शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शिराळ्यात जोर कायम

By admin | Updated: July 13, 2016 00:44 IST

मोरणा नदीलाही पूर : वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली

शिराळा : शिराळा तालुक्यात सतत अतिवृष्टी सुरू असून, वारणा व मोरणा नदीस पूर आला आहे. वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे.चांदोली धरण व अभयारण्य परिसरात पावसाची संततधार कायम असून चांदोली धरण ५३.२० टक्के भरले आहे. धरणात १८.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दररोज सरासरी २ टीएमसीने धरणाचे पाणी वाढत आहे. धरण पातळी ६०८ मीटर झाली आहे.तालुक्यात सर्व मंडल क्षेत्रात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू आहे. शिराळ्यात ९३ मि.मी. (६१० मि.मी.), वारणावती - १३२ (१०६९), सागाव - १३८ (६६०), मांगले - १२९ (७२५), चरण - ११९ (७६२), कोकरूड - ९७ (७६६), शिरशी - ५३ (३५४) असा मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील मोरणा, करमजाई, अंत्री, टाकवे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. शिवणी धरण ९४ टक्के भरले आहे. तालुक्यातील पाझर तलाव भरले आहेत.वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे चरण येथील ऊसशेती खचून मोठे नुकसान झाले आहे. वाकुर्डे, कोकरूड येथे घरांच्या भिंती पडल्या आहेत. वारणा नदीवरील आरळा-शित्तूर, मांगले-काखे, मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे हे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोडोली, पन्हाळा, कोल्हापूर या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.काळुंद्रे येथील हुबाल वस्तीत पाणी शिरले असून, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. आरळा- येसलेवाडी येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तालुक्यातील २६ पुलांखालील गावांना तहसीलदार यांनी सतर्कतेचा इशारा दिला असून तहसील कार्यालयात पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तलाठी, ग्रामसेवक यांना गाव न सोडल्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिळाशी येथे झाडे उन्मळून पडली आहेत. नैसर्गिक आपत्तीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.खरीप हंगामातील भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकात पाणी साठल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाणी साठल्यामुळे खड्डे पडले असून, वाहन चालविणे कठीण झाले आहे. मोरणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सलग ७२ तास झालेल्या अतिवृष्टीमुळे ४२२ मिलिमीटर पावसासह एकूण १०६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ५१८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १८.३० टीएमसी झाला आहे, तर धरण पातळी ६०८.00 मीटर झाली आहे. त्याची टक्केवारी ५३.२० अशी आहे. (वार्ताहर)जनावरांचे स्थलांतरकोकरूड : १ जुलैपासून सुरू असणारा संततधार पाऊस मंगळवारीही कायम होता. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे कोकरूड गावच्या शिवारात पाणी शिरल्यामुळे नदीकाठी वस्ती करून असलेल्या जनावरांना गावात हलविण्यात आले आहे. शिराळ्याच्या पश्चिम भागातील कोकरूड, बिळाशी, मांगरूळ, चरण, आरळा येथील शेतकऱ्यांनी आपली जनावरे गावात आणली आहेत. या परिसरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. कोकरूड, बिळाशी, मांगरूळ येथील स्मशानशेडला पाणी लागले आहे. मंगळवारी कोकरूड परिसरात ९७ मि. मी. पाऊस पडला. या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.