शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

विवाहाच्या निमित्ताने कट्टर विरोधक आले एकत्र

By admin | Updated: February 12, 2015 00:29 IST

शिराळ्यात चर्चा : जयंतराव, पतंगराव, शिवाजीराव नाईक यांच्यात रंगली गप्पांची मैफल

संजय घोडे-पाटील - कोकरूड -राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र असत नाही. राजकारणाचे संदर्भ दिवसागणिक बदलत असतात... सामान्य माणसाला किमान पहायला तरी हे चित्र दुर्लभच, पण सोमवार, दि. ९ रोजी चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची कन्या मोनालिसा व दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचे सुपुत्र मानसिंग यांच्या विवाह सोहळ््यात याची झलक पहावयास मिळाली. आनंद व दु:खाच्या क्षणी आम्ही राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊ शकतो, हे जिल्ह्यातील नेतेमंडळींनी दाखवून दिले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक व आमदार सुरेश खाडे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक या विवाह सोहळ््यानिमित्त योगायोगाने एकत्र आले. एरव्ही एकमेकांचे तोंडही न पाहणारी ही नेतेमंडळी एकमेकांची अगत्याने चौकशी करीत होती! अक्षता आटोपल्यानंतर नातेवाईक व निमंत्रितांकरिता भोजन, अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आमदार नाईक नवदाम्पत्यास शुभेच्छा देऊन बाहेर पडण्याच्या तयारीत असताना जयंत पाटील यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करीत ‘साहेब, गडबड कशाला करताय, जेवण करूया’, असा आग्रह केला. त्यावेळी आमदार नाईक त्यांना म्हणाले, ‘आमच्या कारखान्यावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे येणार आहेत आणि पुत्र रणधीरदेखील बाहेरगावी असल्यामुळे मला गेले पाहिजे.’ मात्र जयंत पाटील यांच्या आग्रहास्तव या सर्व नेतेमंडळींनी जेवणाऐवजी एकाच टेबलवर अल्पोपहार घेतला. एकमेकांचे कट्टर विरोधक असले तरी या प्रसंगात ही नेतेमंडळी मान, अपमान व राग विसरून एकत्र आली होती. सर्वांनीच पतंगराव कदम यांच्या शाब्दिक कोट्यांवर हसत अल्पोपाहार घेतला. दुर्मीळ क्षण टिपण्यासाठी कॅमेरे सरसावलेअनेकांनी मोबाईलमध्ये हा दुर्मीळ क्षण टिपला. क्षणार्धात ही छायाचित्रे व्हॉटस्-अ‍ॅप व फेसबुकवर टाकण्यात आली. याची शिराळा-वाळवा तालुक्यांत जोरदार चर्चा आहे. राजकारणात कितीही वैमनस्य असले, मनात कटुता असली तरी, राजकारणी मंडळी आनंद वा दु:खाच्या प्रसंगी एकत्र येतात, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.