शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पाणी योजना पूर्ण होऊनही पालिका घेते एमआयडीसीचे पाणी

By admin | Updated: January 7, 2015 23:23 IST

योजनेची कामे अपूर्ण : मळे भागातील नागरिकांना कूपनलिकांचाच आधार; अशुद्ध पाण्याचाही प्रश्न गंभीर

महालिंग सलगर - कुपवाडसह उपनगरांना भेडसावणारी पाणीटंचाई शहरात पाणी योजना झाल्यावर बऱ्यापैकी कमी झाली. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट थांबली. परंतु, रखडलेल्या जलशुध्दीकरण केंद्राअभावी अजूनही म्हणावे तसे शुध्द आणि मुबलक पाणी मिळत नाही. काही भागात कूपनलिकांवर, तर काही भागात एमआयडीसीच्या महागड्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ असेच चित्र आहे. महापालिकेत समावेश झाल्यावर कुपवाडसह उपनगरांना सांगली, मिरज शहरांप्रमाणे मुबलक पाण्याचा पुरवठा होईल, अशी आशा होती. त्याबाबत लोकप्रतिनिधी आणि शासनानेही विकासाचे गाजर दाखविले होते. योजनाही तयार करण्यात आली. परंतु, कुपवाडवासीयांची तहान महापालिकेच्या स्थापनेनंतर दहा वर्षांनी भागली. कुपवाडसह उपनगरांसाठीची पाणी योजना झाल्यावर नागरिकांना कृष्णेचे मुबलक पाणी मिळू लागले. परंतु,वारणेच्या पाण्याविषयी लोकप्रतिनिधींनी कुपवाडवासीयांना दाखविलेले स्वप्न अधुरेच राहिले. वारणेच्या पाण्याविषयीची घोषणा हवेत विरली. परंतु, महाआघाडीने निवडणुकीत केलेल्या घोषणेप्रमाणे शहरात बऱ्याच भागात पाणी पोहोचवून, दिलेला शब्द पाळला. त्यामुळे टंचाई बऱ्यापैकी संपली. काही भागात मात्र अजूनही योजनेचे पाणी मिळत नाही. आलिशान कॉलनी, कोंडका मळा, गणे मळा, आनंदनगर, विवेकानंद कॉलनी आदी भागासह काही उंचावर असलेल्या उपनगरांत अजूनही योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. आनंदनगर, विवेकानंद कॉलनी परिसरासह प्रभाग चोवीसच्या काही भागात अजूनही एमआयडीसीकडून महागड्या दराने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये वाया जातात. आलिशान कॉलनीसह मळे भागाला कूपनलिकांवरच तहान भागवावी लागत आहे. या पाणी योजनेंतर्गत करण्यात येणारे जलशुध्दीकरण केंद्राचे कामही ठप्प आहे. त्याची गती निधी मिळाला नसल्यामुळे मंदावली आहे. या केंद्राचे काम पूर्ण झाल्यावर शहराला पूर्ण दाबाने एकाच सत्रात पाणीपुरवठा करणे सोपे जाईल, असे प्रशासन म्हणते, तर कामांची गती मंदावत ठेवून ठेकेदार दर वाढवून घेत आहेत. त्यामुळेच नागरिकांना एमआयडीसीकडून पाणी घ्यावे लागत आहे. प्रशासनाने जलशुध्दीकरण केंद्र व योजनेची कामे त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहरवासीयांनी दिला आहे. योजनेची कामे गतीने करू -गिरीबुवानागरिकांना २०४० पर्यंत पाणीपुरवठा होईल, त्यादृष्टीने पाणी योजनेची कामे केली आहेत. ८० कोटींची योजना उशिरा सुरू झाल्यामुळे गतीने होऊ शकली नाही, हे खरे आहे. जवळजवळ सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. आठ टाक्या व पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. निधीची अडचण आहे. जलशुध्दीकरण केंद्राचे काम व उर्वरित काही कामांना येत्या पंधरा दिवसांत १६ कोटींचा फरक मिळाल्यावर गती देऊ, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता जे. व्ही. गिरी यांनी दिली. शहरातील गावभागात अजूनही बऱ्याच ठिकाणी जुन्याच वाहिन्या टाकल्या आहेत. टाक्या पूर्ण झाल्या असल्या, तरीही काही कामे अपूर्ण आहेत. वाहिन्यांचे नकाशेही व्यवस्थित नाहीत. महाआघाडीच्या कालावधित सर्व गोंधळ झाला आहे. कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. परंतु, काही उपनगरे व मळे भाग अजूनही पाण्यापासून वंचितच राहिला आहे. हा गोंधळ संपवून शहरवासीयांना मुबलक व शुध्द पाणी देण्यासाठी यापुढील कालावधित प्रयत्न करणार आहोत.- गजानन मगदूम, नगरसेवक