शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय

By admin | Updated: March 16, 2015 00:06 IST

इमारतीची दुरवस्था : चिमुकल्यांचे जीव मुठीत धरून ज्ञानार्जन

दिघंची : ५० वर्षांपूर्वी लाकडे गोळा करून व लोकवर्गणीमधून बांधण्यात आलेल्या दिघंची येथील मातंग समाजमंदिराची इमारत मोडकळीस आली असून, त्यामध्येच अंगणवाडीतील चिमुकली मुले जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करीत आहेत.दिघंची बसस्थानकाजवळ मातंग समाजाची लोकवस्ती पूर्वीपासून मोठी आहे व या समाजाचे दिघंची गावासाठी मोठे योगदान आहे. या समाजाने शाहिरी वाद्यवृंद कला आपल्यापरीने परिसरात नावलौकिकास आणली. यामध्ये ‘वसंत-जयवंत’ या शाहिरी नावाने समाजाचा शाहिरी ब्रॅण्ड निर्माण केला.५० वर्षांपूर्वी समाजातील तत्कालीन लोकांनी स्वायत्तपणे समाजमंदिर उभारण्याचा चंग बांधला. यामध्ये जगन्नाथ रणदिवे, गुड्डा रणदिवे, सोपाना रणदिवे, पांडुरंग रणदिवे, चितरंग रणदिवे, रामू रणदिवे, श्रावणा रणदिवे, बाबा रणदिवे, शंकर रणदिवे आदींनी परिसरातून लाकडे गोळा करून व लोकवर्गणीतून हे समाजमंदिर उभारले.या मंदिराचा वापर समाजातील बैठका व सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी होऊ लागला. दरम्यान, काही वर्षांनी इमारतीची पडझड झाल्याने तत्कालीन सरपंच सौ. शालन रणदिवे यांनी शासकीय अनुदानातून डागडुजी केली. या इमारतीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालवाडी, अंगणवाडीचा वर्ग भरविण्यात येतो. सध्या या इमारतीचे लाकूड कुजल्याने इमारत धोकादायक बनली आहेत. पाऊस सुरू झाल्यास या इमारतीत पाण्याची गळती सुरू होते. इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल, याचा अंदाज नाही. अशा धोकादायक इमारतीमध्ये ही चिमुकली मुले ज्ञानार्जन करीत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)दिघंचीतील मातंग समाजमंदिर ढासळतेय इमारतीची दुरवस्था : चिमुकल्यांचे जीव मुठीत धरून ज्ञानार्जनदिघंची : ५० वर्षांपूर्वी लाकडे गोळा करून व लोकवर्गणीमधून बांधण्यात आलेल्या दिघंची येथील मातंग समाजमंदिराची इमारत मोडकळीस आली असून, त्यामध्येच अंगणवाडीतील चिमुकली मुले जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करीत आहेत.दिघंची बसस्थानकाजवळ मातंग समाजाची लोकवस्ती पूर्वीपासून मोठी आहे व या समाजाचे दिघंची गावासाठी मोठे योगदान आहे. या समाजाने शाहिरी वाद्यवृंद कला आपल्यापरीने परिसरात नावलौकिकास आणली. यामध्ये ‘वसंत-जयवंत’ या शाहिरी नावाने समाजाचा शाहिरी ब्रॅण्ड निर्माण केला.५० वर्षांपूर्वी समाजातील तत्कालीन लोकांनी स्वायत्तपणे समाजमंदिर उभारण्याचा चंग बांधला. यामध्ये जगन्नाथ रणदिवे, गुड्डा रणदिवे, सोपाना रणदिवे, पांडुरंग रणदिवे, चितरंग रणदिवे, रामू रणदिवे, श्रावणा रणदिवे, बाबा रणदिवे, शंकर रणदिवे आदींनी परिसरातून लाकडे गोळा करून व लोकवर्गणीतून हे समाजमंदिर उभारले.या मंदिराचा वापर समाजातील बैठका व सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी होऊ लागला. दरम्यान, काही वर्षांनी इमारतीची पडझड झाल्याने तत्कालीन सरपंच सौ. शालन रणदिवे यांनी शासकीय अनुदानातून डागडुजी केली. या इमारतीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालवाडी, अंगणवाडीचा वर्ग भरविण्यात येतो. सध्या या इमारतीचे लाकूड कुजल्याने इमारत धोकादायक बनली आहेत. पाऊस सुरू झाल्यास या इमारतीत पाण्याची गळती सुरू होते. इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल, याचा अंदाज नाही. अशा धोकादायक इमारतीमध्ये ही चिमुकली मुले ज्ञानार्जन करीत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)समाजमंदिराच्या दुरवस्थेबाबत विविध खात्यांकडे व पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. परंतु याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी दुरुस्तीबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखविला आहे.- रमेश रणदिवे तालुका संघटक सचिव