शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

कृषीपंपांना बिल न देताच महावितरणची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:25 IST

सांगली : कृषी पंपांना अनेक वर्षांपासून बिलेच दिली गेली नसतानाही त्यांच्या वसुलीसाठी महावितरणने जोरदार मोहीम हाती घतेली आहे. यावर्षी ...

सांगली : कृषी पंपांना अनेक वर्षांपासून बिलेच दिली गेली नसतानाही त्यांच्या वसुलीसाठी महावितरणने जोरदार मोहीम हाती घतेली आहे. यावर्षी जिल्ह्यातील सर्वच गावांची आणेवारी ५० पैशांहून अधिक असल्याने वसुली अग्रहक्काने सुरू आहे.

वीज वापरासाठी नियमित बिले देणे महावितरणला बंधनकारक आहे. पण ती मिळत नसल्याचा नेहमीचा अनुभव आहे. अनेक शेतकऱ्यांनी वीजजोडणी घेतल्यापासून एकदाही बिल मिळाले नसल्याचे सांगितले. कृषी पंपांची विभागणी मीटर व नाॅनमीटर अशा दोन गटांत केली जाते. मीटरला रिडींगनुसार तर नॉन मीटरला अश्वशक्तीनुसार बिल आकारणी केली जाते. शहरी भागात प्रत्येक महिन्याला व ग्रामीण भागात तीन महिन्यांतून एकदा बिल देणे बंधनकारक आहे. पण अनेकदा बिले अंदाजेच दिली जात असल्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

बिलेच येत नसल्याने ती भरण्याच्या फंदात शेतकरी पडत नाहीत. काहीवेळा वसुलीसाठी कर्मचारी येतात. तेव्हा चिरीमिरी देऊन त्यांची परत पाठवणी केली जाते. वसुलीचा त्रागा सुरू झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी बिले मागितली, पण ती मिळाली नाहीत. ऑनलाईन बिले काढली असता ती लाखोंच्या घरात पोहोचल्याचे दिसून आले, त्यामुळे शेतकरी हादरले. त्यामध्ये प्रत्यक्ष विजेचा वापर कमी आणि दंड व व्याजच जास्त असल्याचे आढळले. वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी ताकद लावली असता शेतकरी संघटनेसह काही संघटनांनी कर्मचाऱ्यंना पिटाळण्याच्या घटनाही घ़डल्या, त्यामुळे शेतीपंपांच्या बिल वसुलीमध्ये अधिकारी व कर्मचारीही फारसे उत्सुक दिसत नाहीत.

कोट

कृषीपंपांच्या अनुदानाचे कोट्यवधी रुपये महाविरणकडे शिल्लक आहेत. त्याचा हिशेब केला असता त्यांच्याकडूनच शेतकऱ्यांना पैसे मिळणे आवश्यक ठरते. या स्थितीत शेतकरी बिल भरणार नाही अशी आमची भूमिका आहे. महावितरणने रितसर रिडींग घेऊन बिले द्यावीत, अंदाजे बिले स्वीकारणार नाही.

- महादेव कोरे

कोट

वीजपुरवठा घेतल्यापासून काहीवेळाच बिले मिळाली आहेत. वीजपुरवठा पुरेशा दाबाने व नियमित नसल्याने बिले भरणार नसल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे. पुरेशी वीज द्यावी आणि रिडींगद्वारे बिले द्यावीत अशी आमची मागणी आहे.

- कमलेश्वर कांबळे

कोट

जितका वीजवापर, तितकीच बिले भरण्यास शेतकरी केव्हाही तयार आहे. पण महावितरणचा कारभार पारदर्शी नाही. त्यामुळे शेतकरी बिले भरत नाहीत.

- नाना काणे

- शेतकऱ्यांना कृषीपंपांची बिले दिली जातात. वसुलीलाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे.

- संजय अवताडे, उपव्यवस्थापक (लेखा), महावितरण, सांगली

तालुकानिहाय कृषी पंप चालक

आटपाडी - १७२१४

जत - ३८५०२

कडेगाव - २०९९२

कवठेमहांकाळ - २२०७८

खानापूर - ३०२८४

मिरज - ३४८०८

पलूस - १२१६१

शिराळा - ७९३६

तासगाव - ३०७४४

वाळवा - २४६११

एकूण कृषीपंप - २ लाख ३९ हजार ३३०

वीजबिल थकबाकी - १०५५ कोटी रुपये