शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोहन भागवत, PM मोदी शस्त्रपूजा करतात, सरकार ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार का?”: आंबेडकर
2
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
5
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
6
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
7
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
8
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
9
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
10
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
11
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
12
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
13
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
14
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
15
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
18
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
19
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
20
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?

तीन घराण्यांतील संघर्षाला नवे वळण

By admin | Updated: October 7, 2014 23:38 IST

विधानसभा निवडणूक : पारंपरिक संघर्षाला वारसदारांकडून बळ

अविनाश कोळी - सांगली -वसंतदादा-राजारामबापू यांच्यापासून सुरू झालेला संघर्ष आज ४५ वर्षांनंतरही त्यांच्या वारसदारांनी जिवंत ठेवला आहे. सांगली विधानसभेच्या मैदानात गेल्या सहा वर्षांपासून जयंत पाटील आणि मदन पाटील यांच्यारूपाने या संघर्षाने नवे रूप धारण केले आहे. त्याचबरोबर संभाजी पवार विरुद्ध दादा घराण्यातील संघर्षाची कहाणीही सुरूच आहे. यंदाच्या निवडणुकीत परंपरागत घराणेशाहीतील संघर्षाचे त्रिकुट निर्माण झाल्याने वेगळा इतिहास नोंदला जात आहे. राज्यातील राजकारणात दादा-बापूंमधील संघर्ष नेहमीच चर्चेत येत असतो. २३ नोव्हेंबर १९६३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे निधन झाले, तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात राजारामबापू व वसंतदादांचे मित्र बॅ. जी. डी. पाटील दोघेही उपमंत्री होते. नाईकांच्या मंत्रिमंडळात राजारामबापूंची बढती करून त्यांना उपमंत्रीपदावरून महसूलमंत्री पदावर बसविण्यात आले. त्यामुळे दादा-बापू संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात वारणा नदीवरील धरणावरून हा संघर्ष विकोपाला गेला. त्यानंतरही अनेक गोष्टींनी या युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. संघर्षाची ही अर्धशतकीय कहाणी आजही तशीच ताजी आहे. राजारामबापूंचे पुत्र जयंत पाटील आणि वसंतदादांचे नातू मदन पाटील, प्रतीक पाटील यांच्यात सुरुवातीच्या काळात छुपा संघर्ष होता. महापालिकेच्या २००८ च्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी उघडपणे दादा घराण्याविरोधात रणशिंग फुंकले. दादा घराण्याशी पूर्वापार संघर्ष करीत आलेले संभाजी पवार यांना त्यांनी सोबत घेतले आणि महापालिकेतील मदन पाटील यांची सत्ता हिसकावून घेतली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही असेच राजकारण झाले आणि मदन पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी संभाजी पवारांना आमदार बनविण्यासाठी राष्ट्रवादीची पूर्ण ताकद जयंतरावांनी पणाला लावली होती. या खेळांची कल्पना मदन पाटील यांना होती. त्यामुळेच त्यांनीही जयंतरावांना शह देण्याची तयारी चालू केली. नंतरच्या काळात सर्वोदय सहकारी साखर कारखान्यावरून जयंत पाटील आणि संभाजी पवार यांच्यामध्ये वितुष्ट आले. पवारांनी मदन पाटील यांच्याकडील तोफ पश्चिमेला फिरविली आणि जयंतरावांवर टीका केली. जयंत पाटील यांनी शांतपणे पटावरील प्यादे हलविले आणि पुन्हा नव्या डावाला सुरुवात केली. दुसरीकडे दादा व कदम घराण्याने ताकद एकवटली व महापालिकेतील सत्ता पुन्हा काबीज केली. जयंतरावांवर त्यांचाच डाव उलटविण्यात आला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीने या निवडणुकीत संजय पाटील यांचा प्रचार केल्याचे नंतर उजेडात आले. यामागेही जयंतरावच असावेत, अशी चर्चा सुरू झाली. आताच्या विधानसभा निवडणुकीत उघडपणे दोन्ही घराण्यांकडून कुरघोड्या चालू झाल्या आहेत. जयंतरावांनी सांगलीत, तर प्रतीक व मदन पाटील यांनी इस्लामपुरात पट मांडला आहे. एकमेकांच्या राज्यात रसद पुरवून उघडपणे रणशिंग फुंकण्यात आले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात तर घराणेशाहीच्या संघर्षाचे त्रिकुट दिसत आहे. पवार-दादा-बापू घराण्यातील हा संघर्ष याठिकाणी ठळकपणे मांडला जात आहे. ताकदीचे योद्धेमदन पाटील, जयंत पाटील आणि संभाजी पवार हे तिन्ही नेते जिल्ह्याच्या राजकारणात ताकदीचे मानले जातात. सध्या जयंतरावांकडे संस्थात्मक तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठे बळ आहे, तर मदन पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. जिल्ह्यात आजही दादा गट कार्यरत आहे. संभाजी पवारांना मानणाराही मोठा गट सांगली व परिसरात अस्तित्वात आहे. त्यामुळे तिन्ही नेते एकमेकांविरोधात आपली ताकद पणाला लावत आहेत. जुन्या संघर्षाला नवा आयामराजारामबापू यांचे पुत्र जयंत पाटील आणि वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू असा संघर्ष कधीही झाला नाही. विष्णुअण्णांशीही जयंतरावांचा संघर्ष झाला नाही. जयंतरावांचा थेट दादांच्या नातवांशी संघर्ष सुरू झाला. दुसरीकडे राजारामबापूंचे मानसपुत्र म्हणून संभाजी पवारांचा उल्लेख होतो. तरीही पवारांसह त्यांच्या पुत्राशी जयंतरावांचा संघर्ष सुरू आहे. दादा-बापू घराण्यातील संघर्षात आता पवार घराण्याची भर पडल्याने संघर्षाचा हा तिरंगी सामना भलताच रंगला आहे.