शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

एफडीआयद्वारे बिहारात रेल्वे इंजिनांचे कारखाने

By admin | Updated: November 9, 2015 22:05 IST

केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेखाली बिहारमध्ये मरहोरा आणि मधेपुरा येथे अनुक्रमे डीझेल आणि वीजेची रेल्वे इंजिने बनविण्याचे कारखाने सुरु करण्याची कंत्राटे अमेरिकेतील

विकास शहा-शिराळा उत्तर व पूर्व भागासाठी वरदायी ठरलेल्या शिराळा शहराजवळच्या मोरणा मध्यम प्रकल्पात ऐन पावसाळ्यात ५0 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा राहिला. त्यातच मोरणा नदीपात्र कोरडे पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोरणा मध्यम प्रकल्प पाऊण टीएमसी क्षमतेचा आहे. मृतसाठा सोडून ५२६ एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा होतो. धरण लाभक्षेत्राखाली साडेचार हजार क्षेत्र ओलिताखाली येते; मात्र सध्या दुप्पट क्षेत्र ओलिताखाली आहे. वाकुर्डेपासून मांगलेपर्यंत मांगले गाव वगळता जवळपास सर्व गावांना पिण्याचा पाणी पुरवठा या धरणातूनच होतो. शिराळा येथील औद्योगिक वसाहतीमधील छोट्या-मोठ्या ५० उद्योगधंद्यांसाठी लागणारे पाणीही या धरणातूनच घेतले जाते. या धरणामधून सात हजार अश्वशक्ती मोटारीने पाणी उपसा सुरू असतो. शिराळा तालुक्यातील उत्तर व पूर्व भाग बहुतांशी पाण्यापासून वंचित आहे. वंचित असणाऱ्या भागातील काहीअंशी जमिनी मोरणा धरणावर अवलंबून आहेत. या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. मात्र पावसाळ्यात तब्बल तीन महिने पावसाने पाठ फिरवली. जिल्ह्यात शिराळा तालुका वगळता सर्वत्र परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील खरीप हंगाम वाया गेला आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावरही झाला आहे. धरण झाल्यापासून पहिल्यांदाच एवढा कमी पाणीसाठा झाला आहे. उन्हाळा सुरू व्हायला काही महिने बाकी असतानाच पाणीटंचाई भासू लागली आहे. दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत असतानाही पाटबंधारे विभागाने गांधारीची भूमिका का घेतली आहे? अजूनही पाण्याचे नियोजन का केलेले नाही?, असा सवाल उपस्थित होत आहे. पाटबंधारे खात्याच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे नियोजन केलेले नाही. धरणाखालील पिकांची अवस्था बिकट आहे. मोरणाकाठच्या शेतकऱ्यांनी लाभक्षेत्रापेक्षा दुप्पट क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. मोरणा नदीपात्र कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.प्रशासनाने पाण्याचे नियोजन करावेशिराळा शहरासह औद्योगिक वसाहतीसाठी मोरणा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. धरणातील पाणी साठ्यामध्ये घट होत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. शिराळा ग्रामपंचायतीने माजी आ. मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विचारविनिमय करून यासंदर्भात ठरावही दिला आहे, अशी प्रतिक्रिया शिराळ्याचे सरपंच गजानन सोनटक्के यांनी दिली.पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस : रब्बी हंगाम अडचणीत शिराळा तालुक्यात ५० टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तालुका पूर्ण दुष्काळी परिस्थितीत आहे. मोरणा धरणात ४0 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा वापर नियोजनाने केला नाही, तर मोरणा परिसरामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल. याचा विचार करून लाभक्षेत्रातील शेतकरी व पाटबंधारे विभागाने एकत्रित बसून समन्वयाने नियोजन केले, तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया मोरणा फळे-फुले भाजीपाला संघ अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी दिली.