शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उमदीसह ४२ गावांतील शेतकऱ्यांचा सांगलीत ठिय्या

By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST

खासदार, आमदारांची ग्वाही फोल : आंदोलकांनी नेत्यांना सुनावले खडे बोल; संघर्ष सुरूच राहणार

सांगली : जत पूर्व भागातील ४२ गावांतील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी सुरू केलेली उमदी ते सांगली पदयात्रा सहा दिवसांनंतर सोमवारी सांगलीत पोहोचली. गावकऱ्यांनी येथे येताच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले. काही राजकीय नेत्यांनी आंदोलन ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला, पण मंत्र्यांकडून लेखी आश्वासन घेऊन यावे, तरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. परिणामी ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. जत पूर्व भागातील उमदीसह ४२ गावे ३२ वर्षांपासून दुष्काळाच्या खाईत होरपळत आहेत. या गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करून शेतीला पाणी द्यावे किंवा सरकारने कर्नाटकात जाण्याचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी आहे. त्यासाठी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, दावल शेख, निवृत्ती शिंदे, संजय तेली, राजू चव्हाण, मल्लिकार्जुन सुरगोंड, मानसिध्द शिरगट्टी, संगू गवळी, रोहिदास सातपुते, चिदानंद आवटी, संतोष गुरव, हरिष शेटे, भीमू नागोंड, काशिलिंग बिराजदार, चंद्रकांत नागणे, महंमद कलाल यांच्या नेतृत्वाखाली दि. १ जुलै रोजी ग्रामदैवत मलकारसिध्दाचे दर्शन घेऊन उमदी ते सांगली पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. ही पदयात्रा सोमवारी सांगलीत दाखल झाली. येथील पुष्पराज चौकात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे आदींनी पदयात्रेचे स्वागत केले. खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधी पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. आंदोलकांच्या धास्तीने तेथे पोलीस बंदोबस्त मोठ्याप्रमाणात ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांचे ठिय्या आंदोलन झाले. यावेळी खा. पाटील म्हणाले की, दुष्काळी जत तालुका आणि पूर्व भागातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. अनुशेषामुळे म्हैसाळ योजनेस निधी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तरीही विशेष निधी देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार आहे. दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रश्न सोडवू. आता आंदोलन मागे घ्यावे. शेतकऱ्यांचा ३२ वर्षे पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. म्हैसाळ योजनेसाठी तीनशे कोटींचा निधी दिला, तर १२० गावांचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. शेतकरी कर्नाटकमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शासनाकडे पाठपुरावा करून जत पूर्व भागातील शेतीला पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शासनास थोडा वेळ देण्याची गरज असून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे विलासराव जगताप यांनी सांगितले. आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर रेश्माक्का होर्तीकर, खा. पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आ. जगताप, आ. खाडे, सुरेश शिंदे, प्रभाकर जाधव, शेखर इनामदार, आकाराम मासाळ, संजीवकुमार सावंत, सुशिला होनमोरे, जतचे उपनगराध्यक्ष उमेश सावंत, प्रकाश जमदाडे, रमेश साबळे आदींनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, आंदोलकांच्या तीव्र भावना असल्याचे चोवीस तासात सरकारकडे कळविण्यात येईल. शिष्टमंडळाने आंदोलक आणि पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांना बैठकीतील वृत्तांत सांगितला. आंदोलन मागे घेणार असाल तर जिल्हाधिकारी गायकवाड येथे येऊन मागण्यांबाबत आश्वासन देण्यास तयार आहेत. तुमची ती तयारी आहे का?, असा प्रश्न खा. पाटील व जगताप यांनी विचारला. यावेळी आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. खासदार, आमदारांनी मुंबईला जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची विनंती सुनील पोतदार यांनी केली. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी ठणकावून सांगितले आणि बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)