शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

पॅनेलवरील सचिव नियुक्तीअभावी नवे उपक्रम ठप्प

By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST

स्वच्छ कारभाराची गरज : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नियमांचे दुखणे

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक उलाढाल ४२ कोटींच्या घरात असतानाही अद्याप याठिकाणी पॅनेलवरील सचिव नियुक्ती मात्र करण्यात आलेली नाही. प्रशिक्षित, मान्यताप्राप्त सचिवांची नियुक्ती रखडल्याने नवीन उपक्रम मात्र ठप्प झाले आहेत. स्वच्छ व कायदेशीर कारभारासाठी पॅनेलवरील सचिव नियुक्तीची मागणी होत आहे. प्रशिक्षित सचिव पॅनेल जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयार झाले आहेत, ते बाजार समित्यांमध्ये नियुक्त करण्यात यावेत, असे आदेश यापूर्वीच केंद्र शासनाने दिला आहे. या पॅनेलमधूनच सचिवांची नियुक्ती करण्यात यावी, हे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही याकडे डोळेझाक करण्यात आली आहे. सांगलीसह ३५ बाजार समित्यांवर पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी अपात्र सचिवांची नियुक्ती केली आहे. सांगली बाजार समितीच्या यापूर्वीच्या सचिवांची नियुक्ती कायम करण्यात यावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ठराव करून तो पणन मंडळाकडे पाठविला होता. तो मंजूर झाल्याने यापूर्वीच्याच सचिवांची नियुक्ती कायम झाली आहे. यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तरुण, प्रशिक्षित व मान्यताप्राप्त सचिवांपासून वंचित राहिला आहे. बाजार समितीमध्ये दोन वर्षांपूर्वी ४० ते ५० लाखांचा अपहार झाला होता. लेखापरीक्षणामध्ये ही बाब स्पष्ट झाल्यानंतर यामधील काही रकमाही भरून घेण्यात आल्या आहेत. दोषी दोघा कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी दोषी धरून शासनाने सांगली बाजार समितीच बरखास्त करून यावर प्रशासक नेमला आहे. येत्या जानेवारीला प्रशासक नेमून दोन वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या कालावधीसाठी पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त झाला आहे. मान्यताप्राप्त सचिवांच्या ताब्यात संस्था असती तर कदाचित हा गैरव्यवहार टळला असता. पॅनेलवरील सचिव नसल्यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रमांपासून समिती मुकली आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना, प्रबोधन शिबिरेही राबवली जात नाहीत. यामुळे नव्या योजनांपासून शेतकरी वंचित रहात आहेत. कायद्याच्या कलमांमध्ये बदल करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सचिवांच्या नेमणुकांचे अधिकार पणन खात्याने हाती घ्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)केवळ सेस गोळा करण्याचे काम सध्या बाजार समितीकडून केवळ सेस गोळा करणे व तो खर्च करणे इतकेच काम होत आहे. नव्या उपक्रमासाठी प्रशिक्षित व तोट्यातून बाहेर काढणाऱ्या सचिवांची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांना नव्या योजनांचा लाभ देण्याची गरज निर्माण झाली आहे. सांगली कृषी बाजार समिती ‘अ’ गटात आहे. त्यामुळे याठिकाणी स्पर्धा परीक्षा देऊन निवड झालेला सचिव नियुक्त करणे आवश्यक आहे. अभ्यासू उपनिबंधक दर्जाचा अधिकारी नियुक्त झाल्यास होणारे गैरव्यवहार टळतील शिवाय समितीचा कारभार कायदेशीर बाबी सांभाळून होईल. त्याचबरोबर शेतकरी, व्यापाऱ्यांना नव्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ मिळण्यास मदत होईल. - प्रकाश जमदाडे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली