शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

संख परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा

By admin | Updated: February 12, 2015 00:30 IST

फिडर बदलाची कामे ठप्प : पाणी पुरवठा विस्कळीत

संख : फिडर बदलाची रेंगाळलेली कामे, जुन्या झालेल्या विद्युत वाहिन्या, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, जादा भारनियमन यामुळे संख (ता. जत) विद्युत विभाग केंद्रातून अनियमित व कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिके, द्राक्षे, डाळिंब, फळबागांवर व गावातील पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. विहिरीत पाणी असूनही अनियमित वीज पुरवठ्यामुळे ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.पूर्व भागातील संख येथील ३३ के.व्ही. विद्युत विभागांतर्गत ७२ गावांचा समावेश आहे. संखअंतर्गत माडग्याळ, उमदी, बोर्गी, तिकोंडी, दरीकोणूर, सोन्याळ, संख ही ७ उपकेंद्रे आहेत. अनेक गावांतील विद्युत वाहिन्या, तसेच सिमेंटचे, लोखंडी विद्युत खांब ४५ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्याकडे काहीही लक्ष दिलेले नाही. विद्युत वाहिन्यांच्या ताराही बदललेल्या नाहीत. जास्त वर्षे झाल्याने या तारांची क्षमता कमी झाली आहे. थोड्याशा वादळी वाऱ्यानेही तुटून पडत आहेत. विजेच्या खांबाजवळ झाडेही वाढली आहेत.विद्युत विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे गट करून कृषिपंपासाठी कनेक्शन दिले आहेत. शेतकऱ्यांनी विहिरी, कूपनलिकांची खुदाई करून जागोजागी विद्युत कनेक्शन घेतली आहेत. सध्या माळरानावर हजारो मीटरवरून जलवाहिनी करून पाणी उचलण्यात आले आहे. माळरानावर द्राक्ष, बोर, डाळिंब, आंबा या फळबागा उभारल्या आहेत. विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.वाड्या-वस्तीवर घरगुती पिठाच्या गिरण्या, मिरची कांडप यंत्र, घरगुती कनेक्शनचा विजेचा वापर वाढला आहे. परिणामी विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर ताण पडत आहे. कनेक्शन, विजेची मागणी वाढून सुद्धा विद्युत विभागाने समांतर विद्युत वाहिन्या तयार केल्या नाहीत. आहे त्याच जुन्या वाहिन्यांवर वीज पुरवठ्याचा गाडा पुढे हाकला जात आहे.गावोगावच्या गु्रप टी.सी.वर क्षमतेपेक्षा जादा कृषी कनेक्शन्स झाली आहेत. विद्युत विभागाच्या आशीर्वादाने हुक टाकून कृषी विद्युत मोटारीही चालविल्या जात आहेत. त्याचा अतिरिक्त ताण टी.सी.वर पडत आहे. त्यामुळे टी.सी. जळू लागल्या आहेत. टी.सी. जळल्यानंतर नवीन बसविण्यासाठी शेतकऱ्यांना जादा पैसे भरून, स्वत: कवठेमहांकाळवरून टी.सी. आणावा लागतो. यामध्ये ८-१० दिवसांचा कालावधी जातो. विजेच्या मागणीप्रमाणे वीज पुरवठा क्षमतेने केला जात नाही. कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. विद्युत वाहिन्यांवर अतिरिक्त लोड पडून तारा आपोआप तुटून पडत आहेत. दरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, लमाणतांडा या गावांतील कृषिपंपांना विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीच्या तारा वारंवार तुटत आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. विजेचा जास्त लोड लक्षात घेऊन सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी फिडर बसविण्याची गरज आहे. तशी प्रत्येक उपकेंद्रातील गावांना नवीन विद्युतलाईन टाकून फिडर बसविण्याला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फिडर बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. सुरळीतपणे वीज पुरवठा होण्यासाठी नवीन फिडर लवकरात लवकर बसविण्याची गरज आहे.विद्युत खांब, तारा, डी. पी. या ४० वर्षांपूर्वी बसविण्यात आल्या आहेत. खांब जुने झाल्याने वाऱ्याने मोडून पडतात. ताराही तुटतात. ही समस्या सोडविण्यासाठंी नवीन खांब, तारा बसविण्याची आवश्यकता आहे. तसेच भारनियमनाचे वेळापत्रक असताना सुद्धा जादा वेळ भारनियमन दिले जात आहे. संपर्क साधला असता, वरूनच वीज पुरवठा बंद आहे, अशी उत्तरे दिली जात आहेत. योग्य नियोजन करून भारनियमन कमी करणे शक्य आहे. (वार्ताहर)जादा बिलाची आकारणीदुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच, विद्युत कंपनीचे कर्मचारी विहिरीवर न जाताच, मीटर रीडिंग न पाहताच चुकीची रीडिंग देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीवरील मीटर न फिरताही जादा बिले आली आहेत. कमीत कमी बिलापेक्षा ही बिले दुपटीने आली आहेत. याकडे विद्युत वितरण कंपनीने लक्ष देऊन वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.