शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

पर्यावरण अहवालाचा महापालिकेला विसर

By admin | Updated: July 16, 2015 23:17 IST

सात वर्षांपासून बासनात : अधिकारी, पदाधिकाऱ्यांची अनास्था, ध्वनी, जल, वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले

शीतल पाटील - सांगली -शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने सर्वच महापालिकांना ३१ जुलैपूर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे. पण गेल्या सात वर्षांपासून या अहवालाचा सांगली महापालिकेला विसर पडला आहे. यंदाही हा अहवाल तयार नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्तांपासून ते वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांचीच पर्यावरणविषयी अनास्था दिसून येते. महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. पालिकेच्या मूलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनीप्रदूषण आदीचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती हाही एक उद्देश आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा ऊहापोह झाल्यास काही बाबींवर नियंत्रण आणता येते. पण साऱ्या गोष्टींना सांगली महापालिकेने फाटा दिला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १५ वर्षांत अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पर्यावरण अहवाल तयार झाले. शेवटचा पर्यावरण अहवाल २००८-०९ मध्ये सादर झाला होता. तत्कालीन वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे यांनी हा अहवाल तयार केला होता. त्यानंतर गेल्या सात वर्षांत पर्यावरण अहवाल तयार करण्याचाच विसर आरोग्य विभागाला झाला आहे. गत अहवालात शहरात पिण्यासाठी पुरवठा होणाऱ्या पाण्याचे गुणधर्म तपासले होते. नागरिकांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होत होता. या नदीत शेरीनाला, हरिपूर नाला, मिरज नाला अशा कित्येक नाल्यांचे पाणी मिसळत आहे. सात वर्षांपूर्वी नदीपात्रात मिसळणारे पाणी आणि आताचे पाणी यात वाढ निश्चित झाली असेल. पाण्यातील क्षारता, अल्कता, कायम जडपणा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट, क्लोराईडस् या गोष्टींची तपासणी पर्यावरण अहवालाच्या निमित्ताने झाली असती तर, सांगलीचे पाणी किती शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे, याचा उलगडा झाला असता. अनेक घटकांचा ऊहापोह पर्यावरण अहवालाच्या निमित्ताने झाला असता. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्यादृष्टीने काही उपाययोजनाही आखता आल्या असत्या. पण साऱ्या गोष्टींसाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे वेळच नाही, असे दिसते. काही अपरिहार्य कारणास्तव यंदा पर्यावरण अहवाल तयार झालेला नाही. गेल्या सात वर्षात अहवाल तयार होऊ शकला नाही. महापालिकेकडे पर्यावरण अभियंत्याची गरज आहे. तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला आहे. अहवालासंदर्भातही खासगी एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर अहवाल तयार केला जाईल. - डॉ. सुनील आंबोळे, वैद्यकीय आरोग्याधिकारी,महापालिकासात वर्षात प्रदूषण वाढले...वाढते दळणवळण, औद्योगिकरण, वाढणारी लोकसंख्या यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत राहते. गत अहवालात विश्रामबाग, मार्केट यार्ड, उत्तर शिवाजीनगर, सह्याद्रीनगर, सांगली बसस्थानक, मिरज बसस्थानक, बुरुड गल्ली, मीरा हौसिंग सोसायटी या परिसरात सर्वाधिक वायू प्रदूषण होते. सात वर्षात त्यात निश्चित वाढ झालेली असणार.शहरात त्या काळी दोन लाख ९६ हजार दुचाकी, तर तीन लाख ८२ हजार चारचाकी वाहने होती. सद्यस्थितीत वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे.