शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

कडेगावमध्ये रस्ता चौपदरीकरणाचे काम ठप्प!

By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST

ठेकेदार बदलण्याच्या मागणीला जोर : दंडात्मक कारवाईनंतर काम संथगतीने

प्रताप महाडिक - कडेगाव येथील कऱ्हाड-विटा रस्ता रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई झाली आहे. तरीसुद्धा कामात अपेक्षित प्रगती नाही. बहुतांशी कामे सध्या ठप्पच झाली आहेत. अशा संथगतीने हे काम होणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने आता ठेकेदारच बदलावा, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरीत आहे.कडेगाव येथील कऱ्हाड-विटा रस्ता रुंदीकरण आणि चौपदरीकरण कामासाठी ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधीतून महालक्ष्मी मंदिर ते डोंगराई मंदिरादरम्यानच्या ११०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्याची रुंदी २५ मीटर असून, ९.२० मीटर रुंदीचा दुभाजक होणार आहे. त्यामध्ये स्ट्रिट लाईट बसविण्यात येणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी २ मीटर लांबीचा पदपथ होणार आहे. तसेच वाहन पार्किंग सुविधा होणार आहे. हे काम कडेगावच्या वैभवात भर घालणार आहे. यामुळे आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी विशेष लक्ष घालून जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ३ डिसेंबर २०१३ रोजी या कामास प्रारंभ केला. परंतु हे काम करणाऱ्या ठेकेदाराने प्रारंभापासून संथगतीने काम सुरु केले आहे.३ डिसेंबर १३ ते २ डिसेंबर २०१४ या वर्षभराच्या कालावधित हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु विहित वेळेत केवळ २० टक्के काम पूर्ण झाले. सुरुवातीपासूनच काम रखडत चालले होते. याबाबत संबंधित ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या होत्या. तरीही ठेकेदाराच्या कारभारात सुधारणा झाली नाही. म्हणून १५ जुलै २०१४ पासून संबंधित ठेकेदाराला प्रतिदिन २००० रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली. तरीही कामाची स्थिती आजही ‘जैसे थे’च दिसते. इतक्या संथगतीने काम पूर्ण होणे अशक्य आहे. यामुळे आता पतंगराव कदम यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांचेही ठेकेदाराच्या कारभाराकडे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी आहेत.कदम यांनी हा ठेकेदार बदलून नवीन ठेकेदारांमार्फत हे काम पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. कडेगाव येथील उपविभागीय अभियंता सुभाष पाटील यांनीही बांधकाम विभागाच्या कोल्हापूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे, हे काम अधिकच रखडत चालले आहे.संबंधित ठेकेदारावर नियमानुसार आता प्रतिदिन १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, असा प्रस्ताव दिला आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असे समजते. याशिवाय पंचायत समिती, कडेगाव येथील मासिक बैठकीतही ठेकेदार बदला, अशीच मागणी सदस्यांतून होत आहे.ठेकेदाराला प्रतिदिन दोन हजाराचा दंडठेकेदाराला नोटीस देऊनही त्याच्या कारभारात सुधारणा झाली नाही. म्हणून १५ जुलै २०१४ पासून संबंधित ठेकेदारावर प्रतिदिन २००० रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली. तरीही कामाची स्थिती आजही ‘जैसे थे’च दिसते.कडेगावातील रस्त्याचे चौपदरीकरण होतेय, त्यामुळे कडेगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे. वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांनी रस्त्याकडेचे अतिक्रमण काढून घेतले. अनेक खोकीधारकांनी रोजीरोटी देणारे आपले व्यवसाय अन्यत्र हलविले. ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेते, सर्वांचेच सर्वतोपरी सहकार्य असतानाही काम रखडल्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी आहे.