शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

रेल्वे वसाहतीत घुसखोरांचा शिरकाव

By admin | Updated: February 12, 2015 00:34 IST

मिरजेतील प्रकार : कर्मचाऱ्यांनी नेमले पोटभाडेकरू

मिरज : मिरजेत रेल्वे कर्मचारी वसाहतीत रेल्वे कर्मचाऱ्यांशिवाय घुसखोरांनी शिरकाव केला आहे. कर्मचारी वसाहतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी रेल्वे कोट्यवधी रूपये खर्च करीत असताना त्याचा फायदा वसाहतीत वास्तव्य करणारे घुसखोर घेत असल्याचे चित्र आहे. मिरज रेल्वेस्थानकात विविध विभागात सुमारे दीड हजार कर्मचारी काम करतात. रेल्वे स्थानकालगत कोल्हापूर चाळ व माणिकनगर या नावाने ओळखली जाणारी कर्मचारी वसाहत आहे. येथे श्रेणी एक ते चार पर्यंतची ४७० घरे आहे. कर्मचारी वसाहतीस व रेल्वेस्थानकास पाणीपुरवठ्यासाठी रेल्वेने सुमारे चार कोटी रूपये खर्चून कृष्णा नदीतून स्वत:ची नळपाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अत्यंत कमी दरात रेल्वे कर्मचारी वसाहतीत पाणीपुरवठा करण्यात येतो. रेल्वे कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार ते दोन हजार रूपयात घर मिळते. रेल्वेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना येथे घरे देण्यात आली आहेत. मात्र घरे मिळालेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपली घरे इतरांना जादा भाड्याने दिली आहेत. रेल्वेवसाहतीत कर्मचाऱ्यांशिवाय वास्तव्य करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गरजू रेल्वे कर्मचारी रेल्वेच्या घराच्या प्रतीक्षेत असताना घरे मिळालेल्या काही कर्मचाऱ्यांनी घरात पोटभाडेकरू ठेवल्याने याबाबत तक्रारी सुरू आहेत. रेल्वे कर्मचारी वसाहतीतील घरांच्या देखभाल दुरूस्तीसाठी प्रतिवर्षी सुमारे ७० लाख रूपये खर्च होतात. रेल्वे वसाहतीत बंद व मोकळ्या असलेल्या घरांवरही काहीजणांनी अवैध कब्जा केल्याची माहिती मिळाली. नियमबाह्य पध्दतीने घरे भाड्याने देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्याचे अधिकार रेल्वेच्या बांधकाम निरीक्षकांना आहेत. मात्र मिरज विभागातील कोल्हापूर ते साताऱ्यापर्यंत विविध स्थानकाच्या परिसरात रेल्वे कर्मचारी वसाहतीत हजारो घरांच्या देखभाल दुरूस्ती कामात व्यस्त असल्यामुळे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा घुसखोरांनी फायदा घेतला आहे. रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर एका महिन्यात घर सोडण्याचा नियम आहे. मात्र सेवानिवृत्तीनंतरही काही कर्मचारी वर्षानुवर्षे रेल्वे वसाहतीत तळ ठोकून आहेत. ‘आंधळं दळतंय...’ अशा कारभारामुळे गरजू रेल्वे कर्मचारी मात्र घराच्या सुविधेपासून वंचित असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)