शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

आटपाडीची ओळख ‘अधिकाऱ्यांचा तालुका’ अशी व्हावी !

By admin | Updated: August 4, 2016 01:27 IST

अमरसिंह देशमुखांची तळमळ : खेबूडकर कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन; तालुक्यात पाणी व्यवस्थापनाची गरज

अविनाश बाड -आटपाडी--प्यायला पाणी नाही, कायम दुष्काळी परिस्थिती, ओळखच दुष्काळी भाग अशी. तसेच जगण्यासाठी गोदीमध्ये जाऊन काम करणारी, मेंढरं घेऊन कोकणामध्ये जाणारी आणि वर्षानुवर्षे ऊस तोडायला जाणारी माणसं, ही तालुक्याची दुसरी ओळख. पण येत्या पाच वर्षात ही ओळख पुसायची आहे. हिरवा तालुका आणि अधिकाऱ्यांचा तालुका अशी नवी ओळख निर्माण करणे आपले स्वप्न आहे, अशी तळमळ रविवारी जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी जाहीरपणे व्यक्त केली. इथल्या नेत्यांची स्वप्नं बदलू लागली, तालुक्याचं चित्र बदलेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.येथील दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीने माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून बांधलेल्या आबासाहेब खेबूडकर ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या इमारतीचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. वास्तविक अवघ्या महिन्यापूर्वी आटपाडीत माजी मंत्री अजित पवार आले होते. त्यांच्याहस्ते पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाची इमारत तयार असताना आणि महाविद्यालयाच्या आवारातच कार्यक्रमाचे आयोजन केलेले असताना, त्यावेळी उद्घाटन करण्यात आले नाही. त्यासाठी रविवारी स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आला. व्यासपीठावर राजकारणी मंडळी असूनही राजकारणविरहित केवळ शैक्षणिक आणि तालुक्याची ओळख बदलासाठीची घोषणा होणारा हा तालुक्यातील पहिला कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले, आटपाडीतील स्वागताचा हा माझा शेवटचा कार्यक्रम समजा. मी या तालुक्यातील तरुणांना युपीएससी आणि एमपीएससीसाठी सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यास तयार आहे. अमरसिंह देशमुख यांच्या तळमळीची त्यांनी प्रशंसाही केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेश आणि बिहारला मागे टाकणारी अधिकाऱ्यांची संख्या आपण आटपाडी तालुक्यातून निर्माण करू. राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, टेंभूचे पाणी आले म्हणून केवळ विकास होणार नाही, त्याचे नियोजन हवे. दिशा देणाऱ्या नेत्याची गरज आहे. देशमुखांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना एकत्रित करून तलावातून थेट शेतकऱ्यांच्या शेतात सामूहिक ठिबक सिंचन पद्धतीने शेती करण्यासाठी गेले वर्षभर रान उठविले आहे. आटपाडी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पश्चिमेकडून पूर्वेकडे उताराची आहे. जागोजागी सर्वच तलाव बांधले आहेत. ओढ्याने जरी ‘टेंभू’च्या पाण्याने तलाव भरले आणि पाण्याची आवर्तने ठरविली तर, सामूहिक ठिबक सिंचन पद्धतीमुळे तालुका हिरवागार होेण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातली सर्वात मोठी शिक्षण संस्था त्यांच्याकडे आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांच्या गुणवत्तेला वाव मिळाला, संधी मिळाली, तर हे स्वप्न सत्यात उतरणे शक्य आहे. मात्र या मंडळींना त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षणात राजकारणाचा अडसर येणार काय?पुण्या-मुंबईसह आटपाडीत शिकून शहरात स्थायिक झालेले अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी रविवारी येथे आल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून ते आटपाडीचे वाटतच नव्हते. यातील ज्येष्ठ मंडळींना स्वत: खुर्ची उचलून देताना हर्षवर्धन देशमुखही दिसले. त्या मंडळींचं एवढंच म्हणणं होतं की, आटपाडीत शिक्षणाची सोय झाली नसती, तर आम्ही शहरात दिसलो नसतो. आता सामूहिक ठिबक सिंचनला परवानगी न देण्यात राजकारण आहे म्हणतात. मग स्पर्धा परीक्षेमध्येही अडसर निर्माण होणार काय? आणि देशमुख त्यावर कशी मात करणार? यावर स्वागतार्ह स्वप्नाचे भवितव्य अवलंबून आहे.