शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

खासगी प्रज्ञाशोध परीक्षेतून ‘आटपाडी’ची मुक्ती

By admin | Updated: July 16, 2015 23:14 IST

आर्थिक लुबाडणूकही थांबली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यात बंदी घालण्याची गरज--लोकमतचा प्रभाव

अविनाश बाड- आटपाडी -पालकांना आणि विद्यार्थ्यांना राज्यात आणि देशात क्रमांक आल्याच्या भूलथापा देऊन त्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या खासगी प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षांंच्या जंजाळातून आटपाडी तालुका मुक्त झाला. संपूर्ण जिल्हा कधी मुक्त होणार?, असा प्रश्न आता जिल्ह्यातील शिक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.शासनाचा शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषदेची कसलीही मान्यता नसताना अनेकखासगी संस्था इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या माथी कमी किमतीची पुस्तके मारून, तसेच परीक्षा फीच्या नावाखाली पालकांची दिवसाढवळ्या आर्थिक फसवणूक करीत आहेत. विशेष म्हणजे काही मुख्याध्यापक आणि शिक्षकच कमिशनच्या हव्यासापोटी विद्यार्थी आणि पालकांना फसवित आहेत. ‘लोकमत’ने या गंभीर प्रकरणावर आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने बंदी आणल्याची गुड न्यूज दिली. या वृत्तामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली. वॉटस् अ‍ॅपवरील शिक्षकांच्या प्रत्येक समूहावर ही बातमी झळकत असून, यावर अनेक प्रामाणिक गुरुजींनी सडेतोड मते व्यक्त केली आहेत. पण ज्यांचे हात टक्केवारीने बरबटले आहेत, असे शिक्षक यावर मत व्यक्त करण्यास नकार देत आहेत.एका शिक्षकाने तर सर्व गुरुजींना या परीक्षेविषयी माहिती देणारी व्यक्ती प्रथम कमिशन किती सांगते? याचा अर्थ काय? नेमकी जनमानसातील आपली प्रतिमा गुरुजींची आहे की दलालाची? असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला आहे.आटपाडीने धडा दिला, आता तो सर्वांनी घेतला पाहिजे. शिष्यवृत्ती, नवोदय आणि शासकीय प्रज्ञाशोध असताना, खासगी स्पर्धा परीक्षांचा आटापिटा कशाला? या परीक्षा नव्हत्या तेव्हा सर्वांची बुद्धी काय मंदगतीने वाढत होती काय? या परीक्षांचे पेव, त्यांचे प्रवेश, त्यांच्या परीक्षा पद्धती, त्यांचे पर्यवेक्षण, त्यांचे निकाल या सर्वांबाबत नीट माहिती घेतली असता, अशा परीक्षांतील पोकळपणा आणि पालकांच्या डोक्यावर चढलेले भूत नक्की उतरेल.निकालानंतर केलेला अनाठायी गाजावाजा आणि हा सर्वच प्रकार म्हणजे, उथळ पाण्याला खळखळाट फार, अशी वस्तुुस्थिती आहे. यामध्ये यशापेक्षा जास्त चमकोगिरीच करून गुरुजींसह पालक समाजाच्या आणि स्वत:च्याही डोळ्यात धूळफेक करून घेत आहेत, अशा प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. शासनाचा अभ्यासक्रम हा अतिशय तज्ज्ञांनी बनविलेला असतो. तेव्हा शिक्षकमित्रांनी अभ्यासक्रम आधी पूर्ण करावा. चमचेगिरी, एजंटगिरी, कमिशन घेणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वच शिक्षक बदनाम होत आहेत, याचा खासगी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या माथी मारताना हुजरेगिरी आणि लाचारी पत्करणाऱ्या शिक्षकांनी विचार करावा. तरच समाजात शिक्षकांचा सन्मान वाढेल, अशी शिक्षकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली आहे. तसेच खासगी मालक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा चालकांनी परीक्षांचे दुकानच काढले आहे. त्यामधून ते पैसे मिळवितात. छोटी मुले ही त्यांची गिऱ्हाईके बनतात. पालक काही शिक्षकांच्या भूूलथापांना बळी पडतात. अशा परीक्षा फक्त काही शिक्षक आणि चालकांनाच फायदेशीर आहेत, अशी एक बोलकी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.