शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

कायद्यातील बदलाने राजकारण बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 01:02 IST

सहकार विभाग : अध्यादेश नसल्याने निर्णयाबाबत नेत्यांत संभ्रम

अविनाश कोळी-- सांगली --सहकार कायद्यातील नव्या बदलाचे परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकारणावर होण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर्वीच्या बरखास्त बँकांसाठीही हा नियम लागू झाल्यास जिल्ह्यातील अनेक दिग्गज राजकारण्यांना सहकारातील राजकारणापासून दहा वर्षे लांब राहावे लागणार आहे. अद्याप निर्णयाबाबत स्पष्ट माहिती नसल्याने राजकारण्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतरच सहकारात काम करणाऱ्या राजकारण्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 च्या कलम ७३ (क) अ मध्ये नव्याने कलम समाविष्ट करण्याचा निर्णय मंगळवारी घेतल्याने सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. सहकारी बँका अवसायनात निघण्याचे सांगली जिल्ह्यातील प्रमाण मोठे आहे. अनेक मोठ्या बँका अवसायनात निघाल्या आहेत. त्याठिकाणी आता प्रशासकांचा कारभार सुरू आहे. त्यामुळे सहकारातील भ्रष्ट कारभाराची याठिकाणची प्रकरणे अधिक चर्चेत आहेत. मोठमोठ्या सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या. सर्व बँकांमध्ये जिल्हा बँकेतच राजकारण्यांना सर्वाधिक रस आहे. त्यामुळे याठिकाणच्या राजकारणावर सर्वाधिक परिणाम होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँक २0१२ मध्ये बरखास्त झाली होती. यातील अनेक संचालक सध्याच्या मंडळात काम करीत आहेत. त्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम होणार की नाही, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही. केवळ नियमातील बदलाचा निर्णय झालेला आहे. तो यापूर्वीच्या बरखास्त संचालक मंडळाला लागू होणार, की निर्णयानंतरच्या कालावधीतील बँकांना लागू होणार, याची माहिती कोणालाच नाही. सहकार विभागानेही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे एकूणच निर्णयातील बारकावे अजून समोर आलेले नाहीत. त्यामुळे सहकारात विशेषत: जिल्हा बँकेत काम करणाऱ्या राजकारण्यांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम अध्यादेश लागू झाल्यानंतरच दूर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकारण्यांचे लक्ष सहकार विभागाच्या अध्यादेशाकडे लागले आहे. पूर्वीच्या बरखास्त मंडळासाठी हा निर्णय लागू झाल्यास फार मोठे राजकीय बदल सहकार क्षेत्राच्याबाबतीत होऊ शकतात. भविष्यात बरखास्त होणाऱ्या संचालक मंडळासाठी हा निर्णय लागू झाल्यास, केवळ बँकांमधील राजकारण्यांच्या व्यक्तिगत कारभाराला आळा बसू शकतो. राजकीय वर्चस्वात फारसा फरक पडणार नाही. तरीही सहकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या राजकीय मंडळींना या बदलाची धास्ती वाटू लागली आहे. सात संचालकांचा फैसला अध्यादेशानंतरजिल्हा बँक २९ मार्च २०१२ रोजी बरखास्त झाली होती. त्यावेळच्या संचालक मंडळातील विलासराव शिंदे, मोहनराव कदम, अनिल बाबर, बी. के. पाटील, डॉ. सिकंदर जमादार, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड असे सातजण विद्यमान संचालक मंडळात कार्यरत आहेत. त्यांच्याही राजकीय भवितव्याचा फैसला अध्यादेश आल्यानंतरच होणार आहे. वारसदारांचे राजकारण होणारजिल्हा बँकेच्या निवडणुकीत चौकशी फीची वसुली लागलेल्या संचालकांच्या अडचणी वाढल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना जिल्हा बॅँकेच्या राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला होता. जुन्या मंडळासाठी निर्णय लागू झाल्यास पुन्हा असाच प्रयत्न जिल्हा बॅँकेशी संबंधित व अडचणीत येणाऱ्या संचालकांकडून होऊ शकतो. राजकीय अस्तित्व टिकविण्याचे अनेक उपायही आतापासूनच शोधले जात आहेत.