शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेचे दीडशे थकबाकीदार रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:56 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. यापूर्वी १०३ कर्जदार व जामीनदार यांना नोटिसा बजावल्यानंतर आता आणखी १५० जणांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा काढण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देअवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेचे दीडशे थकबाकीदार रडारवरवसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम, आता सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. यापूर्वी १०३ कर्जदार व जामीनदार यांना नोटिसा बजावल्यानंतर आता आणखी १५० जणांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा काढण्यात येणार आहेत.वसंतदादा बँकेची कर्जदारांकडे १५४ कोटी ३ लाख ८ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी मोहीम हाती घेतली आहे. ज्या कर्जदारांनी नोंद गहाण खताने मिळकत तारण दिलेली आहे, अशा मिळकती कर्ज फिटेपर्यंत बँकेकडे गहाण राहणार आहेत.

त्यामुळे सरफेसी अ‍ॅक्ट (सेक्युरिटायझेशन अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन आॅफ असेट्स अ‍ॅन्ड इन्फोर्समेंट आॅफ इंटरेस्ट अ‍ॅक्ट २००२) नुसार कारवाई करून वसुली होण्यास या प्रकरणांत वाव असल्याचे अवसायकांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे वसुली प्रक्रिया गतीने होण्यासाठी अवसायकांनी यापूर्वी १०३ लोकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांची मुदत पुढील महिन्यात संपणार असून, त्यानंतर त्यांच्यार कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर आता आणखी १५० कर्जदार व जामीनदारांची यादी तयार करण्यात आली आहे.

येत्या पंधरवड्यात त्यांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा बजावल्या जाणार आहेत. या कायद्याअंतर्गत कर्जदारांना ६० दिवसांची मुदत आहे. त्या कालावधित त्यांनी थकीत कर्ज भरले नाही, तर संबंधितांची मालमत्ता सरफेसी अ‍ॅक्ट यू/एस-९३ (४) नुसार ताब्यात घेऊन त्याची लिलावाने विक्री करण्यात येणार आहे.शिवाय ज्या कर्जदारांनी कर्ज घेतेवेळी बँकेची फसवणूक करून कर्जे घेतलेली आहेत, अशा कर्जदारांना फौजदारी कारवाई करण्याबाबत नोटिसा दिल्या जात आहेत. फौजदारी कारवाई करण्यायोग्य आणखी काही प्रकरणे आहेत का, याबाबत तपासणी करण्यात येत आहे.

नोंद गहाण खताने तारण दिलेली शेतजमीन मिळकत व वसुली दाखला मिळालेल्या कर्जदारांच्याबाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ च्या नियम-१०७ (डी-१) (५) नुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.बँकेचे अवसायक म्हणून ९ जानेवारी २०१५ रोजी जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून आजअखेर साडेसहा कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. विमा कंपनीला अजूनही ७ कोटी ९३ लाख रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रVasantdada Patilवसंतदादा पाटीलSangliसांगली