शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

अधिकारशाहीसमोर सत्ताधारी हतबल

By admin | Updated: May 29, 2014 00:49 IST

महापालिका : खड्डे खुदाई, रस्त्यांचे पॅचवर्क, मान्सूनपूर्व तयारीत प्रशासकीय गोंधळच अधिक

सांगली : कधी उघडपणे कायद्याची पायमल्ली करून बेकायदेशीर कामांना सत्यात उतरविणारे अधिकारी कायद्यावर बोट ठेवून विकासकामांना लगाम घालत असल्याने नवा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. महापालिकेतील अधिकार्‍यांची अधिकारशाही आता सत्ताधार्‍यांची सर्वाधिक डोकेदुखी ठरली आहे. विरोधकांपेक्षा या अधिकारशाहीपुढे पदाधिकारी व सदस्य हतबल झालेले दिसत आहेत. दुसरीकडे अनेक अधिकार्‍यांनी शेरेबाजीचे हत्यार वापरून नागरिकांना वेठीस धरले आहे. शहरातील नैसर्गिक नाल्यांवर झालेली बेकायदा बांधकामे, पार्किंगच्या जागांवर सुरू असलेले व्यवसायिक गाळे, पूरपट्ट्यात पडणारे भराव, अतिक्रमणांना दिलेले परिपूर्तता प्रमाणपत्र अशा अनेक गोष्टी तत्कालीन प्रशासकीय अधिकार्‍यांच्या खाबुगिरीचा पुरावा देत आहेत. शासनाने केलेल्या विशेष लेखापरीक्षणात अधिकार्‍यांवर ओढण्यात आलेले ताशेरेही बरेच काही सांगून जातात. महापालिकेत आता अचानक कायद्याच्या रक्षणकर्त्यांची फौज निर्माण झाल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे. कोणत्याही कामाच्या फायलीवर ‘या गोष्टी गरजेच्या आहेत का’, असा सवाल उपस्थित करण्यात येतो. अधिकार्‍यांच्या शेरेबाजीची नवी परंपरा महापालिकेत जन्माला आली असल्याने शहराची ही अवस्था आहे. वर्कआॅर्डर दिल्यानंतरही एखादे काम सुरू होत नसेल तर पाणी कुठेतरी मुरत असणार हे निश्चित मानले जाते. वर्कआॅर्डर किंवा निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ते काम होत नसल्याने सत्ताधार्‍यांचा पारा चढला आहे. आयुक्त अजित कारचे यांनीही अनेक अधिकार्‍यांना खडसावलेसुद्धा. तरीही प्रशासकीय गाडी गुंठेवारीच्या चिखलात रुतावी त्याप्रमाणे रुतली आहे. पदाधिकारी आणि महापालिकेतील सत्ताधारी सदस्य अधिकारशाहीसमोर हतबल दिसत आहेत. अधिकारी आणि सदस्यांचा संघर्ष महाआघाडीच्या काळापासून सुरू आहे. कॉंग्रेसची महापालिकेत सत्ता आल्यानंतरही अधिकार्‍यांनी विरोधी पक्षाप्रमाणे आंदोलनाचा घाट घातला होता. पदाधिकार्‍यांकडे किंवा एखाद्या सदस्याकडे बोट करण्यापेक्षा अधिकार्‍यांनी नागरिकांचे हाल व गैरसोय पाहून मार्ग काढणे अपेक्षित असताना ते शेरेबाजीत रमले आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या सर्व कामे ठप्प आहेत. मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम करताना अधिकार्‍यांनी अक्षरश: नाटक केले. आजही शहरातील नाले कचर्‍याने भरलेले आहेत. गटारी तुंबलेल्या आहेत. बांधकाम परवान्याच्या फायलींवर महिनोन्महिने स्वाक्षर्‍या केल्या जात नाहीत. नागरिकांना दाखल्यांसाठी, कामांसाठी हेलपाटे मारावे लागतात. अशा अनेक जाचामुळे नागरिकांनी सत्ताधार्‍यांनाही जबाबदारी धरण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांमधील संताप वाढत आहेत. या संतापास तोंड देताना पदाधिकारी व सदस्यांची गोची झाली आहे. (प्रतिनिधी)