शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

एफडीआयद्वारे बिहारात रेल्वे इंजिनांचे कारखाने

By admin | Updated: November 9, 2015 22:05 IST

केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेखाली बिहारमध्ये मरहोरा आणि मधेपुरा येथे अनुक्रमे डीझेल आणि वीजेची रेल्वे इंजिने बनविण्याचे कारखाने सुरु करण्याची कंत्राटे अमेरिकेतील

विकास शहा-शिराळा उत्तर व पूर्व भागासाठी वरदायी ठरलेल्या शिराळा शहराजवळच्या मोरणा मध्यम प्रकल्पात ऐन पावसाळ्यात ५0 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा राहिला. त्यातच मोरणा नदीपात्र कोरडे पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोरणा मध्यम प्रकल्प पाऊण टीएमसी क्षमतेचा आहे. मृतसाठा सोडून ५२६ एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा होतो. धरण लाभक्षेत्राखाली साडेचार हजार क्षेत्र ओलिताखाली येते; मात्र सध्या दुप्पट क्षेत्र ओलिताखाली आहे. वाकुर्डेपासून मांगलेपर्यंत मांगले गाव वगळता जवळपास सर्व गावांना पिण्याचा पाणी पुरवठा या धरणातूनच होतो. शिराळा येथील औद्योगिक वसाहतीमधील छोट्या-मोठ्या ५० उद्योगधंद्यांसाठी लागणारे पाणीही या धरणातूनच घेतले जाते. या धरणामधून सात हजार अश्वशक्ती मोटारीने पाणी उपसा सुरू असतो. शिराळा तालुक्यातील उत्तर व पूर्व भाग बहुतांशी पाण्यापासून वंचित आहे. वंचित असणाऱ्या भागातील काहीअंशी जमिनी मोरणा धरणावर अवलंबून आहेत. या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. मात्र पावसाळ्यात तब्बल तीन महिने पावसाने पाठ फिरवली. जिल्ह्यात शिराळा तालुका वगळता सर्वत्र परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील खरीप हंगाम वाया गेला आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावरही झाला आहे. धरण झाल्यापासून पहिल्यांदाच एवढा कमी पाणीसाठा झाला आहे. उन्हाळा सुरू व्हायला काही महिने बाकी असतानाच पाणीटंचाई भासू लागली आहे. दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत असतानाही पाटबंधारे विभागाने गांधारीची भूमिका का घेतली आहे? अजूनही पाण्याचे नियोजन का केलेले नाही?, असा सवाल उपस्थित होत आहे. पाटबंधारे खात्याच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे नियोजन केलेले नाही. धरणाखालील पिकांची अवस्था बिकट आहे. मोरणाकाठच्या शेतकऱ्यांनी लाभक्षेत्रापेक्षा दुप्पट क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. मोरणा नदीपात्र कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.प्रशासनाने पाण्याचे नियोजन करावेशिराळा शहरासह औद्योगिक वसाहतीसाठी मोरणा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. धरणातील पाणी साठ्यामध्ये घट होत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. शिराळा ग्रामपंचायतीने माजी आ. मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विचारविनिमय करून यासंदर्भात ठरावही दिला आहे, अशी प्रतिक्रिया शिराळ्याचे सरपंच गजानन सोनटक्के यांनी दिली.पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस : रब्बी हंगाम अडचणीत शिराळा तालुक्यात ५० टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तालुका पूर्ण दुष्काळी परिस्थितीत आहे. मोरणा धरणात ४0 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा वापर नियोजनाने केला नाही, तर मोरणा परिसरामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल. याचा विचार करून लाभक्षेत्रातील शेतकरी व पाटबंधारे विभागाने एकत्रित बसून समन्वयाने नियोजन केले, तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया मोरणा फळे-फुले भाजीपाला संघ अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी दिली.