शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

भूतकाळातील चुकांच्या दुरुस्तीची गरज

By admin | Updated: October 12, 2015 00:32 IST

एन. डी. पाटील : रामानंदनगर महाविद्यालयात राष्ट्रीय इतिहास चर्चासत्र

पलूस : आपण कोणाचे वारस आहोत याचा विचार इतिहासात होणे आवश्यक आहे. युगा-युगांच्या काळात दक्षिणेत काय घडले याचा विचार करता, दख्खनची वाट कशीही असो, या वाटचालीत मुख्य प्रवाहांना केंद्रवर्ती मानल्यास सामान्य समाजाची अवस्था या काळात काय होती, याचा विचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.रामानंदनगर येथील आर्टस्, सायन्स अ‍ॅन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत इतिहास विषयाच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कांबळे होते. डॉ. पाटील म्हणाले की, मूठभर समाजाचा विकास होणे म्हणजे सर्वसमावेशक विकास नाही. इतिहासात काही गोष्टी आपण सतरंजीखाली ढकलतो, त्याचे उत्तर देत नाही. मात्र दख्खनच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका ठरविताना सर्वच गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. भूतकाळात आपण ज्या ठिकाणी चुकलो, त्यात दुरुस्त्या होणे अत्यावश्यक आहे. समाज एकजिनसी नव्हता, म्हणून आपण स्वराज्य गमावले. संघर्षानंतर जरी ते मिळविले असले तरी, ते टिकविण्यासाठी समाज एकजिनसी ठेवावा लागेल. समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील कांबळे म्हणाले की, दख्खनच्या पठारावर मराठी सत्तेचा उदय झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे अनेकांनी राज्य केले. मात्र सर्व राज्यात कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहूंचे संस्थान व बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचे राज्य, ही दोनच राज्ये महत्त्वाची ठरली. लोकहिताचा कारभार करताना त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या.याप्रसंगी चर्चासत्राचे बीजभाषक प्रा. डॉ. डी. एस. गायकवाड (पुणे), प्रा. डॉ. राधिका सेशन (पुणे), प्रा. डॉ. के. एल. एन. मूर्ती (विजापूर), गोपाळराव देशमुख (पंढरपूर), प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील (कोल्हापूर), प्राचार्य डॉ. आर. एस. मोरे (सावळज) आदींसह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. आर. आर. सोनावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एम. बी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. एस. एस. मारकवाड यांनी आभार मानले.