शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक क्षेत्रालगतचे शेतीक्षेत्र आले धोक्यात

By admin | Updated: October 26, 2014 00:02 IST

सांडपाणी उघड्यावर : रखडलेल्या शुध्दीकरण प्रकल्पाकडे दुर्लक्ष

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील केमिकल उद्योगांमधून बाहेर पडणारे केमिकलमिश्रित सांडपाणी सध्या उद्योजकांकडून उघड्यावर सोडण्यात येत आहे़ त्यामुळे औद्योगिक क्षेत्रालगतचे शेतीक्षेत्र धोक्यात आले आहे़ त्यातच गेली अनेक वर्षे रखडलेल्या एमआयडीसीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडेही औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत असून, हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे़ औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाचशेहून अधिक उद्योग कार्यरत आहेत़ जिल्ह्यातील या सर्वात मोठ्या असलेल्या एमआयडीसीत इंजिनिअरिंग, आॅईल, प्लास्टिक, कोल्ड स्टोअरेजबरोबरच अनेक केमिकलमिश्रित उद्योग या एमआयडीसीत कार्यरत आहेत़ या केमिकल उद्योगामधूनच औद्योगिक क्षेत्रालगतच्या शेतीक्षेत्रामध्ये उघड्यावर सांडपाणी सोडले जात आहे़ त्यामुळे औद्योगिक क्षेत्रालगतचे शेतीक्षेत्र धोक्यात आले आहे़ शेतीक्षेत्र कानडवाडी, सावळी, बामणोली या गावामध्ये आहे. औद्योगिक क्षेत्रालगतच्या शेतीमध्ये कोणतेही पीक येत नाही़ पीक आले तरी त्या पिकाला या केमिकलमिश्रित सांडपाण्याचा मोठा धोका सहन करावा लागत आहे़ याबरोबरच औद्योगिक क्षेत्रालगतच्या विहिरींचे पाणीही खराब झाले आहे़ हे पाणी शेतीबरोबरच पिण्यासही खराब झाले आहे़ याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविले़ तरीही त्यांच्याकडून या केमिकलमिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जात नाही़ या केमिकलमिश्रित सांडपाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली उद्योजकांनी कृष्णा व्हॅली इन्व्हायरोटेक प्रा़ लिमिटेड ही कंपनी स्थापन केली़ त्यांनी कुपवाड एमआयडीसीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे निम्म्याहून अधिक कामही पूर्ण केले़ परंतु, न्यायालयीन प्रक्रियेचे नाव पुढे करून हा प्रकल्प दुर्लक्षितच राहिला आहे़ या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे तत्कालीन उद्योगमंत्री डॉ़ पतंगराव कदम यांच्याहस्ते उद्घाटन झाले होते़ त्या उद्घाटनापासून जिल्ह्यातील नेत्यांनीही या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही़ याबरोबरच औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सचिवांकडेही तक्रारी होऊन त्यांनीही या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आहे़ कोल्हापूरमध्ये या प्रकल्पाप्रमाणेच प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे कामही उत्कृष्टपणे सुरू आहे़ मात्र, जिल्ह्यात विकासाचे व्हिजन नसल्यामुळे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी पसरली असून, औद्योगिक विकास महामंडळाने या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होऊ लागली आहे़ तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही केमिकल मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शहर परिसरातील नागरिकांतून व्यक्त होऊ लागली आहे़ (वार्ताहर)