शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

इस्लामपुरात महायुती ठरवेल तोच उमेदवार

By admin | Updated: May 29, 2014 00:53 IST

सदाभाऊ खोत : पुन्हा ‘एक वोट एक नोट’चा नारा

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर ‘बापाने ऊस पिकवायचा, पोराने लाखो रुपये भरून जयंतरावांच्या शिक्षण संस्थेत शिकायचे आणि कमी पगारावर त्यांच्याच संस्थेत चाकरी करायची. या गुलामगिरीला इस्लामपूर मतदारसंघातील लोक कंटाळले आहेत. जयंतरावांच्या विरोधात आगामी विधानसभेला महायुती जो उमेदवार ठरवेल, त्याच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार आहे. मलाच उमेदवारी दिल्यास या धनशक्तीविरोधात पुन्हा ‘एक वोट एक नोट’चा नारा देऊन लढू’, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. सध्या ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात तळ ठोकला आहे. सामाजिक, नैमित्तिक कार्यक्रमास त्यांची उपस्थिती जाणवत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्याविरोधात कोण, अशी चर्चा सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांत सुरू आहे. दुसरीकडे मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी विरोधी पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. यावर सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले की, महायुतीतील ज्येष्ठ नेते जो उमेदवार निश्चित करतील, तोच उमेदवार जयंतरावांविरोधात राहणार आहे. जनतेतून आपली मागणी झाल्यास आपणही त्यांच्याविरोधात लढू. इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचे पारंपरिक नेतृत्व असले, तरी मतदारांना ज्या सवयी लागल्या आहेत, त्या मोडून ‘एक नोट एक वोट’ हा फॉर्म्युला घेऊन विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. या तालुक्यातील कार्यकर्ते जयंत पाटील यांच्या दबावाखाली आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांमध्ये नोकरीच्या निमित्ताने जे कामगार आहेत, त्यांना ते गुलामच असल्याचे मानतात. या तालुक्यातील ऊस उत्पादक काबाडकष्ट करून उसाचे उत्पादन घेतो. आमच्याच प्रयत्नातून त्यांना उसाला चांगला दर मिळतो. याच ऊस उत्पादकांच्या ताकदीवर साखरसम्राटांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. याच माध्यमातून ते या परिसरातील विद्यार्थ्यांना लाखो रुपये घेऊन शिकवतात. त्यामुळे येथील मतदार आपला गुलामच असल्याचे जयंत पाटील मानत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनतेने ही गुलामगिरी झुगारून टाकली आहे. आता विधानसभेलाही हीच परिस्थिती राहणार असल्याने विरोधी फळीत इच्छुकांची संख्या वाढत असली, तरी महायुतीचा जो निर्णय होईल तोच उमेदवार अंतिम राहील, असे खोत यांनी स्पष्ट केले.