शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

जयंतरावांचे ‘पिक्चर अभी बाकी है!

By admin | Updated: December 21, 2014 00:42 IST

नवा राजकीय डाव : महापालिका बरखास्तीच्या मागणीतून मदनभाऊंवर निशाणा

अविनाश कोळी ल्ल सांगलीवसंतदादा घराण्याविरोधातील संघर्षाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीतच पूर्णविराम न देता जयंत पाटील यांनी ‘पिक्चर अभी बाकी है’ असा संदेश देत महापालिका बरखास्तीची मागणी केली. मदन पाटील यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष त्यांनी यापुढेही चालूच राहील, याचे संकेत दिल्याने सांगलीच्या राजकीय मैदानात आता पुन्हा हा सामना रंगणार आहे. सात वर्षांपूर्वी जयंतरावांनी सांगलीत वसंतदादा घराण्याच्या संघर्षाचा नारळ फोडला. २00८ मधील महापालिका निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेला संभाजी पवारांच्या माध्यमातून त्यांनी मदन पाटील यांना धोबीपछाड दिला. पुन्हा २0१३ च्या महापालिका निवडणुकीत मदन पाटील यांनी गत पराभवाची सव्याज परतफेड केल्याने जयंतरावांनी संघर्षाची धार अधिक तीव्र केली. लगेचच लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रतीक पाटील यांच्या पराभवासाठी ‘फिल्डिंग’ लावली. त्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर लगेचच २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत मदन पाटील यांच्याशी उघड संघर्ष त्यांनी सुरू केला. मदन पाटील यांचा पराभव म्हणजे काळ््या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा उल्लेख त्यांनी केला. दादांच्या वारसदारांनी संस्थात्मक वाट कशी लावली, याचे उल्लेख भाषणांमध्ये करून त्यांनी छुप्या संघर्षाला मैदानी स्वरुप दिले. प्रतीक पाटील आणि मदन पाटील यांच्या पराभवानंतर जयंतराव या राजकीय संघर्षाला पूर्णविराम देतील, असे अनेकांना वाटले होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. जयंतरावांनी अधिवेशनात गॅस्ट्रोच्या साथीवरून महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली. मदन पाटील यांना घायाळ करण्यासाठीच त्यांनी महापालिकेवर निशाणा साधला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत रामराज्य होते, असे नाही. सध्यस्थितीत त्यांची सत्ता असती तर फारसा फरक पडला असता, असे वाटत नाही. इथून तिथून सगळे सारखेच असल्याने नागरिकांचे दुखणे दूर करण्यासाठी सध्याच्या राजकारणात कोणी मसिहा बनून मदतीला धावेल, असे कोणालाही वाटत नाही. ग्रामीण भागातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले होते. दूषित पाण्याचा प्रश्नही ग्रामीण भागात तसाच आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषदेही या साथीला कारणीभूत ठरते. त्यामुळे त्यांच्या मागणीला राजकीय रंग असल्याचेच स्पष्ट होत आहे. वसंतदादा आणि राजारामबापू पाटील यांच्यातील जुन्या संघर्षाला नवा आयाम देत जयंतरावांनी अनेकदा दादांच्या वारसदारांवर वार केले आहेत. या राजकीय हल्ल्यात जखमी झालेल्या वारसदारांचे खच्चीकरण करण्याची हीच नामी संधी असल्याचे हेरून जयंतरावांनी महापालिका बरखास्तीची मागणी केली.