शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

सहा वर्षे लटकला खोक्यांचा प्रश्न...लोकमत विशेष

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

सांगलीतील स्थिती : सातशे खोकी अधांतरी

अंजर अथणीकर-सांगली -अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी राष्ट्रपती दौऱ्याचे निमित्त करून सांगलीतील सुमारे ४ हजार खोकी हटविण्यात आली होती. यामधील अधिकृत सातशे खोक्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. शहरातील पाच ठिकाणी खोकीधारकांनी पर्यायी जागा सुचवली असताना, हा प्रस्ताव प्रशासकीय दरबारी रखडला आहे. हक्काची जागा मिळावी यासाठी खोकीधारकांचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. दरम्यान, स्टेशन चौकातील पुनर्वसनाच्या जागी ९९ वर्षांच्या कराराने खोकी द्यावीत, या मागणीसाठीही खोकीधारक अडून बसल्याने १८३ जणांचा प्रश्नही रखडला आहे.सांगलीतील ४ हजार ३०० खोकी काढण्यात आली होती. यामधील अडीच हजार खोकी ही अधिकृत धरण्यात आली होती. या खोक्यांचे मालक महापालिकेकडे रितसर वार्षिक भाडे भरत होते. या अडीच हजारमधील अठराशे खोक्यांचे सांगलीतील विविध भागात पुनर्वसन करण्यात आले आहे. यामधील सातशे खोक्यांचे मात्र पुनर्वसन रखडले आहे. या सातशे खोकीधारकांनी आपले पुनर्वसन सिव्हिल हॉस्पिटल परिसर, कोल्हापूर रोडवरील ज्योतिरामदादा कुस्ती आखाडा, ईदगाह मैदान, वाहन तळ आदी ठिकाणची जागा सुचवली आहे. तत्कालीन आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी या चार जागांवर पुनर्वसनासाठी मान्यता दिली होती. तशी चर्चाही चालू होती. महासभेत मंजुरीसाठी प्रस्ताव करण्यात आला होता; मात्र अनेकांनी याला विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला. आता या जागांसाठी खोकी संघर्ष समितीने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. स्टेशन चौकात जागा विकसित करून ४०० गाळे बांधून घेण्यात आले. या गाळ्यांचे वाटप बरेच दिवस झाले नव्हते. सुरुवातीला १६४ आणि नंतर ७२ गाळ्यांचे वाटप झाले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी १८३ गाळ्यांचा ड्रॉ काढण्यात आला आहे. पूर्वी दिलेल्या गाळ्यांतून व्यवसाय सुरू झाला आहे. पण अजूनही एकाही गाळेधारकाशी महापालिकेने करारपत्र केलेले नाही. त्यांना २९ वर्षांऐवजी ९९ वर्षांनी गाळे ताब्यात हवे आहेत. ठरावाच्या प्रशासकीय अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह...मराठी साहित्य संमेलनावेळी राष्ट्रपतींच्या दौऱ्याचे निमित्त करून सांगली व मिरजेतील हजारो खोकी हटविण्यात आली. त्यांच्या पुनर्वसनाची हमी महापालिकेने दिली होती. त्यातून काही खोक्यांचे पुनर्वसन झाले, तर काही खोकीधारक आजही रस्त्याच्या कडेला व्यवसाय करीत आहेत. सातशे खोकीधारकांनी चार ठिकाणी पर्यायी जागा महापालिकेला सुचवल्या आहेत. दरम्यान, स्टेशन चौकात विकसित करण्यात आलेल्या इमारतीमध्ये आता करारपत्राद्वारे भाडेतत्त्वाने गाळे देण्याऐवजी कायमस्वरुपी गाळे द्यावेत, अशी मागणी लावून धरली आहे. पण करारपत्र किती वर्षासाठी? यावरून महापालिका आणि खोकीधारकांमध्ये वाद निर्माण झाल्याने हे गाळे अद्याप मोकळे पडले आहेत. कायदा म्हणतो...मुंबई महापालिका अधिनियम कलम ७९ (ब) नुसार आयुक्तांना स्थायीच्या मंजुरीने महापालिकेच्या मालकीच्या जंगम मालमत्तेचे मूल्य पाच हजारहून अधिक नसेल, अशा कोणत्याही मालमत्तेचा विनियोग करून, भाड्याने देऊन व अन्यप्रकारे करता येईल. उपरोक्त असा कोणताही हक्क धरून महापालिकेच्या मालकीची कोणतीही मालमत्ता एका वर्षाहून अधिक अशा कालावधीसाठी, तसेच मंजुरी घेऊन भाडेपट्ट्याने देता येईल किंवा जिथे अधिमूल्य पन्नास हजारहून अधिक नसेल, अशी महापालिकेच्या मालकीची कोणतीही स्थावर मालमत्ता विकता येईल किंवा कायमच्या भाडेपट्ट्याने देता येईल. सहा वर्षांपासून सातशे खोकीधारकांचे पुनर्वसन रखडले आहे. आता पुन्हा एकदा महापालिकेच्या प्रशासकीय दरबारी संघर्ष करणार आहे. त्यांचे पुनर्वसन करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी शहरातील चार ते पाच पर्यायी जागाही सुचवण्यात आल्या आहेत. त्याचठिकाणी आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. -अजित सूर्यवंशी, अध्यक्ष, खोकी मालक संघटना