शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय

By admin | Updated: March 16, 2015 00:06 IST

इमारतीची दुरवस्था : चिमुकल्यांचे जीव मुठीत धरून ज्ञानार्जन

दिघंची : ५० वर्षांपूर्वी लाकडे गोळा करून व लोकवर्गणीमधून बांधण्यात आलेल्या दिघंची येथील मातंग समाजमंदिराची इमारत मोडकळीस आली असून, त्यामध्येच अंगणवाडीतील चिमुकली मुले जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करीत आहेत.दिघंची बसस्थानकाजवळ मातंग समाजाची लोकवस्ती पूर्वीपासून मोठी आहे व या समाजाचे दिघंची गावासाठी मोठे योगदान आहे. या समाजाने शाहिरी वाद्यवृंद कला आपल्यापरीने परिसरात नावलौकिकास आणली. यामध्ये ‘वसंत-जयवंत’ या शाहिरी नावाने समाजाचा शाहिरी ब्रॅण्ड निर्माण केला.५० वर्षांपूर्वी समाजातील तत्कालीन लोकांनी स्वायत्तपणे समाजमंदिर उभारण्याचा चंग बांधला. यामध्ये जगन्नाथ रणदिवे, गुड्डा रणदिवे, सोपाना रणदिवे, पांडुरंग रणदिवे, चितरंग रणदिवे, रामू रणदिवे, श्रावणा रणदिवे, बाबा रणदिवे, शंकर रणदिवे आदींनी परिसरातून लाकडे गोळा करून व लोकवर्गणीतून हे समाजमंदिर उभारले.या मंदिराचा वापर समाजातील बैठका व सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी होऊ लागला. दरम्यान, काही वर्षांनी इमारतीची पडझड झाल्याने तत्कालीन सरपंच सौ. शालन रणदिवे यांनी शासकीय अनुदानातून डागडुजी केली. या इमारतीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालवाडी, अंगणवाडीचा वर्ग भरविण्यात येतो. सध्या या इमारतीचे लाकूड कुजल्याने इमारत धोकादायक बनली आहेत. पाऊस सुरू झाल्यास या इमारतीत पाण्याची गळती सुरू होते. इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल, याचा अंदाज नाही. अशा धोकादायक इमारतीमध्ये ही चिमुकली मुले ज्ञानार्जन करीत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय इमारतीची दुरवस्था : चिमुकल्यांचे जीव मुठीत धरून ज्ञानार्जनदिघंची : ५० वर्षांपूर्वी लाकडे गोळा करून व लोकवर्गणीमधून बांधण्यात आलेल्या दिघंची येथील मातंग समाजमंदिराची इमारत मोडकळीस आली असून, त्यामध्येच अंगणवाडीतील चिमुकली मुले जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करीत आहेत.दिघंची बसस्थानकाजवळ मातंग समाजाची लोकवस्ती पूर्वीपासून मोठी आहे व या समाजाचे दिघंची गावासाठी मोठे योगदान आहे. या समाजाने शाहिरी वाद्यवृंद कला आपल्यापरीने परिसरात नावलौकिकास आणली. यामध्ये ‘वसंत-जयवंत’ या शाहिरी नावाने समाजाचा शाहिरी ब्रॅण्ड निर्माण केला.५० वर्षांपूर्वी समाजातील तत्कालीन लोकांनी स्वायत्तपणे समाजमंदिर उभारण्याचा चंग बांधला. यामध्ये जगन्नाथ रणदिवे, गुड्डा रणदिवे, सोपाना रणदिवे, पांडुरंग रणदिवे, चितरंग रणदिवे, रामू रणदिवे, श्रावणा रणदिवे, बाबा रणदिवे, शंकर रणदिवे आदींनी परिसरातून लाकडे गोळा करून व लोकवर्गणीतून हे समाजमंदिर उभारले.या मंदिराचा वापर समाजातील बैठका व सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी होऊ लागला. दरम्यान, काही वर्षांनी इमारतीची पडझड झाल्याने तत्कालीन सरपंच सौ. शालन रणदिवे यांनी शासकीय अनुदानातून डागडुजी केली. या इमारतीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालवाडी, अंगणवाडीचा वर्ग भरविण्यात येतो. सध्या या इमारतीचे लाकूड कुजल्याने इमारत धोकादायक बनली आहेत. पाऊस सुरू झाल्यास या इमारतीत पाण्याची गळती सुरू होते. इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल, याचा अंदाज नाही. अशा धोकादायक इमारतीमध्ये ही चिमुकली मुले ज्ञानार्जन करीत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)समाजमंदिराच्या दुरवस्थेबाबत विविध खात्यांकडे व पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. परंतु याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी दुरुस्तीबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखविला आहे.- रमेश रणदिवे तालुका संघटक सचिव