शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

पक्व झालेली डाळिंबे पडून फुटू लागली

By admin | Updated: January 9, 2015 00:10 IST

परिस्थिती ‘जैसे थे’ : बाजारात आणलेली कचऱ्यात गेली; उत्पादक चिंताग्रस्त

अविनाश बाड - आटपाडी -पक्व झालेली डाळिंबे दर वाढेल, या आशेने शेतकरी तोडायला तयार नाहीत. १०० ते १५० रुपये किलो दराने जाणारी डाळिंबे सध्या ४० ते ५० रुपयांच्या घरात आहेत. पक्व झालेली डाळिंबे आता आपोआप झाडावरून जमिनीवर पडून फुटत आहेत. त्यातच डाळिंबाचा ज्यूस आणि अनारदाना निर्मिती अन्न आणि भेसळ विभागाने छापे टाकून बंद केली आहे. बाजार समितीत पदरमोड करून शेतकऱ्यांनी डाळिंबे आणली तर, तिथे कचऱ्यात फेकून द्यावी लागत आहेत. पडलेल्या दरामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा दूर करण्याचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पंधरा दिवसांपासून डाळिंबाच्या बागा पक्व होत आहेत. तालुक्यातील सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रात यंदा विक्रमी उत्पादन आले आहे. तेल्या, अवकाळी पाऊस यासह ढगाळ हवामानाचा परिणाम झाल्याने त्याचा डाळिंबावर परिणाम झाला आहे.डाळिंब हे हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक. त्यामुळे जरी तेल्या रोग आला तरी, त्यावर महागड्या कीडनाशक, बुरशीनाशक औषधांच्या डझनाने फवारण्या करून आणि महागडी खते घालून चांगल्या दराच्या आशेने शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेतात. भरपूर पैसे मिळतील, या आशेने उत्पादनावर शेतकरी कर्ज काढून खर्च करत आहेत.यंदा मात्र डाळिंबाचा दर ४० ते ५० रुपयांवर चढायला तयार नाही. ४ ते ५ प्रतीमध्ये डाळिंबाची विभागणी केली जाते. पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाच्या डाळिबाची किलोवर, तर इतर क्रेटवर १० ते १०० रुपयांपर्यंत येथील बाजार समितीच्या सौद्यात विकली जात आहेत. म्हणजे अगदी प्रतिकिलो ५० पैसे, ५ रुपये किलो असा शेतकऱ्यांना दर मिळत आहे. याशिवाय उरलेली डाळिंबे तर फेकून दिली जात आहेत.लवकरच बैठक घेऊ आणि व्यापारी, अडतदारांना सूचना देऊ, शिवाय शासनाला ज्यूस, अनारदाना निर्मिती बंद झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचे कळवू, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस. यु. जाधव यांनी सांगितले, तर डाळिंबे मोठ्या प्रमाणात विक्रीला येण्याच्या पार्श्वभूमीवर केवळ हप्तेखोरीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाने छापे टाकून उद्योग बंद केल्याची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे.माझी डाळिंबाची ७०० झाडे आहेत. गेली १५ दिवस मी दर वाढायची वाट पाहात आहे. आता डाळिंबे आपोआप जमिनीवर गळून पडायला लागली आहेत. १५-२० दिवसांपासून एकही व्यापारी बागेकडे फिरकला नाही. व्याजाने पैसे काढून मी जागेवर २ लाख रुपये खर्च केले आहेत. गेल्यावर्षी ११० रुपये किलोने डाळिंबे विकली. यंदा ५० रुपयानेही कुणी मागेना. पडलेली २५ क्रेट डाळिंबे आणली. एक क्रेट २५ रुपयालाही जाईना.- किसन मोटे, शेतकरी बोंबेवाडीयापूर्वी ८० टक्के डाळिंबे निर्यात होत होती; पण आता केंद्र शासनाने जाचक अटी घातल्याने डाळिंब निर्यात होत आहेत. त्याचा दरावर परिणाम झाला आहे. देशात स्वस्ताई करण्याचा नादात शासनाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटले आहे. ज्यूस आणि अनारदाना निर्मिती बंद असल्याने शेतकऱ्यांना डाळिंबे फेकून द्यावी लागत आहेत.- पंढरीनाथ नागणे,अडतदार, मंगलमूर्ती फ्रूट सप्लायरपाच वर्षांपासून आटपाडीत येऊन येथील डाळिंबे खरेदी करून दिल्ली, लखनौ यासह देशात अनेक भागात पाठवितो. यंदा उत्तरेत थंडीचा कडाका असल्याने डाळिंबांना मागणी कमी आहे. त्या तुलनेत आवक खूप वाढली आहे. त्यामुळे दर कमी आहे; पण शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांना डाळिंबे कचऱ्यात फेकावी लागत आहेत. - शमीम अहमद,डाळिंब व्यापारी, लखनौ