शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

खासगी प्रज्ञाशोध परीक्षेतून ‘आटपाडी’ची मुक्ती

By admin | Updated: July 16, 2015 23:14 IST

आर्थिक लुबाडणूकही थांबली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यात बंदी घालण्याची गरज--लोकमतचा प्रभाव

अविनाश बाड- आटपाडी -पालकांना आणि विद्यार्थ्यांना राज्यात आणि देशात क्रमांक आल्याच्या भूलथापा देऊन त्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या खासगी प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षांंच्या जंजाळातून आटपाडी तालुका मुक्त झाला. संपूर्ण जिल्हा कधी मुक्त होणार?, असा प्रश्न आता जिल्ह्यातील शिक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.शासनाचा शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषदेची कसलीही मान्यता नसताना अनेकखासगी संस्था इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या माथी कमी किमतीची पुस्तके मारून, तसेच परीक्षा फीच्या नावाखाली पालकांची दिवसाढवळ्या आर्थिक फसवणूक करीत आहेत. विशेष म्हणजे काही मुख्याध्यापक आणि शिक्षकच कमिशनच्या हव्यासापोटी विद्यार्थी आणि पालकांना फसवित आहेत. ‘लोकमत’ने या गंभीर प्रकरणावर आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने बंदी आणल्याची गुड न्यूज दिली. या वृत्तामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली. वॉटस् अ‍ॅपवरील शिक्षकांच्या प्रत्येक समूहावर ही बातमी झळकत असून, यावर अनेक प्रामाणिक गुरुजींनी सडेतोड मते व्यक्त केली आहेत. पण ज्यांचे हात टक्केवारीने बरबटले आहेत, असे शिक्षक यावर मत व्यक्त करण्यास नकार देत आहेत.एका शिक्षकाने तर सर्व गुरुजींना या परीक्षेविषयी माहिती देणारी व्यक्ती प्रथम कमिशन किती सांगते? याचा अर्थ काय? नेमकी जनमानसातील आपली प्रतिमा गुरुजींची आहे की दलालाची? असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला आहे.आटपाडीने धडा दिला, आता तो सर्वांनी घेतला पाहिजे. शिष्यवृत्ती, नवोदय आणि शासकीय प्रज्ञाशोध असताना, खासगी स्पर्धा परीक्षांचा आटापिटा कशाला? या परीक्षा नव्हत्या तेव्हा सर्वांची बुद्धी काय मंदगतीने वाढत होती काय? या परीक्षांचे पेव, त्यांचे प्रवेश, त्यांच्या परीक्षा पद्धती, त्यांचे पर्यवेक्षण, त्यांचे निकाल या सर्वांबाबत नीट माहिती घेतली असता, अशा परीक्षांतील पोकळपणा आणि पालकांच्या डोक्यावर चढलेले भूत नक्की उतरेल.निकालानंतर केलेला अनाठायी गाजावाजा आणि हा सर्वच प्रकार म्हणजे, उथळ पाण्याला खळखळाट फार, अशी वस्तुुस्थिती आहे. यामध्ये यशापेक्षा जास्त चमकोगिरीच करून गुरुजींसह पालक समाजाच्या आणि स्वत:च्याही डोळ्यात धूळफेक करून घेत आहेत, अशा प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. शासनाचा अभ्यासक्रम हा अतिशय तज्ज्ञांनी बनविलेला असतो. तेव्हा शिक्षकमित्रांनी अभ्यासक्रम आधी पूर्ण करावा. चमचेगिरी, एजंटगिरी, कमिशन घेणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वच शिक्षक बदनाम होत आहेत, याचा खासगी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या माथी मारताना हुजरेगिरी आणि लाचारी पत्करणाऱ्या शिक्षकांनी विचार करावा. तरच समाजात शिक्षकांचा सन्मान वाढेल, अशी शिक्षकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली आहे. तसेच खासगी मालक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा चालकांनी परीक्षांचे दुकानच काढले आहे. त्यामधून ते पैसे मिळवितात. छोटी मुले ही त्यांची गिऱ्हाईके बनतात. पालक काही शिक्षकांच्या भूूलथापांना बळी पडतात. अशा परीक्षा फक्त काही शिक्षक आणि चालकांनाच फायदेशीर आहेत, अशी एक बोलकी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.