शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

पुणदी सिंचन योजना बंदच!

By admin | Updated: November 25, 2014 23:47 IST

कोट्यवधीचा खर्च : योजना सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

संजयकुमार चव्हाण = मांजर्डे तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी भागाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन सुरू करण्यात आलेली पुणदी उपसा सिंचन योजना गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे ही योजना कधी सुरू होणार? अशी चर्चा आरवडे, बलगवडे आदी गावांतून होताना दिसत आहे.पुणदी उपसा सिंचन योजना ही तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करुन सुरू करण्यात आली होती. केवळ १३ महिन्यात ही योजना पूर्ण करुन विधानसभेपूर्वी सुरू केली होती. या योजनेचा फायदा पूर्व भागातील शेतीला होणार असल्याने या भागातील बळिराजा सुखावला होता. पूर्व भागातील सात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तब्बल १७ गावांना या योजनेचा फायदा होणार आहे, असे चित्र होते. ही योजना सुरू झाल्यावर या भागातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जोमाने द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. ऊस, गहू, भाजीपाला आदी पिकांची लागण केली आहे. परंतु गेल्या दीड महिन्यापासून ही योजना बंद असल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी लोढे, सिद्धेवाडी तलावामध्ये सोडण्यात आले आहे. आरवडे, डोर्ली आदी गावांची शेती लोढे तलावावरच अवलंबून आहे. परंतु रब्बी हंगाम सुरु झाल्याने या तलावातून पाणी उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन महिन्यात या तलावातील पाणी पातळी कमी होणार आहे. लोढे तलावाची क्षमता १६६.७० द.ल.घ.फूट आहे, तर त्यामध्ये उपलब्ध पाणीसाठा १०५.५९ द.ल.घ.फूट आहे. तसेच या तलावामधून राष्ट्रीय पेयजल योजनेतून आरवडे व चिंचणी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या दोन योजना सुरू आहेत. त्यासाठी ११.०८ द.ल.घ.फूट पाणी आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे पुणदी उपसा सिंचन योजना सुरू होणे गरजेचे आहे.पुणदी उपसा सिंचन योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी काही शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता, पाणी मागणी अर्ज आल्याशिवाय योजना सुरू होणार नाही, असे सांगण्यात येते. तसेच त्यासाठी लागणारी रक्कम ही शेतकऱ्यांनी भरावयाची आहे, तरच ही योजना पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. शेतकरी अडचणीत२००० पासून तीनवेळा दुष्काळाचा सामना या भागातील शेतकरी करीत आहेत. हजारो एकर बागायती क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते. पण पुन्हा एकदा या योजनेमुळे शेतकऱ्यांनी जोमाने बागायती शेती उभी केली आहे.द्राक्ष, ऊस, भाजीपाला ही प्रमुख पिके या भागातून घेतली जातात. योजना चालू झाली नाही, तर या भागातील शेतीचे नुकसान पुन्हा एकदा होऊ शकते.१५ दिवसांपूर्वी आरफळच्या कालव्यातून पाणी सुरू होते. परंतु त्यावेळी ही योजना सुरू केली गेली नाही.