शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
3
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
4
ट्रेन सुटली तरीही वेस्ट जत नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
5
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
6
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
7
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
8
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
9
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
10
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
11
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
12
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
13
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
14
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
15
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
16
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
17
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
18
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
19
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
20
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!

पर्यावरण अहवालाचा महापालिकेला विसर

By admin | Updated: July 16, 2015 23:17 IST

सात वर्षांपासून बासनात : अधिकारी, पदाधिकाऱ्यांची अनास्था, ध्वनी, जल, वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले

शीतल पाटील - सांगली -शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने सर्वच महापालिकांना ३१ जुलैपूर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे. पण गेल्या सात वर्षांपासून या अहवालाचा सांगली महापालिकेला विसर पडला आहे. यंदाही हा अहवाल तयार नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्तांपासून ते वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांचीच पर्यावरणविषयी अनास्था दिसून येते. महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. पालिकेच्या मूलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनीप्रदूषण आदीचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती हाही एक उद्देश आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा ऊहापोह झाल्यास काही बाबींवर नियंत्रण आणता येते. पण साऱ्या गोष्टींना सांगली महापालिकेने फाटा दिला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १५ वर्षांत अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पर्यावरण अहवाल तयार झाले. शेवटचा पर्यावरण अहवाल २००८-०९ मध्ये सादर झाला होता. तत्कालीन वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे यांनी हा अहवाल तयार केला होता. त्यानंतर गेल्या सात वर्षांत पर्यावरण अहवाल तयार करण्याचाच विसर आरोग्य विभागाला झाला आहे. गत अहवालात शहरात पिण्यासाठी पुरवठा होणाऱ्या पाण्याचे गुणधर्म तपासले होते. नागरिकांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होत होता. या नदीत शेरीनाला, हरिपूर नाला, मिरज नाला अशा कित्येक नाल्यांचे पाणी मिसळत आहे. सात वर्षांपूर्वी नदीपात्रात मिसळणारे पाणी आणि आताचे पाणी यात वाढ निश्चित झाली असेल. पाण्यातील क्षारता, अल्कता, कायम जडपणा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट, क्लोराईडस् या गोष्टींची तपासणी पर्यावरण अहवालाच्या निमित्ताने झाली असती तर, सांगलीचे पाणी किती शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे, याचा उलगडा झाला असता. अनेक घटकांचा ऊहापोह पर्यावरण अहवालाच्या निमित्ताने झाला असता. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्यादृष्टीने काही उपाययोजनाही आखता आल्या असत्या. पण साऱ्या गोष्टींसाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे वेळच नाही, असे दिसते. काही अपरिहार्य कारणास्तव यंदा पर्यावरण अहवाल तयार झालेला नाही. गेल्या सात वर्षात अहवाल तयार होऊ शकला नाही. महापालिकेकडे पर्यावरण अभियंत्याची गरज आहे. तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला आहे. अहवालासंदर्भातही खासगी एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर अहवाल तयार केला जाईल. - डॉ. सुनील आंबोळे, वैद्यकीय आरोग्याधिकारी,महापालिकासात वर्षात प्रदूषण वाढले...वाढते दळणवळण, औद्योगिकरण, वाढणारी लोकसंख्या यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत राहते. गत अहवालात विश्रामबाग, मार्केट यार्ड, उत्तर शिवाजीनगर, सह्याद्रीनगर, सांगली बसस्थानक, मिरज बसस्थानक, बुरुड गल्ली, मीरा हौसिंग सोसायटी या परिसरात सर्वाधिक वायू प्रदूषण होते. सात वर्षात त्यात निश्चित वाढ झालेली असणार.शहरात त्या काळी दोन लाख ९६ हजार दुचाकी, तर तीन लाख ८२ हजार चारचाकी वाहने होती. सद्यस्थितीत वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे.