शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

खंडेराजुरीत २० गुंठ्यात ५ हजार द्राक्षपेट्यांचे उत्पादन

By admin | Updated: January 30, 2015 23:17 IST

अशोक माळी यांचा विक्रम : कृषी अधिकाऱ्यांनी द्राक्षबागेची केली पाहणी

मालगाव : बदलत्या वातावरणामुळे द्राक्षशेतीचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे चित्र असताना, मालगाव येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अशोक माळी यांनी अवघ्या वीस गुंठे जमिनीत माणिक चमन जातीच्या ५ हजार पेटी द्राक्षाचे उत्पादन घेऊन आतापर्यंतच्या द्राक्ष उत्पादनाचा विक्रम मागे टाकला आहे. डॉ. माळी यांच्या द्राक्ष उत्पादनाच्या विक्रमाची कृषी विभागाने दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी या बागेला भेट देऊन पाहणी केली.मिरज पूर्व भागातील खंडेराजुरी-कुकटोळी रस्त्यालगत असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी डॉ. अशोक माळी यांची शेतजमीन आहे. या भागात पाण्याचे स्रोत कमी असताना त्यांनी वातावरणाचा अभ्यास करुन २० गुंठे जमिनीत माणिक चमन जातीच्या द्राक्ष झाडांची लागण केली. रासायनिक खतांचा अल्प प्रमाणात मात्र जादा सेंद्रीय खतांचा वापर करीत माळरानावर बाग फुलविली. माणिक चमन जातीच्या या बागेतून त्यांनी विक्रमी द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी २० गुंठ्यातील ५०० झाडांना प्रत्येकी २५ काड्या व प्रत्येक काडीस दोनच घड ठेवले. या बागेतील उतरणीस आलेल्या प्रत्येक घडाचे शंभर दिवसात एक किलो वजन आहे. २० गुंठ्यात ५ हजार पेटी द्राक्ष उत्पादन घेणारच, असा त्यांचा विश्वास आहे. द्राक्ष उत्पादनातील आतापर्यंतचा एकरी सात हजारपर्यंत द्राक्षपेटीचा विक्रम आहे. वीस गुंठ्यात पाच हजार पेटी द्राक्ष उत्पादन घेऊन द्राक्ष उत्पादनातील आतापर्यंतचा विक्रम त्यांनी मागे टाकला आहे. डॉ. माळी यांनी घेतलेल्या या विक्रमी द्राक्ष उत्पादनाची तालुका कृषी विभागाने दखल घेतली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी एच. एस. मेढीदार व कृषी सहायक व्ही. एस. सूर्यवंशी यांनी द्राक्षबागेला भेट देऊन पाहणी केली.त्यांनी या नव्या विक्रमाची माहिती घेतली. परिसरातील द्राक्ष बागायतदारही या बागेला भेट देऊन, माळी यांच्याकडून खतांचा वापर व इतर उपाययोजनांची माहिती घेत आहेत. डॉ. माळी यांनी द्राक्षाबरोबरच कमी पाण्यात व सेंद्रीय खतांवर आंबा तसेच केळीचेही विक्रमी उत्पादन घेतले आहे. (वार्ताहर)द्राक्षबागेसाठी नियोजन महत्त्वाचे : माळी द्राक्षबागेत रासायनिक खतांचा जादा वापर टाळून सेंद्रीय खतांवर भर द्यावा. बागेतील पानांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवण्याबरोबरच औषधांच्या अधिक प्रमाणात फवारण्या न घेता आवश्यकतेनुसार कराव्यात. द्राक्षझाडाच्या मुळाशी तुटलेली पाने तसेच केळीची तुटलेली खुटे टाकून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी करता येते. त्यामुळे कमी पाण्यात द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेता येते. बदलत्या वातावरणाचा अभ्यास करुन तातडीने उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. सेंद्रीय खते द्राक्षशेतीला अधिक उपयुक्त असल्याचे डॉ. अशोक माळी यांनी सांगितले.