शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

जिल्ह्यात २४ तासात होतोय एकाचा मृत्यू..!

By admin | Updated: February 7, 2016 01:02 IST

वर्षभरात ७३० अपघात : ३६३ जणांचा मृत्यू; ८४५ लोक झाले जखमी; उपाययोजना ठरल्या अपयशी

सचिन लाड / सांगली जिल्ह्यात प्रत्येकवर्षी अपघात होऊन त्यामध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. गतवर्षी सुमारे ७३० अपघात झाले. त्यामध्ये ३६३ जणांचा मृत्यू झाला, तर ८४५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या आकडेवारीवरुन, जिल्ह्यात २४ तासाला दोन अपघात होत असल्याचे व एकाचा बळी जात असल्याचे चित्र आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग विविध उपाययोजना व मोहिमा राबवित असले तरी, त्याचा वाहनधारकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येते. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, वाहन सुस्थितीत नाही हे माहीत असतानाही ते चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दुचाकीवर तिघे बसून जाणे, ही अपघात होण्याची प्रमुख कारणे आहेत. वाहतूक पोलीस अडवितात म्हणून वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी दिवसेंदिवस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी वाढत आहे. या गर्दीत १६ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणी आहेत. लायसन्स देण्यासाठी आरटीओ निरीक्षक परीक्षा घेतात, म्हणून तेवढ्यापुरतेच वाहतूक नियम व चिन्हांचा अभ्यास केला जातो. पण प्रत्यक्षात लायसन्स मिळाल्यानंतर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने वर्षभरात वाहतूक नियम तोडणाऱ्या हजारो वाहनधारकांवर कारवाई करुन चाळीस लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. यावरुन नियम तोडणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. सांगली-इस्लामपूर, कणेगाव-कासेगाव, सांगली ते तासगाव, विटा, पलूस, कऱ्हाड, अंकली-मिरज व मिरज-पंढरपूर या मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघात होऊन त्यामध्ये बळी जाण्याचे प्रमाण मोठे असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गतवर्षी शहरात ४२ अपघात होऊन ४५ जणांचा बळी गेला आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. अपघाताला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागात रस्त्यावरील ढाबे, पानटपऱ्या, चहाची खोकी, झोपड्या ही अतिक्रमणेही काढण्याची गरज आहे. वाहतूक नियमांच्या पालनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, आरटीओ वाहतूक सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून संयुक्तपणे मोहीम राबवितात. शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने दिली जातात. पण प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.