शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तीन घराण्यांतील संघर्षाला नवे वळण

By admin | Updated: October 7, 2014 23:38 IST

विधानसभा निवडणूक : पारंपरिक संघर्षाला वारसदारांकडून बळ

अविनाश कोळी - सांगली -वसंतदादा-राजारामबापू यांच्यापासून सुरू झालेला संघर्ष आज ४५ वर्षांनंतरही त्यांच्या वारसदारांनी जिवंत ठेवला आहे. सांगली विधानसभेच्या मैदानात गेल्या सहा वर्षांपासून जयंत पाटील आणि मदन पाटील यांच्यारूपाने या संघर्षाने नवे रूप धारण केले आहे. त्याचबरोबर संभाजी पवार विरुद्ध दादा घराण्यातील संघर्षाची कहाणीही सुरूच आहे. यंदाच्या निवडणुकीत परंपरागत घराणेशाहीतील संघर्षाचे त्रिकुट निर्माण झाल्याने वेगळा इतिहास नोंदला जात आहे. राज्यातील राजकारणात दादा-बापूंमधील संघर्ष नेहमीच चर्चेत येत असतो. २३ नोव्हेंबर १९६३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे निधन झाले, तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात राजारामबापू व वसंतदादांचे मित्र बॅ. जी. डी. पाटील दोघेही उपमंत्री होते. नाईकांच्या मंत्रिमंडळात राजारामबापूंची बढती करून त्यांना उपमंत्रीपदावरून महसूलमंत्री पदावर बसविण्यात आले. त्यामुळे दादा-बापू संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात वारणा नदीवरील धरणावरून हा संघर्ष विकोपाला गेला. त्यानंतरही अनेक गोष्टींनी या युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. संघर्षाची ही अर्धशतकीय कहाणी आजही तशीच ताजी आहे. राजारामबापूंचे पुत्र जयंत पाटील आणि वसंतदादांचे नातू मदन पाटील, प्रतीक पाटील यांच्यात सुरुवातीच्या काळात छुपा संघर्ष होता. महापालिकेच्या २००८ च्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी उघडपणे दादा घराण्याविरोधात रणशिंग फुंकले. दादा घराण्याशी पूर्वापार संघर्ष करीत आलेले संभाजी पवार यांना त्यांनी सोबत घेतले आणि महापालिकेतील मदन पाटील यांची सत्ता हिसकावून घेतली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही असेच राजकारण झाले आणि मदन पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी संभाजी पवारांना आमदार बनविण्यासाठी राष्ट्रवादीची पूर्ण ताकद जयंतरावांनी पणाला लावली होती. या खेळांची कल्पना मदन पाटील यांना होती. त्यामुळेच त्यांनीही जयंतरावांना शह देण्याची तयारी चालू केली. नंतरच्या काळात सर्वोदय सहकारी साखर कारखान्यावरून जयंत पाटील आणि संभाजी पवार यांच्यामध्ये वितुष्ट आले. पवारांनी मदन पाटील यांच्याकडील तोफ पश्चिमेला फिरविली आणि जयंतरावांवर टीका केली. जयंत पाटील यांनी शांतपणे पटावरील प्यादे हलविले आणि पुन्हा नव्या डावाला सुरुवात केली. दुसरीकडे दादा व कदम घराण्याने ताकद एकवटली व महापालिकेतील सत्ता पुन्हा काबीज केली. जयंतरावांवर त्यांचाच डाव उलटविण्यात आला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीने या निवडणुकीत संजय पाटील यांचा प्रचार केल्याचे नंतर उजेडात आले. यामागेही जयंतरावच असावेत, अशी चर्चा सुरू झाली. आताच्या विधानसभा निवडणुकीत उघडपणे दोन्ही घराण्यांकडून कुरघोड्या चालू झाल्या आहेत. जयंतरावांनी सांगलीत, तर प्रतीक व मदन पाटील यांनी इस्लामपुरात पट मांडला आहे. एकमेकांच्या राज्यात रसद पुरवून उघडपणे रणशिंग फुंकण्यात आले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात तर घराणेशाहीच्या संघर्षाचे त्रिकुट दिसत आहे. पवार-दादा-बापू घराण्यातील हा संघर्ष याठिकाणी ठळकपणे मांडला जात आहे. ताकदीचे योद्धेमदन पाटील, जयंत पाटील आणि संभाजी पवार हे तिन्ही नेते जिल्ह्याच्या राजकारणात ताकदीचे मानले जातात. सध्या जयंतरावांकडे संस्थात्मक तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठे बळ आहे, तर मदन पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. जिल्ह्यात आजही दादा गट कार्यरत आहे. संभाजी पवारांना मानणाराही मोठा गट सांगली व परिसरात अस्तित्वात आहे. त्यामुळे तिन्ही नेते एकमेकांविरोधात आपली ताकद पणाला लावत आहेत. जुन्या संघर्षाला नवा आयामराजारामबापू यांचे पुत्र जयंत पाटील आणि वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू असा संघर्ष कधीही झाला नाही. विष्णुअण्णांशीही जयंतरावांचा संघर्ष झाला नाही. जयंतरावांचा थेट दादांच्या नातवांशी संघर्ष सुरू झाला. दुसरीकडे राजारामबापूंचे मानसपुत्र म्हणून संभाजी पवारांचा उल्लेख होतो. तरीही पवारांसह त्यांच्या पुत्राशी जयंतरावांचा संघर्ष सुरू आहे. दादा-बापू घराण्यातील संघर्षात आता पवार घराण्याची भर पडल्याने संघर्षाचा हा तिरंगी सामना भलताच रंगला आहे.