शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अधिकारशाहीसमोर सत्ताधारी हतबल

By admin | Updated: May 29, 2014 00:49 IST

महापालिका : खड्डे खुदाई, रस्त्यांचे पॅचवर्क, मान्सूनपूर्व तयारीत प्रशासकीय गोंधळच अधिक

सांगली : कधी उघडपणे कायद्याची पायमल्ली करून बेकायदेशीर कामांना सत्यात उतरविणारे अधिकारी कायद्यावर बोट ठेवून विकासकामांना लगाम घालत असल्याने नवा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. महापालिकेतील अधिकार्‍यांची अधिकारशाही आता सत्ताधार्‍यांची सर्वाधिक डोकेदुखी ठरली आहे. विरोधकांपेक्षा या अधिकारशाहीपुढे पदाधिकारी व सदस्य हतबल झालेले दिसत आहेत. दुसरीकडे अनेक अधिकार्‍यांनी शेरेबाजीचे हत्यार वापरून नागरिकांना वेठीस धरले आहे. शहरातील नैसर्गिक नाल्यांवर झालेली बेकायदा बांधकामे, पार्किंगच्या जागांवर सुरू असलेले व्यवसायिक गाळे, पूरपट्ट्यात पडणारे भराव, अतिक्रमणांना दिलेले परिपूर्तता प्रमाणपत्र अशा अनेक गोष्टी तत्कालीन प्रशासकीय अधिकार्‍यांच्या खाबुगिरीचा पुरावा देत आहेत. शासनाने केलेल्या विशेष लेखापरीक्षणात अधिकार्‍यांवर ओढण्यात आलेले ताशेरेही बरेच काही सांगून जातात. महापालिकेत आता अचानक कायद्याच्या रक्षणकर्त्यांची फौज निर्माण झाल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे. कोणत्याही कामाच्या फायलीवर ‘या गोष्टी गरजेच्या आहेत का’, असा सवाल उपस्थित करण्यात येतो. अधिकार्‍यांच्या शेरेबाजीची नवी परंपरा महापालिकेत जन्माला आली असल्याने शहराची ही अवस्था आहे. वर्कआॅर्डर दिल्यानंतरही एखादे काम सुरू होत नसेल तर पाणी कुठेतरी मुरत असणार हे निश्चित मानले जाते. वर्कआॅर्डर किंवा निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ते काम होत नसल्याने सत्ताधार्‍यांचा पारा चढला आहे. आयुक्त अजित कारचे यांनीही अनेक अधिकार्‍यांना खडसावलेसुद्धा. तरीही प्रशासकीय गाडी गुंठेवारीच्या चिखलात रुतावी त्याप्रमाणे रुतली आहे. पदाधिकारी आणि महापालिकेतील सत्ताधारी सदस्य अधिकारशाहीसमोर हतबल दिसत आहेत. अधिकारी आणि सदस्यांचा संघर्ष महाआघाडीच्या काळापासून सुरू आहे. कॉंग्रेसची महापालिकेत सत्ता आल्यानंतरही अधिकार्‍यांनी विरोधी पक्षाप्रमाणे आंदोलनाचा घाट घातला होता. पदाधिकार्‍यांकडे किंवा एखाद्या सदस्याकडे बोट करण्यापेक्षा अधिकार्‍यांनी नागरिकांचे हाल व गैरसोय पाहून मार्ग काढणे अपेक्षित असताना ते शेरेबाजीत रमले आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या सर्व कामे ठप्प आहेत. मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम करताना अधिकार्‍यांनी अक्षरश: नाटक केले. आजही शहरातील नाले कचर्‍याने भरलेले आहेत. गटारी तुंबलेल्या आहेत. बांधकाम परवान्याच्या फायलींवर महिनोन्महिने स्वाक्षर्‍या केल्या जात नाहीत. नागरिकांना दाखल्यांसाठी, कामांसाठी हेलपाटे मारावे लागतात. अशा अनेक जाचामुळे नागरिकांनी सत्ताधार्‍यांनाही जबाबदारी धरण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांमधील संताप वाढत आहेत. या संतापास तोंड देताना पदाधिकारी व सदस्यांची गोची झाली आहे. (प्रतिनिधी)