवला आहे. तासगाव कारखान्याची विक्री प्रकरण हे न्यायप्रविष्ट बाब आहे. त्याबाबत न्यायालय योग्य त्या गोष्टीची खातरजमा करून निकाल देईल. आपला या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं, क ोण कशा पध्दतीच्या उलटसुलट माहितीचा प्रसार करून लोकांची दिशाभूल करतोय, याबाबत आपण काहीही बोलणार नाही. - संजयकाका पाटील, खासदार