शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

प्राथमिक शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST

प्रशासनाचेही दुर्लक्ष : संगणकावर चोरट्यांचा डोळा; पालकांत चिंतेचे वातावरण

पारे : शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातून संगणक खरेदी होत असला तरी, त्याला ग्रामीण भागातील पालकांच्या मदतीचा आधार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या प्राथमिक शाळांत लाखो रुपये खर्चून संगणकाचे सेट आणण्यात आले आहेत. परंतु, या किमती संगणकांवर चोरट्यांनी डोळा ठेवून संगणक रातोरात लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक शाळांना सुरक्षा रक्षकच काय, पण साधा शिपाईही नसल्याने प्राथमिक शाळांची सुरक्षा आता रामभरोसे झाली आहे.विटा शहरासह खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात १०५ प्राथमिक शाळा आहेत. प्राथमिक शिक्षण प्रणालीत बदल घडले आहेत. चार भिंतींच्या आत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देणे आता बाजूला जाऊ लागले असून, त्याची जागा संगणकाने घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळपास ४० हून अधिक प्राथमिक शाळांत डिजिटल प्रोजेक्ट आहेत. हे प्रोजेक्ट लोकवर्गणीतून उभे राहिले आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळांतील चिमुरड्यांची बोटे की-बोर्डवर फिरू लागली आहेत. खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक शाळांत कमीत कमी सहा ते सात संगणक सेट आहेत. बऱ्याच प्राथमिक शाळांच्या इमारती जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे दरवाजे, कौले व अन्य बांधकाम कमजोर झाले आहे. त्याचा गैरफायदा चोरटे घेऊ लागले आहेत. लोकवस्तीपासून थोड्या दूर असलेल्या शाळांची कुलपे व दरवाजे तोडून अज्ञात चोरटे संगणक, होम थिएटर्स, माध्यान्ह भोजनाची भांडी, तेल, तांदूळ यासह अन्य साहित्य हातोहात लंपास करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांसह पालकांतही चिंतेचे वातावरण पसरले आहे.तालुक्यातील प्राथमिक शाळांत सत्र दोनची तयारी सुरू आहे. परीक्षा संपल्यानंतर दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी असल्याने त्या कालावधित शाळा बंद राहतात. त्यामुळे किमती संगणक व अन्य साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत शिक्षकांतूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांतील संगणक व अन्य साहित्याची सुरक्षा आता प्रशासनाच्या जाचक नियमांमुळे रामभरोसे झाली आहे. प्राथमिक शाळांतील किमती संगणकांसह अन्य साहित्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पालकांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)किमती संगणक व अन्य साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत शिक्षकांतूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांतील संगणक व अन्य साहित्याची सुरक्षा आता प्रशासनाच्या जाचक नियमांमुळे रामभरोसे झाली आहे.शाळांची कुलपे व दरवाजे तोडून संगणक पळविले जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या साहित्याच्या सुरक्षेबाबत प्रशासनानेच ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.