शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

गोविंद पानसरे, दाभोलकर यांचे खुनी मोकाट का?

By admin | Updated: April 10, 2015 00:33 IST

पलूसमध्ये चर्चासत्र : महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना पुरोगामी कार्यकर्त्यांचा सवाल

पलूस : नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे यांचे खुनी का मोकाट फिरत आहेत? आता पुरोगाम्यांनी आक्रमक होण्याची गरज आहे. कारण विचारांची लढाई वांझोटी असता कामा नये. दाभोलकर, पानसरेंच्या खुनामागे राजकीय फूस असल्याने, झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करण्याची गरज पुरोगामी कार्यकर्त्यांनी सोमवारी व्यक्त केली.येथील ज्योती वाचनालयात क्रांतिवीर भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, तसेच क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पलूस व कडेगाव तालुका समाजवादी प्रबोधिनी, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि पुरोगामी विचार संघटनेच्यावतीने ‘क्रांतिवीरांचे योगदान’, ‘शहीद कॉ. गोविंद पानसरे व डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचे रहस्य’, तसेच ‘भूमी अधिग्रहण विधेयक एक भयानक संकट’ या विषयांवर खुले विचारमंथन आयोजित केले होते. चर्चासत्राचे निमंत्रक व्ही. वाय. आबा पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्य हे शोषणमुक्त समाजाचे स्वातंत्र्य असले पाहिजे, अशी शहीद भगतसिंहांची इच्छा होती. नागनाथअण्णांनी देशाला सहकारात आदर्श घालून दिला. चांगले विचार, चांगले लोक प्रतिगाम्यांना नको आहेत. समाजामध्ये दोन विचारप्रवाह असताना, एखादा विचार अग्रक्रमाने मांडला जातो, त्यावेळी प्रतिविचारांना राग येतो. मग प्रतिगामी विचाराचे आक्रमकपणे शस्त्राचा वापर करतात. चार्वाक, तुकोबा ते महात्मा गांधींपासून आजवर हे चालत आले आहे, असे त्यांनी सांगितले.फक्त हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करून त्यांना मोठे करून चालणार नाही, तर जात विघटनाचे सूत्र हाती घेण्याची गरज संपतराव पवार यांनी व्यक्त केली. वैदिक कालातीत अस्पृश्यता, गुलामगिरीला विरोध करत मानवतावादी भागवत धर्म संतांनी दिला. पूर्वीपासूनच धर्म प्रत्येकाच्या अंगी भिनल्याने, जो धर्माला हात घालतो तो संपतो. त्यामुळे फक्त आरोप न करता राज्यकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे, असे ते म्हणाले.लोकसहमतीशिवाय शेतजमीन व्यावसायिक कारणासाठी अधिग्रहण होता कामा नये. पिकावू शेती उद्योगांना देता कामा नये. बहुराष्ट्रीय कंपन्यांना येथे जमिनी देऊन नदी, हवा, पाणी यांचे प्रदूषण करू देता कामा नये. याबाबत जनजागृती करण्याची गरज प्राचार्य तानाजीराव चव्हाण यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्यसेनानी श्रीरंग यादव व आनंदराव निकम यांनी भगतसिंंह व नागनाथअण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या चर्चेत प्रा. विठ्ठल सदामते, देवदास कांबळे, अ‍ॅड. चंद्रकांत फाळके, प्रा. रेखा पाटील, दादासाहेब पाटील, बी. बी. खोत, किरण शिंदे, कॉ. विशाल, विक्रम, कॉ. मारुती शिरतोडे, अ‍ॅड. सतीश लोखंडे, प्रा. रवींद्र येवले, उत्तम सुतार, फाटक गुरूजी, शामराव मोरे यांनी सहभाग घेतला. संदीप नाझरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)धमकीचा निषेधहरित न्यायालयाने सांगली महापालिकेला ठोठावलेला दंड हा पुरोगामी कार्यकर्त्यांचा विजय असल्याने, अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे, रवींद्र चव्हाण, तसेच शहर सुधार समितीच्या अभिनंदनाचा ठराव संदीप नाझरे यांनी मांडला. अ‍ॅड. शिंदे यांना धमकावणाऱ्या नगरसेवकाचा निषेध करण्यात आला.