शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेचे दीडशे थकबाकीदार रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:56 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. यापूर्वी १०३ कर्जदार व जामीनदार यांना नोटिसा बजावल्यानंतर आता आणखी १५० जणांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा काढण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देअवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेचे दीडशे थकबाकीदार रडारवरवसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम, आता सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. यापूर्वी १०३ कर्जदार व जामीनदार यांना नोटिसा बजावल्यानंतर आता आणखी १५० जणांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा काढण्यात येणार आहेत.वसंतदादा बँकेची कर्जदारांकडे १५४ कोटी ३ लाख ८ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी मोहीम हाती घेतली आहे. ज्या कर्जदारांनी नोंद गहाण खताने मिळकत तारण दिलेली आहे, अशा मिळकती कर्ज फिटेपर्यंत बँकेकडे गहाण राहणार आहेत.

त्यामुळे सरफेसी अ‍ॅक्ट (सेक्युरिटायझेशन अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन आॅफ असेट्स अ‍ॅन्ड इन्फोर्समेंट आॅफ इंटरेस्ट अ‍ॅक्ट २००२) नुसार कारवाई करून वसुली होण्यास या प्रकरणांत वाव असल्याचे अवसायकांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे वसुली प्रक्रिया गतीने होण्यासाठी अवसायकांनी यापूर्वी १०३ लोकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांची मुदत पुढील महिन्यात संपणार असून, त्यानंतर त्यांच्यार कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर आता आणखी १५० कर्जदार व जामीनदारांची यादी तयार करण्यात आली आहे.

येत्या पंधरवड्यात त्यांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा बजावल्या जाणार आहेत. या कायद्याअंतर्गत कर्जदारांना ६० दिवसांची मुदत आहे. त्या कालावधित त्यांनी थकीत कर्ज भरले नाही, तर संबंधितांची मालमत्ता सरफेसी अ‍ॅक्ट यू/एस-९३ (४) नुसार ताब्यात घेऊन त्याची लिलावाने विक्री करण्यात येणार आहे.शिवाय ज्या कर्जदारांनी कर्ज घेतेवेळी बँकेची फसवणूक करून कर्जे घेतलेली आहेत, अशा कर्जदारांना फौजदारी कारवाई करण्याबाबत नोटिसा दिल्या जात आहेत. फौजदारी कारवाई करण्यायोग्य आणखी काही प्रकरणे आहेत का, याबाबत तपासणी करण्यात येत आहे.

नोंद गहाण खताने तारण दिलेली शेतजमीन मिळकत व वसुली दाखला मिळालेल्या कर्जदारांच्याबाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ च्या नियम-१०७ (डी-१) (५) नुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.बँकेचे अवसायक म्हणून ९ जानेवारी २०१५ रोजी जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून आजअखेर साडेसहा कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. विमा कंपनीला अजूनही ७ कोटी ९३ लाख रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रVasantdada Patilवसंतदादा पाटीलSangliसांगली