शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

पुणदी सिंचन योजना बंदच!

By admin | Updated: November 25, 2014 23:47 IST

कोट्यवधीचा खर्च : योजना सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

संजयकुमार चव्हाण = मांजर्डे तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी भागाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन सुरू करण्यात आलेली पुणदी उपसा सिंचन योजना गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे ही योजना कधी सुरू होणार? अशी चर्चा आरवडे, बलगवडे आदी गावांतून होताना दिसत आहे.पुणदी उपसा सिंचन योजना ही तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करुन सुरू करण्यात आली होती. केवळ १३ महिन्यात ही योजना पूर्ण करुन विधानसभेपूर्वी सुरू केली होती. या योजनेचा फायदा पूर्व भागातील शेतीला होणार असल्याने या भागातील बळिराजा सुखावला होता. पूर्व भागातील सात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तब्बल १७ गावांना या योजनेचा फायदा होणार आहे, असे चित्र होते. ही योजना सुरू झाल्यावर या भागातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जोमाने द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. ऊस, गहू, भाजीपाला आदी पिकांची लागण केली आहे. परंतु गेल्या दीड महिन्यापासून ही योजना बंद असल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी लोढे, सिद्धेवाडी तलावामध्ये सोडण्यात आले आहे. आरवडे, डोर्ली आदी गावांची शेती लोढे तलावावरच अवलंबून आहे. परंतु रब्बी हंगाम सुरु झाल्याने या तलावातून पाणी उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन महिन्यात या तलावातील पाणी पातळी कमी होणार आहे. लोढे तलावाची क्षमता १६६.७० द.ल.घ.फूट आहे, तर त्यामध्ये उपलब्ध पाणीसाठा १०५.५९ द.ल.घ.फूट आहे. तसेच या तलावामधून राष्ट्रीय पेयजल योजनेतून आरवडे व चिंचणी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या दोन योजना सुरू आहेत. त्यासाठी ११.०८ द.ल.घ.फूट पाणी आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे पुणदी उपसा सिंचन योजना सुरू होणे गरजेचे आहे.पुणदी उपसा सिंचन योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी काही शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता, पाणी मागणी अर्ज आल्याशिवाय योजना सुरू होणार नाही, असे सांगण्यात येते. तसेच त्यासाठी लागणारी रक्कम ही शेतकऱ्यांनी भरावयाची आहे, तरच ही योजना पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. शेतकरी अडचणीत२००० पासून तीनवेळा दुष्काळाचा सामना या भागातील शेतकरी करीत आहेत. हजारो एकर बागायती क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते. पण पुन्हा एकदा या योजनेमुळे शेतकऱ्यांनी जोमाने बागायती शेती उभी केली आहे.द्राक्ष, ऊस, भाजीपाला ही प्रमुख पिके या भागातून घेतली जातात. योजना चालू झाली नाही, तर या भागातील शेतीचे नुकसान पुन्हा एकदा होऊ शकते.१५ दिवसांपूर्वी आरफळच्या कालव्यातून पाणी सुरू होते. परंतु त्यावेळी ही योजना सुरू केली गेली नाही.