शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पीक विम्यासाठी पथदर्शी प्रकल्प

By admin | Updated: March 11, 2015 00:07 IST

शेखर गायकवाड : शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणार--लोकमतचा प्रभाव

सांगली : विमा कंपन्यांच्या जाचक अटी व नियमांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. हे टाळण्यासाठी आता आपण पीक विम्यासाठी नवीन पथदर्शी प्रकल्प राबविणार आहे. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मान्यता घेण्यासाठी आपला प्रयत्न असणार असल्याची माहिती नूतन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज (मंगळवार) येथे पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, अनेक खासगी, निमशासकीय विमा कंपन्या किचकट नियम, अटी लावून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे कसे टाळता येईल, यासाठी प्रयत्न करीत असतात. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. हे टाळण्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी नवीन विमा प्रकल्प राबवणार आहे. यामुळे ठराविक हप्ते भरल्यावर शेतकऱ्यांचे सर्वच पीक, शेतीवरील सर्व उद्योग, अर्थकारणाचा यामध्ये समावेश असणार आहे. यामुळे कोणताही शेतकरी विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. किचकट नियमांचा गैरफायदा विमा कंपनी उचलणार नाही. या पथदर्शी पीक विम्यासाठी सांगली जिल्ह्यातील कोणत्याही एका तालुक्याची निवड करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच पथदर्शी प्रकल्प तयार करुन तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर तो कोणत्याही एका तालुक्यात राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर, संपूर्ण जिल्ह्यात त्यानंतर राज्यात त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी आपण शेती, पीक व नुकसानीचा अभ्यास केला आहे. यापूर्वी विमा कंपन्यांकडून मिळालेल्या नुकसान भरपाईचा व प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीचाही आपण अभ्यास केला आहे. त्यामुळे हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता आहे. तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्ये, नगदी पिकांच्या उत्पादनावर हवामानाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे शासनाने पीक विमा योजना सुरू केली, मात्र त्याचा गैरफायदा कंपन्या घेताना दिसतात. यावर नव्या प्रकल्पाने बंधने येण्यास मदत होणार आहे, अशी माहितीही शेखर गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी तक्रार करायची कुठे? हवामानावर आधारित विमा केंद्र शासनाने सुरू केले आहे. परंतु, हवामानाचा अचूक अंदाज घेणारी कोणतीही यंत्रणा विमा कंपनीकडे नसल्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या मदतीपासून वंचित राहात आहेत. याबद्दल विमा कंपनीकडे तक्रार करायची म्हटले, तर त्यांचा कारभार मुंबई येथून सुरू आहे. त्यांचे जिल्हास्तरावर कार्यालय नाही की कोण कर्मचारी नाही. यामुळे शेतकऱ्यांना विम्याविषयी अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी कुणाकडे तक्रार करायची?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल शेतकऱ्यांतून प्रचंड तक्रारी आहेत.