शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

अनुदान एलबीटी की जकातीवर?

By admin | Updated: March 7, 2015 00:00 IST

महापालिका संभ्रमात : दरवर्षी कोट्यवधीचा फटका बसण्याची भीती

शीतल पाटील / सांगलीराज्याच्या अर्थसंकल्पात एलबीटी रद्द होणार असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिले आहेत. एलबीटी रद्द करून व्हॅटवर सरचार्ज लागू होणार आहे. एलबीटीनंतर शासनाकडून अनुदान मिळणार, की सरचार्जची रक्कम महापालिकांना दिली जाणार, याबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. अशातच अनुदान द्यायचे झाल्यास ते सध्याच्या एलबीटी वसुलीवर मिळणार, की जकातीच्या उत्पन्नावर, याबाबत महापालिका संभ्रमात आहे. एलबीटीवर अनुदान दिल्यास सांगली महापालिकेला पहिल्यावर्षी दहा कोटींच्या हक्काच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे, तर पुढील प्रत्येकवर्षी हा तोटा कोट्यवधी रुपयांनी वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच जकातीच्या उत्पन्नावर अनुदानाची मागणी करण्याचा विचार पालिकास्तरावर सुरू आहे. महापालिकेने २००८ ते २०१३ या कालावधित जकातीची विक्रमी वसुली केली. पालिकेची ४० ते ४५ कोटींची जकात २०१३ पर्यंत १०५ कोटींवर पोहोचली होती. जकात रद्द करून शासनाने एलबीटी लागू करण्याची घोषणा केली. त्यात सांगलीत एक वर्ष उशिरा एलबीटी लागू झाला. नव्या कराला व्यापाऱ्यांनी विरोध करीत असहकार आंदोलन पुकारले. त्यामुळे पहिल्यावर्षी जेमतेम ५० कोटींपर्यंत एलबीटीची वसुली झाली. त्यात पेट्रोलियम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन कंपन्यांनीच कराचा भरणा केला होता. २०१४-१५ या आर्थिक वर्षात पालिकेच्या एलबीटी वसुलीत थोडीफार सुधारणा झाली. आतापर्यंत ७० कोटींपर्यंत एलबीटी वसूल झाला आहे. मार्चअखेरीस ८० ते ८५ कोटींपर्यंत वसुली जाईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यातच आता शासनाने एक एप्रिलपासून एलबीटी रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या १८ मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा होईल. पण खरा प्रश्न आहे तो एलबीटीच्या अनुदानाचा! शासनाने एलबीटीवर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यास पालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. गेल्या तीन वर्षांतील एलबीटीच्या वसुलीवर अनुदान देण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास पालिकेला ८० कोटींवर २० टक्के नैसर्गिक वाढ धरून अनुदान मिळेल. वस्तुत: एलबीटी लागू होण्यापूर्वी पालिकेच्या जकातीचे उत्पन्न १०५ कोटी होते. त्यात गेल्या दोन वर्षातील नैसर्गिक वाढ धरल्यास आतापर्यंत पालिकेचे उत्पन्न १४० ते १४५ कोटींपर्यंत अपेक्षित आहे. म्हणजेच सुमारे ७० कोटी रुपयांच्या हक्काच्या उत्पन्नासह त्यावरील नैसर्गिक वाढीची २० टक्क्याच्या उत्पन्नापासून पालिकेला वंचित राहावे लागणार आहे. म्हणजे पहिल्या वर्षी सर्वसाधारण १४ कोटीचे अतिरिक्त उत्पन्न पालिकेला मिळणार नाही. हा आकडा दरवर्षी वाढतच जाणार आहे. पालिकेचे उत्पन्न कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम नागरी सुविधांवर होणार आहे. सध्या ड्रेनेज, पाणीपुरवठासह विविध शासकीय योजनांसाठी २२५ कोटी रुपयांची गरज आहे. ही रक्कम कर्जस्वरुपात उभी करण्याचा प्रस्ताव आहे. भविष्यात पालिकेने कर्ज घेतले, तर त्याची परतफेड करतानाही नाकीनऊ येणार आहे. एकूणच एलबीटी रद्द झाल्यानंतर पालिकेसमोरील आर्थिक संकटांचे शुक्लकाष्ठ संपणार नाही. भरून न येणारे नुकसान : विवेक कांबळेव्यापाऱ्यांनी दोन वर्षात १६५ कोटी रुपयांचा एलबीटी नागरिकांकडून वसूल केला आहे. त्यावरील व्याज व दंड ४५ कोटी रुपये होतो. एकूण २१० कोटीचे उत्पन्न पालिकेला मिळायला हवे होते. पण व्यापाऱ्यांच्या अडेलतट्टूपणामुळे उत्पन्न घटले आहे. त्याचा फटका महापालिकेला आणि पर्यायाने शहरातील नागरिकांना बसणार आहे. शासनाने एलबीटीवर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यास, महापालिकेचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. त्याला सर्वस्वी व्यापारीच जबाबदार राहतील. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. आमचा लढा सांगलीतील सर्वसामान्य जनतेसाठी आहे. व्यापारीसुद्धा शहराचे नागरिक आहेत. तेही पालिकेच्या सुविधांचा लाभ घेतात. त्यामुळेच आम्ही एलबीटीसाठी सक्तीची कारवाई सुरू केली आहे, असे महापौर विवेक कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.