शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

‘म्हैसाळ’च्या मुख्य कालव्याची दुरवस्था

By admin | Updated: June 29, 2015 00:29 IST

जागोजागी गळती : दोन्ही बाजूंनी भगदाडे, अस्तरीकरणाची मागणी

नरवाड : मिरज तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला अस्तरीकरण करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.कृष्णा खोरे महामंडळाच्या म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा क्र. २ पासून मुख्य कालव्याव्दारे ६ टप्प्याने कवठेमहांकाळ तालुक्याला पाणी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी म्हैसाळ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.वीस वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नरवाड (ता. मिरज) येथे दुसरा टप्पा करण्यात आला. येथे वितरण हौद बांधून पाणी मुख्य कालव्याव्दारे सलगरेपर्यंत वाहून नेण्यासाठी सिमेंटमध्ये दगडी बांधकाम करण्यात आले. मुख्य कालवा साधारणत: १५ फूट खोल आणि १५ फूट रुंदीचा तयार करण्यात आला.सद्यस्थितीत कालव्याचा २० टक्के भाग बांधकामाचे निसटलेले दगड आणि वहात आलेले खडक यांनी भरला आहे. याची जाणीव असूनही यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे. म्हैसाळ प्रकल्पाचे सध्या आवर्तन बंद असून, किमान यावेळी तरी अस्तरीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. कालव्याला अस्तरीकरण नसल्याने शेकडो हेक्टर जमिनी क्षारपड होत आहेत. अस्तरीकरणाअभावी लाखो लिटर पाणी प्रकल्पातून झिरपून पुन्हा नदीला मिळत आहे. मुख्य कालव्याच्या वितरण हौदात पडणारे पाणी आणि सलगरे येथील पोहोचणारे पाणी मुरत आहे. परिणामी दुष्काळी कवठेमहांकाळ, जत, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी यामुळे मृगजळ ठरणार आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यांचे दुर्लक्षमुख्य कालव्याच्या बांधकामावेळी ठेकेदार आणि तत्कालीन अधिकारी यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून उपलब्ध सिमेंटमध्येच कालव्याचे बांधकाम उरकले. यामुळे मुख्य कालव्याचे बांधकाम ढासळू लागले आहे. सद्यस्थितीत कालव्याचा २० टक्के भाग बांधकामाचे निसटलेले दगड आणि खडक यांनी भरला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे.