शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

स्थान माहात्म्यावरून पडली चौकांना नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:23 IST

सांगली शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणून राजवाडा चौकाचा उल्लेख होतो. या परिसरात सांगली संस्थानचा राजवाडा, गणेश दुर्ग आहे. त्यावरून ...

सांगली शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणून राजवाडा चौकाचा उल्लेख होतो. या परिसरात सांगली संस्थानचा राजवाडा, गणेश दुर्ग आहे. त्यावरून चौकाला राजवाडा चौक नाव रुढ झाले. भूतपूर्व सांगली संस्थानकडून सांगली-मिरज रस्त्यावर विश्रामासाठी परिसर विकसित करण्यात आला. सध्या तो राधा स्वामी सत्संग बियास म्हणून परिचित आहे. संस्थानिकांच्या विश्रामाचे स्थान म्हणून त्या परिसराला विश्रामबाग अशी ओळख निर्माण झाली. तेथील प्रमुख चौक ‘विश्रामबाग चौक’ बनला. नंतर त्याचे नामकरण ‘क्रांतिसिंह नाना पाटील चौक’ असे करण्यात आले.

शहरातील प्रसिद्ध आझाद व्यायाम मंडळावरून ‘आझाद चौक’ हे नाव पडले. आंबेडकर क्रीडांगणाजवळ घोडके यांचे दुकान होते. मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी दुकानात येत. त्यामुळे चौकात गर्दी होती. त्यावरून २००२ मध्ये या चौकाला आझाद चौक असे नाव देण्यात आले. तत्पूर्वी हा चौक ‘कलेक्टर बंगला चौक’ म्हणून ओळखला जात होता.

सांगली बसस्थानक परिसरात सिंधी समाजाचे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यांचा व्यवसायही याच परिसरात आहे. तत्कालीन सांगली नगरपालिकेने समाजाच्या मागणीनुसार या चौकाला ‘झुलेलाल चौक’ असे नाव दिले.

सध्याचा शिंदेमळा-संजयनगर परिसरातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक’ पूर्वी ‘लव्हली सर्कल’ नावाने ओळखला जात होता. या चौकात याच नावाचे एक हॉटेल होते. त्यावरून हे नाव पडले होते. या चौकाला विष्णुअण्णा पाटील यांचे नाव देण्याचा विचार सुरू होता. तेव्हा या परिसरातील काही नागरिकांनी एकत्र येत रात्रीत चौकातील झाडेझुडपे साफ करून अहिल्यादेवींच्या नावाचा फलक लावला. तेव्हापासून हा चौक ‘अहिल्यादेवी होळकर चौक’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

चौकट

महाराणी झाशी चौक

इंदिरा गांधी सांगलीत आल्या होत्या. त्यांचे स्वागत गणपती पेठेतील चौकात झाले होते. तेव्हा नागरिकांनी त्या चौकात महाराणी झाशी लक्ष्मीबाई यांचा पुतळा ठेवला होता. इंदिरा गांधी यांनाही महाराणी झाशी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा भेट दिली होती. तेव्हापासून या चौकाचे नाव ‘महाराणी झाशी चौक’ असे पडले. पूर्वी या चौकाला ‘माने कॉर्नर’ असे म्हटले जायचे.

चौकट

सीमोल्लंघनाचे झाले शिलंगण (फोटो)

शिलंगण हा सीमोल्लंघन शब्दाचा अपभ्रंश आहे. स्वरूप थिएटरजवळच्या या चौकात संस्थानच्या काळात दसऱ्याला सोने लुटले जायचे. तिथे आजही आपट्याचे झाड व दगडी कट्टा आहे. हत्ती, उंट, घोडे असा लवाजमा घेऊन पटवर्धन सरकार चौकात येत. सोने लुटण्याचा पहिला मान सरकारांचा. त्यानंतर सांगलीकर सोने लुटत असत. दसऱ्यादिवशी सोने लुटण्यासाठी या चौकात संपूर्ण सांगली लोटायची. तिथे सीमोल्लंघन व्हायचे. त्याचाच अपभ्रंश होत शिलंगण हे नाव रुढ झाले आणि चौक बनला ‘शिलंगण चौक’. त्यानंतर तेथे त्याच नावाने शिलंगण गणेशोत्सव मंडळाचीही स्थापना झाली.