शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात यंदा कॉँग्रेस की राष्ट्रवादी?

By admin | Updated: September 5, 2014 00:10 IST

उमेदवारीबाबत संभ्रम : वाळव्याच्या गावांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात

इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. ही जागा काँग्रेसला जाणार की, राष्ट्रवादीला याचा निर्णय झालेला नाही. त्यातच महायुतीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शिवाय ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि गटाची वाळवा तालुक्यातील ५९ गावांमध्ये काय भूमिका असेल, हे गुलदस्त्यात असल्याने आघाडीतील संभ्रम वाढला आहे. जयंत पाटील यावेळी स्वत:चे साडू सत्यजित देशमुख यांच्या पारड्यात वजन टाकणार की, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी राहणार, हे स्पष्ट झालेले नाही.आघाडीच्या जागावाटपात शिराळ्याची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांना मदत करण्याऐवजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मानसिंगराव नाईक यांना मदत केली होती. वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील यांनीही आघाडीचा धर्म न पाळता मानसिंगराव नाईक यांना मदत केली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला होता.यंदाच्या निवडणुकीत मात्र आघाडीच्या जागेचा घोळ निर्माण झाला आहे. कारण विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी कसल्याही परिस्थितीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायचीच, असा निश्चय केला आहे. सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न चालववले आहेत. त्यातच ते ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे साडू आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांचे वजन यावेळी तरी सत्यजित यांच्यासाठी खर्चले जाणार का, असा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते करत आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा करीत, आपल्यालाच आघाडीचे तिकीट मिळणार, असे गृहीत धरले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशमुख आणि आ. नाईक गटातील दरी रूंदावली आहे.महायुतीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची उमेदवारी जाहीर केली आहे. असे असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत मात्र संभ्रम दिसत आहे. (प्रतिनिधी)५९ गावांमधील भूमिका गुलदस्त्यातचशिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ५९ गावे येतात. या गावांचे मतदान निर्णायक ठरते. तेथे जयंत पाटील यांच्यासोबत शिवाजीराव नाईक, महाडिक, सी. बी. पाटील, अभिजित पाटील, देशमुख हे गटही प्रबळ आहेत. मात्र खुद्द जयंत पाटील आणि गटाची या ५९ गावांमधील भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. शिवाय सत्यजित देशमुख यांनी शिराळ्यावर दावा केला आहे.जयंत पाटील यांनी शिराळा मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी वेळोवेळी खेळ्या केल्या आहेत. यावेळी मात्र जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी राजू शेट्टी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. महाडिक, सी. बी. पाटील आणि अभिजित पाटील हे महायुतीच्या बाजूने आहेत. त्यांचा राष्ट्रवादीला विरोध आहे. नानासाहेब महाडिक स्वत: जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांच्यापुढे आव्हान उभे आहे.