शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पतंगरावांनी जागविल्या आबांच्या आठवणी

By admin | Updated: July 8, 2016 00:57 IST

कवठेमहांकाळमध्ये ईदच्या शुभेच्छा : अचानक दिली भेट; तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून सत्कार

अर्जुन कर्पे --कवठेमहांकाळ --वेळ सायंकाळी चारची... कवठेमहांकाळ जुने बसस्थानक परिसरात वर्दळ असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांचे आगमन झाले आणि त्याठिकाणच्या मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित सगळेच अवाक् झाले. ईदच्या निमित्ताने पतंगरावांनी गुरुवारी आर. आर. आबांची आठवण करून दिल्याची चर्चा शहरासह संपूर्ण तालुक्यात होती.आबांच्या निधनानंतर तालुक्यातील जनता खरं तरं जनमानसातल्या नेत्याच्या शोधात आहे. कामाचे राहू दे, पण आपुलकी, बांधिलकी जपणाऱ्या, माणसात मिसळणाऱ्या खंबीर नेत्याच्या शोधात जनता आहे. त्याचीच प्रचिती आज पतंगरावांच्या रूपाने आल्याची चर्चा रंगली आहे. आबांच्या कामाची पद्धत लोकांमध्ये मिसळून राहण्याची होती. लोकांना कोणत्याही अडचणीत आधार देऊन ते विचारपूस करीत असत. प्रसंग येईल तिथे सर्वसामान्य जनतेशी ते संवाद साधत होते. परंतु त्यांच्या निधनानंतर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. पतंगराव कदम रांजणी येथून कवठेमहांकाळकडे येत होते. बसस्थानकानजीक आल्यानंतर त्यांच्या नजरेतून मुस्लिम बांधव सुटले नाहीत. माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव भोसले, उदय शिंदे यांच्या साक्षीने मुस्लिम युवकांना त्यांनी आपल्या रांगड्या, पण आपुलकीच्या भाषेत बोलावून घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पतंगरावांभोवती मोठा घोळका जमा झाला आणि साहेब गर्दीत हरवून गेले. यावेळी मुस्लिम बांधवांनी पतंगरावांचा जल्लोषात सत्कार केला. यावेळी येथील शेतकऱ्यांचीही त्यांनी चौकशी केली व त्यांच्या गाडीने वेग घेतला.यानिमित्ताने आबांसारख्या नेत्याची आठवण जनसामान्यांना न झाली तरच नवल. असाच आबांचा दौरा ठरलेला असायचा. जनसामान्यांची विचारपूस आबाही तेवढ्याच आपुलकीने करायचे. याचीच आठवण आज पतंगराव कदम यांनी करून दिल्याची भावना व्यक्त होत होती.सोशल मीडियावर चर्चाकाही वेळातच कदम यांनी कवठेमहांकाळ येथील मुस्लिम बांधवांना भेट दिल्याची क्षणचित्रे सोशल मीडियावरून तालुक्यात पसरली आणि यानिमित्ताने कदम यांना धन्यवाद देत जनता आबांच्या आठवणीत रममाण झाली.