शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

आरटीओ कार्यालय हक्काच्या जागेत नेणार

By admin | Updated: January 9, 2015 00:14 IST

दशरथ वाघोले यांचा संकल्प

सांगलीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी (आरटीओ) दशरथ वाघोले यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. औरंगाबाद, मध्य मुंबई, ठाणे, गोंदिया आणि आता सांगली असा त्यांच्या सेवेचा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे. सांगलीला पहिल्यांदाच अत्यंत तरुण आरटीओ लाभला आहे. त्यांची कामाची पद्धत, कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करून देणारे हे कार्यालय अजूनही भाड्याच्या जागेत आहे, याविषयी ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...थेट   संवाद प्रश्न : दोन दिवसात तुम्हाला कार्यालयात प्रामुख्याने कोणती गैरसोय दिसून आली?उत्तर : सांगली जिल्ह्यात प्रथमच आलो आहे. मी मूळचा पुण्याचा असल्याने मला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बारीक-सारीक विषयांची माहिती आहे. त्यामुळे येथे काम करण्यास कोणतीही अडचण भासणार नाही. शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करून देणारा हा विभाग आहे. दररोज विविध कामांसाठी शेकडो लोक येतात. सांगलीचे कार्यालय पाहिले, तर लोकांसाठी खूपच गैरसोयीचे आहे. अनेक विभाग सावळी कार्यालयात आहेत. एखादे काम घेऊन लोकांना यायचे म्हटले, तर त्यांचा संपूर्ण दिवस जातो. यामध्ये बदल करण्यासाठी कार्यालयास हक्काची जागा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रथमप्राधान्य दिले जाईल. तत्कालीन आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग यांनीही जागेसाठी खूप प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. या विषयात त्यांचीही मदत घेतली जाईल. येत्या सहा महिन्यात हा प्रश्न मार्गी लावला जाईल.  प्रश्न : तुमच्या कामाची पद्धत कशी असेल? उत्तर : प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते. माझीही पद्धत कृतीतून दिसून येईलच. ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न फार गंभीर आहे. यावर कारवाई होते, मात्र ती पुरेशी ठरत नाही. जिल्ह्याच्या सीमाभागातून सांगलीत ओव्हरलोड वाहतूक होते. ती रोखण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार केले जाईल. गरज वाटल्यास मीही कारवाईसाठी रस्त्यावर उतरेन. प्रवासी वाहतुकीस विरोध नाही. मात्र क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक चालू देणार नाही. तसे आढळून आल्यास वाहन जप्त केले जाईल. या कारवाईसाठी विशेष पथक नियुक्त केले जाईल.  प्रश्न : पोलिसांच्या काही मोहिमांमुळे अपघातांना आळा बसला आहे. तुमच्याकडे काही कल्पना आहेत का?उत्तर : वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; पण अपवाद वगळता रस्त्यांची लांबी-रुंदी तेवढीच आहे. अपघात होणाऱ्या नवीन व जुन्या ठिकाणांचा अभ्यास केला जाईल. याठिकाणी गतिरोधक बसविले जातील. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांप्रमाणे आमचीही स्वतंत्र मोहीम सुरू केली जाईल. त्याची सुरुवात सांगलीतून केली जाईल. यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल. प्रश्न : रस्ता सुरक्षा पंधरवडा पुढील आठवड्यात आहे. यामध्ये नवीन काय राबविणार आहात?उत्तर : रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून देण्यावर भर असेल. वाहतूक नियमांचे धडे शाळेतूनच मिळाले तर, भविष्यात त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. पाचवी ते सातवी व आठवी, दहावी अशा दोन मोठ्या गटात चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. वाहतूक नियमांचे पालन याविषयी मोठ्या महाविद्यालयांत व्याख्याने आयोजित केली आहेत.प्रश्न : एजंटांकडून फाईल आल्याशिवाय कार्यालयातील कर्मचारी काम करीत नाहीत, असा सातत्याने का आरोप होतो?उत्तर : आरटीओ कार्यालयाबाहेर एजंट आहेत का अन्य कोणी, हे समजत नाही. त्यांच्याशी आमचा काहीही संबंध येत नाही. नागरिकांनी त्यांची कामे स्वत: घेऊन यावीत. ती पूर्ण केली जातील. अधिकारी व कर्मचारी दाद देत नसतील तर, थेट माझ्याशी संपर्क साधावा. कोणतेही काम असो, ते पूर्ण कसे करायचे, अर्ज कसा भरायचा, याची नागरिकांना त्वरित माहिती मिळावी, याची लवकरच सोय केली जाईल. नागरिकांची कार्यालयाविषयी कुठेही तक्रार राहणार नाही, याची खबरदारी घेऊन काम केले जाईल. - सचिन लाड