शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

पूरबाधित गावांचा २५ मेपर्यंत अहवाल द्या

By admin | Updated: May 16, 2015 00:03 IST

शेखर गायकवाड : आपत्ती व्यवस्थापनात हयगय केल्यास कारवाई करणार

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठी असलेली ९३ गावे पूरबाधित असून या ठिकाणी १ जूनपासून २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहे. यासाठी पूरबाधित गावांचा आपत्ती व्यवस्थापनाबाबत आराखडा तयार करून तो २५ मेपूर्वी जिल्हा प्रशासनास सादर करावा. या कामात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी दिला.यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गायकवाड म्हणाले, मिरज तालुक्यातील २१, पलूस तालुक्यातील २६ ,वाळवा तालुक्यातील ३७ आणि शिराळा तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवली, तर जनतेला वास्तव माहिती मिळणे आवश्यक आहे. याकरिता पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी धरणातील पाणीसाठा, नदीतील पाण्याची पातळी याची ताजी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर करावी. आपत्ती निवारणाचे साहित्य सज्ज ठेवावे. पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी आलमट्टी धरणातून पाण्याचा योग्य विसर्ग होण्यासाठी कर्नाटक राज्यातील पाटबंधारे विभागाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती यावेळी पाटबंधारे मंडळाचे उपकार्यकारी अभियंता आर. एल. कोळी यांनी दिली.बैठकीस आ. अनिल बाबर, आ. विलासराव जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)