शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

प्राथमिक शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST

प्रशासनाचेही दुर्लक्ष : संगणकावर चोरट्यांचा डोळा; पालकांत चिंतेचे वातावरण

पारे : शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातून संगणक खरेदी होत असला तरी, त्याला ग्रामीण भागातील पालकांच्या मदतीचा आधार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या प्राथमिक शाळांत लाखो रुपये खर्चून संगणकाचे सेट आणण्यात आले आहेत. परंतु, या किमती संगणकांवर चोरट्यांनी डोळा ठेवून संगणक रातोरात लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक शाळांना सुरक्षा रक्षकच काय, पण साधा शिपाईही नसल्याने प्राथमिक शाळांची सुरक्षा आता रामभरोसे झाली आहे.विटा शहरासह खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात १०५ प्राथमिक शाळा आहेत. प्राथमिक शिक्षण प्रणालीत बदल घडले आहेत. चार भिंतींच्या आत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देणे आता बाजूला जाऊ लागले असून, त्याची जागा संगणकाने घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळपास ४० हून अधिक प्राथमिक शाळांत डिजिटल प्रोजेक्ट आहेत. हे प्रोजेक्ट लोकवर्गणीतून उभे राहिले आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळांतील चिमुरड्यांची बोटे की-बोर्डवर फिरू लागली आहेत. खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक शाळांत कमीत कमी सहा ते सात संगणक सेट आहेत. बऱ्याच प्राथमिक शाळांच्या इमारती जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे दरवाजे, कौले व अन्य बांधकाम कमजोर झाले आहे. त्याचा गैरफायदा चोरटे घेऊ लागले आहेत. लोकवस्तीपासून थोड्या दूर असलेल्या शाळांची कुलपे व दरवाजे तोडून अज्ञात चोरटे संगणक, होम थिएटर्स, माध्यान्ह भोजनाची भांडी, तेल, तांदूळ यासह अन्य साहित्य हातोहात लंपास करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांसह पालकांतही चिंतेचे वातावरण पसरले आहे.तालुक्यातील प्राथमिक शाळांत सत्र दोनची तयारी सुरू आहे. परीक्षा संपल्यानंतर दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी असल्याने त्या कालावधित शाळा बंद राहतात. त्यामुळे किमती संगणक व अन्य साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत शिक्षकांतूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांतील संगणक व अन्य साहित्याची सुरक्षा आता प्रशासनाच्या जाचक नियमांमुळे रामभरोसे झाली आहे. प्राथमिक शाळांतील किमती संगणकांसह अन्य साहित्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पालकांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)किमती संगणक व अन्य साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत शिक्षकांतूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांतील संगणक व अन्य साहित्याची सुरक्षा आता प्रशासनाच्या जाचक नियमांमुळे रामभरोसे झाली आहे.शाळांची कुलपे व दरवाजे तोडून संगणक पळविले जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या साहित्याच्या सुरक्षेबाबत प्रशासनानेच ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.