शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

भाजप आम्ही चालवत असल्याचा गैरसमज

By admin | Updated: September 1, 2015 22:22 IST

जयंत पाटील : जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

सांगली : जिल्ह्यातील भाजप आपण चालवित असल्याचा कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्याला इलाज नाही. आम्ही आमचाच राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम करीत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. दुष्काळी भागातील लोकांना खुल्या मनाने आणि सढळ हाताने मदत करण्याची राज्य सरकारची भावना नाही,असा आरोपही त्यांनी केला. आ़ पाटील यांनी जत तालुक्यातील डफळापूर, संख, उमदी, जत आदी दुष्काळी गावांचा दिवसभर दौरा केल्यानंतर सांगलीत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सांगली जिल्ह्यातील भाजप आपण चालविता? असे खासगीत बोलले जाते. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, पक्षीय पातळीवर आम्ही आमचाच पक्ष वाढविण्याचे काम करीत आहोत. काहींच्याबरोबर व्यक्तिगत संबंध असू शकतात़ मात्र कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्याला इलाज नाही़ पूर्वीच आमच्या पक्षातून काहीजण भाजपमध्ये गेले आहेत़ त्यात कोणाचा काय फायदा? मला माहीत नाही़ त्यानंतर कोणाच्या मदतीचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, राज्य शासनाने तातडीने यंत्रणा राबवून लोकांना मदत करण्याची गरज आहे़ मात्र तसे होताना दिसत नाहीत़ मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भातील आहेत़ त्यांची १०-१५ वर्षातील भाषणे पाहता, पश्चिम महाराष्ट्रावर सूड उगविला जात असल्याच्या शंकेला वाव असल्याचे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. (प्रतिनिधी)‘म्हैसाळ’चे पाणी द्या म्हैसाळ योजनेतून भोकरचौंडी, डोर्ली, अंकले, बसाप्पावाडी, कोकळे, बेळुंखी, शिंगणापूर, बिरनाळ आदी तलावात पाणी सोडावे, संख येथील निकृष्ट दर्जाच्या कोल्हापूर बंधाऱ्याची तातडीने दुरूस्ती करावी, बिरूळची उर्वरित कामे पूर्ण करून डफळापूर गावांना पाणी देण्यात यावी अशी कामे निवेदनात सूचवण्यात आली आहे.