शहरं
Join us  
Trending Stories
1
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
2
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
5
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
6
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
7
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
8
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
9
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
10
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
11
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
12
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
13
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
14
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
15
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
16
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
17
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
18
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
19
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
20
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर

खानापूर पूर्व भाग दुष्काळाच्या झळांनी हवालदिल

By admin | Updated: August 31, 2015 21:38 IST

खरीप हंगाम वाया : पावसाची दडी; पुन्हा पाणीटंचाई व चाराटंचाई; उन्हाच्या तीव्रतेत वाढ

पांडुरंग डोंगरे ल्ल खानापूरमान्सूनच्या पावसाने गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारल्याने खानापूर पूर्व भागातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यातच आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. परिणामी खरीप पिके करपली असून विहिरी, कूपनलिकांचे पाणी संपत आल्याने खानापूर पूर्व भागात पुन्हा दुष्काळ जाणवू लागला आहे. खानापूर पूर्व भाग उंच व घाटमाथ्याचा असल्याने येथे पावसाचे प्रमाण नेहमीच कमी राहते. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती कायमच असते. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र आॅगस्टनंतर दर तीस दिवसानंतर अवकाळी पाऊस पडत होता. त्यामुळे गत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. जून महिन्यात एक आठवडाभर पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली. परिणामी शेतकऱ्यांनी गडबडीने खरीप पेरणी उरकली. मात्र जूननंतर पावसाने आजअखेर पूर्ण दडी मारल्याने चांगला असलेला खरीप हंगाम वाया गेला आहे. संकरित ज्वारी, देशी ज्वारी, उडीद, सोयाबीन, भुईमूग आदी पिके करपली आहेत. खरीप हंगामाबरोबरच बागायत पिकांची अवस्थाही दयनीय झाली आहे. खानापूर पूर्व भागात निर्यातक्षम द्राक्षशेती केली जाते. पावसाचा द्राक्षशेतीवरही विपरित परिणाम झाला आहे. गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसास तोंड देत द्राक्ष हंगाम कसा तरी पार पडला. चालूवर्षी अवकाळीऐवजी कमी पाऊस व कमी पाण्यास तोंड द्यावे लागत आहे. सध्या द्राक्षबागांच्या काड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात छाटणीची काम केली जाणार आहेत. परंतु पावसाच्या उघडीपीमुळे तसेच पाणीटंचाईमुळे द्राक्षकाडी पाहिजे तशी होत नसल्याने चालूवर्षीचा द्राक्ष हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. पावसाने अजून दडी मारली, तर बहुतेक द्राक्ष बागायतदार ‘छाटणी’ रद्द करण्याच्या मनस्थितीत आहेत. हीच अवस्था डाळिंब बागायतदारांची आहे. खानापूर पूर्व भागातून वाहणारी अग्रणी नदी, पापनाशी ओढा गेल्या दीड महिन्यापासून कोरडा ठणठणीत पडला आहे. पूर्व भागातील खानापूर, ढोराळे, बलवडी (खा.), रामनगर, हिवरे, सुलतानगादे येथील पाझर तलावामधील पाणी पातळीने तळ गाठला आहे. अग्रणी नदीवरील तसेच इतर बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नसल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. विहिरी, कूपनलिकांचे पाणी खाली गेले आहे. ज्या कूपनलिकांना पाणी आहे, त्याही जेमतेम तासभर सुरू राहत आहेत. पावसाळा संपत आला तरी एकही दमदार पाऊस पडलेला नाही. रिमझिम पाऊसही बेपत्ता झाल्याने श्रावण महिन्यात दिसणारे हिरवेगार वातावरण दिसेनासे झाले आहे. सगळीकडे रखरखीतपणा जाणवत असल्याने उन्हाळाच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शेतातील बांध, माळरान, पडिक क्षेत्र येथे खुरट्या गवताचीही उगवण झाली नसल्याने शेळ्या-मेंढ्यांबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैरणी संपल्या, ओला चारा नाही, अशा परिस्थितीत जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न शेतकरी वर्गास पडला आहे. शेतीबरोबरच खानापूर पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पूर्व भागातील हिवरे, पळशी, बाणूरगड येथे गेल्या महिन्यापासून टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. करंजे, भडकेवाडी, रेवणगाव, येथेही टँकरची मागणी होत असून येत्या पंधरा दिवसात पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची भीती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी, तर जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावणी सुरू करावी, अशी मागणीही होत आहे.