शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

भूतकाळातील चुकांच्या दुरुस्तीची गरज

By admin | Updated: October 12, 2015 00:32 IST

एन. डी. पाटील : रामानंदनगर महाविद्यालयात राष्ट्रीय इतिहास चर्चासत्र

पलूस : आपण कोणाचे वारस आहोत याचा विचार इतिहासात होणे आवश्यक आहे. युगा-युगांच्या काळात दक्षिणेत काय घडले याचा विचार करता, दख्खनची वाट कशीही असो, या वाटचालीत मुख्य प्रवाहांना केंद्रवर्ती मानल्यास सामान्य समाजाची अवस्था या काळात काय होती, याचा विचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.रामानंदनगर येथील आर्टस्, सायन्स अ‍ॅन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत इतिहास विषयाच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कांबळे होते. डॉ. पाटील म्हणाले की, मूठभर समाजाचा विकास होणे म्हणजे सर्वसमावेशक विकास नाही. इतिहासात काही गोष्टी आपण सतरंजीखाली ढकलतो, त्याचे उत्तर देत नाही. मात्र दख्खनच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका ठरविताना सर्वच गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. भूतकाळात आपण ज्या ठिकाणी चुकलो, त्यात दुरुस्त्या होणे अत्यावश्यक आहे. समाज एकजिनसी नव्हता, म्हणून आपण स्वराज्य गमावले. संघर्षानंतर जरी ते मिळविले असले तरी, ते टिकविण्यासाठी समाज एकजिनसी ठेवावा लागेल. समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील कांबळे म्हणाले की, दख्खनच्या पठारावर मराठी सत्तेचा उदय झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे अनेकांनी राज्य केले. मात्र सर्व राज्यात कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहूंचे संस्थान व बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचे राज्य, ही दोनच राज्ये महत्त्वाची ठरली. लोकहिताचा कारभार करताना त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या.याप्रसंगी चर्चासत्राचे बीजभाषक प्रा. डॉ. डी. एस. गायकवाड (पुणे), प्रा. डॉ. राधिका सेशन (पुणे), प्रा. डॉ. के. एल. एन. मूर्ती (विजापूर), गोपाळराव देशमुख (पंढरपूर), प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील (कोल्हापूर), प्राचार्य डॉ. आर. एस. मोरे (सावळज) आदींसह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. आर. आर. सोनावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एम. बी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. एस. एस. मारकवाड यांनी आभार मानले.