शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

एका पावसाने चिखलात रुतली गुंठेवारी निधी पडून

By admin | Updated: May 29, 2014 00:51 IST

सांगली, मिरज आणि कुपवाडमधील गुंठेवारी नागरिकांचे हाल; कामे झाली ठप्प

सांगली : गुडघाभर चिखल, खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी आणि उघड्या गटारींमुळे परिसरात पसरलेले सांडपाणी व दुर्गंधी यामुळे गुंठेवारीतील नागरिकांना एका पावसानेच हैराण केले. सांगली, मिरजेतील गुंठेवारी भागात गुडघाभर चिखलात वाहने अडकून पडली असून नागरिकांना चालत जाणेही मुश्किल झाले आहे. एका पावसातच ही अवस्था झाल्याने पूर्ण पावसाळ्याची चिंता येथील नागरिकांना सतावत आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागाची दैना उडाली. ड्रेनेज तसेच मोबाईलच्या भूमिगत वाहिन्यांसाठी केलेली खुदाई, गेल्या अनेक वर्षात या भागात न पडलेला मुरुम, उघड्या गटारी या सर्व कारणांमुळे गुंठेवारीतील नागरिकांचा सध्या वनवास सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही स्थिती अजूनही बदललेली नाही. गुंठेवारी भागातील विकासकामे ठप्प आहेत. आधीच गैरसुविधांच्या विळख्यात अडकलेल्या गुंठेवारीत खड्डेखुदाईने भर टाकली आणि बहुतांश गुंठेवारीचा भाग दलदलीत रुतला. मंगळवारच्या पावसाचा हा एक भयावह ट्रेलर होता. त्यामुळे प्रत्यक्ष पावसाळ्यातील स्थितीच्या विचाराने नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे. शहरात शंभर फुटी रस्त्याच्या दक्षिण बाजूस गुंठेवारीचा मोठा पट्टा आहे. अनेक नगरे, कॉलन्या गुंठेवारीत वसल्या आहेत. विस्तारित भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहराच्या चारही बाजूंच्या वस्त्याही गुंठेवारीत येतात. बहुतांश वस्त्यांमध्ये मुरुमाचे रस्ते, उघड्या गटारी आहेत. त्यामुळे पाऊस पडला की या भागात पावसाचे पाणी व सांडपाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहते. अनेक घरे सांडपाण्याने वेढली जातात. गेल्या अनेक वर्षांचे हे चित्र अजूनही कायम आहे. काही गुंठेवारी भागात डांबरी रस्ते झाले असले तरी, बहुतांश भाग अजूनही मुरुमातच आहे. अनेक वर्षापासून काही गुंठेवारी भागात मुरुमही पडला नाही. त्यामुळे पावसात हे सर्व भाग चिखलमय होतात. त्यातच सांडपाणी साचून राहिल्याने नागरी आरोग्यही धोक्यात येते. (प्रतिनिधी)