शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४ तासात होतोय एकाचा मृत्यू..!

By admin | Updated: February 7, 2016 01:02 IST

वर्षभरात ७३० अपघात : ३६३ जणांचा मृत्यू; ८४५ लोक झाले जखमी; उपाययोजना ठरल्या अपयशी

सचिन लाड / सांगली जिल्ह्यात प्रत्येकवर्षी अपघात होऊन त्यामध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. गतवर्षी सुमारे ७३० अपघात झाले. त्यामध्ये ३६३ जणांचा मृत्यू झाला, तर ८४५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या आकडेवारीवरुन, जिल्ह्यात २४ तासाला दोन अपघात होत असल्याचे व एकाचा बळी जात असल्याचे चित्र आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग विविध उपाययोजना व मोहिमा राबवित असले तरी, त्याचा वाहनधारकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येते. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, वाहन सुस्थितीत नाही हे माहीत असतानाही ते चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दुचाकीवर तिघे बसून जाणे, ही अपघात होण्याची प्रमुख कारणे आहेत. वाहतूक पोलीस अडवितात म्हणून वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी दिवसेंदिवस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी वाढत आहे. या गर्दीत १६ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणी आहेत. लायसन्स देण्यासाठी आरटीओ निरीक्षक परीक्षा घेतात, म्हणून तेवढ्यापुरतेच वाहतूक नियम व चिन्हांचा अभ्यास केला जातो. पण प्रत्यक्षात लायसन्स मिळाल्यानंतर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने वर्षभरात वाहतूक नियम तोडणाऱ्या हजारो वाहनधारकांवर कारवाई करुन चाळीस लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. यावरुन नियम तोडणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. सांगली-इस्लामपूर, कणेगाव-कासेगाव, सांगली ते तासगाव, विटा, पलूस, कऱ्हाड, अंकली-मिरज व मिरज-पंढरपूर या मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघात होऊन त्यामध्ये बळी जाण्याचे प्रमाण मोठे असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गतवर्षी शहरात ४२ अपघात होऊन ४५ जणांचा बळी गेला आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. अपघाताला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागात रस्त्यावरील ढाबे, पानटपऱ्या, चहाची खोकी, झोपड्या ही अतिक्रमणेही काढण्याची गरज आहे. वाहतूक नियमांच्या पालनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, आरटीओ वाहतूक सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून संयुक्तपणे मोहीम राबवितात. शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने दिली जातात. पण प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.