शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण अहवालाचा महापालिकेला विसर

By admin | Updated: July 16, 2015 23:17 IST

सात वर्षांपासून बासनात : अधिकारी, पदाधिकाऱ्यांची अनास्था, ध्वनी, जल, वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले

शीतल पाटील - सांगली -शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने सर्वच महापालिकांना ३१ जुलैपूर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे. पण गेल्या सात वर्षांपासून या अहवालाचा सांगली महापालिकेला विसर पडला आहे. यंदाही हा अहवाल तयार नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्तांपासून ते वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांचीच पर्यावरणविषयी अनास्था दिसून येते. महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. पालिकेच्या मूलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनीप्रदूषण आदीचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती हाही एक उद्देश आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा ऊहापोह झाल्यास काही बाबींवर नियंत्रण आणता येते. पण साऱ्या गोष्टींना सांगली महापालिकेने फाटा दिला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १५ वर्षांत अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पर्यावरण अहवाल तयार झाले. शेवटचा पर्यावरण अहवाल २००८-०९ मध्ये सादर झाला होता. तत्कालीन वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे यांनी हा अहवाल तयार केला होता. त्यानंतर गेल्या सात वर्षांत पर्यावरण अहवाल तयार करण्याचाच विसर आरोग्य विभागाला झाला आहे. गत अहवालात शहरात पिण्यासाठी पुरवठा होणाऱ्या पाण्याचे गुणधर्म तपासले होते. नागरिकांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होत होता. या नदीत शेरीनाला, हरिपूर नाला, मिरज नाला अशा कित्येक नाल्यांचे पाणी मिसळत आहे. सात वर्षांपूर्वी नदीपात्रात मिसळणारे पाणी आणि आताचे पाणी यात वाढ निश्चित झाली असेल. पाण्यातील क्षारता, अल्कता, कायम जडपणा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट, क्लोराईडस् या गोष्टींची तपासणी पर्यावरण अहवालाच्या निमित्ताने झाली असती तर, सांगलीचे पाणी किती शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे, याचा उलगडा झाला असता. अनेक घटकांचा ऊहापोह पर्यावरण अहवालाच्या निमित्ताने झाला असता. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्यादृष्टीने काही उपाययोजनाही आखता आल्या असत्या. पण साऱ्या गोष्टींसाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे वेळच नाही, असे दिसते. काही अपरिहार्य कारणास्तव यंदा पर्यावरण अहवाल तयार झालेला नाही. गेल्या सात वर्षात अहवाल तयार होऊ शकला नाही. महापालिकेकडे पर्यावरण अभियंत्याची गरज आहे. तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला आहे. अहवालासंदर्भातही खासगी एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर अहवाल तयार केला जाईल. - डॉ. सुनील आंबोळे, वैद्यकीय आरोग्याधिकारी,महापालिकासात वर्षात प्रदूषण वाढले...वाढते दळणवळण, औद्योगिकरण, वाढणारी लोकसंख्या यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत राहते. गत अहवालात विश्रामबाग, मार्केट यार्ड, उत्तर शिवाजीनगर, सह्याद्रीनगर, सांगली बसस्थानक, मिरज बसस्थानक, बुरुड गल्ली, मीरा हौसिंग सोसायटी या परिसरात सर्वाधिक वायू प्रदूषण होते. सात वर्षात त्यात निश्चित वाढ झालेली असणार.शहरात त्या काळी दोन लाख ९६ हजार दुचाकी, तर तीन लाख ८२ हजार चारचाकी वाहने होती. सद्यस्थितीत वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे.