शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

शिराळ्यात जोर कायम

By admin | Updated: July 13, 2016 00:44 IST

मोरणा नदीलाही पूर : वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली

शिराळा : शिराळा तालुक्यात सतत अतिवृष्टी सुरू असून, वारणा व मोरणा नदीस पूर आला आहे. वारणा नदीवरील चार पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे.चांदोली धरण व अभयारण्य परिसरात पावसाची संततधार कायम असून चांदोली धरण ५३.२० टक्के भरले आहे. धरणात १८.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दररोज सरासरी २ टीएमसीने धरणाचे पाणी वाढत आहे. धरण पातळी ६०८ मीटर झाली आहे.तालुक्यात सर्व मंडल क्षेत्रात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू आहे. शिराळ्यात ९३ मि.मी. (६१० मि.मी.), वारणावती - १३२ (१०६९), सागाव - १३८ (६६०), मांगले - १२९ (७२५), चरण - ११९ (७६२), कोकरूड - ९७ (७६६), शिरशी - ५३ (३५४) असा मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील मोरणा, करमजाई, अंत्री, टाकवे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. शिवणी धरण ९४ टक्के भरले आहे. तालुक्यातील पाझर तलाव भरले आहेत.वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे चरण येथील ऊसशेती खचून मोठे नुकसान झाले आहे. वाकुर्डे, कोकरूड येथे घरांच्या भिंती पडल्या आहेत. वारणा नदीवरील आरळा-शित्तूर, मांगले-काखे, मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे हे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोडोली, पन्हाळा, कोल्हापूर या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.काळुंद्रे येथील हुबाल वस्तीत पाणी शिरले असून, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. आरळा- येसलेवाडी येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तालुक्यातील २६ पुलांखालील गावांना तहसीलदार यांनी सतर्कतेचा इशारा दिला असून तहसील कार्यालयात पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तलाठी, ग्रामसेवक यांना गाव न सोडल्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिळाशी येथे झाडे उन्मळून पडली आहेत. नैसर्गिक आपत्तीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.खरीप हंगामातील भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकात पाणी साठल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाणी साठल्यामुळे खड्डे पडले असून, वाहन चालविणे कठीण झाले आहे. मोरणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सलग ७२ तास झालेल्या अतिवृष्टीमुळे ४२२ मिलिमीटर पावसासह एकूण १०६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ५१८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १८.३० टीएमसी झाला आहे, तर धरण पातळी ६०८.00 मीटर झाली आहे. त्याची टक्केवारी ५३.२० अशी आहे. (वार्ताहर)जनावरांचे स्थलांतरकोकरूड : १ जुलैपासून सुरू असणारा संततधार पाऊस मंगळवारीही कायम होता. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे कोकरूड गावच्या शिवारात पाणी शिरल्यामुळे नदीकाठी वस्ती करून असलेल्या जनावरांना गावात हलविण्यात आले आहे. शिराळ्याच्या पश्चिम भागातील कोकरूड, बिळाशी, मांगरूळ, चरण, आरळा येथील शेतकऱ्यांनी आपली जनावरे गावात आणली आहेत. या परिसरातील पिके पाण्याखाली गेली आहेत. कोकरूड, बिळाशी, मांगरूळ येथील स्मशानशेडला पाणी लागले आहे. मंगळवारी कोकरूड परिसरात ९७ मि. मी. पाऊस पडला. या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.